शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

आदिवासींचा दु:खाशी नाते जोडत राज्यपालांनी जिंकले आदिवासींचे मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:03 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींचे दु:ख आणि वेदना ऐकुण भारावून न जाता थेट आपले ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींचे दु:ख आणि वेदना ऐकुण भारावून न जाता थेट आपले दु:ख आदिवासींच्या दु:खात मिसळून त्यांच्याशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समरस झाले. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच राज्यपालांनी आदिवासींची मने जिंकले आणि संवादाचा मार्ग मोकळा करीत आदिवासींच्या एकएक प्रश्नांचे हसतखेळत निराकरण केले.सातपुड्याच्या दुर्गम भागात आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री, बडे नेते व राज्यपालही येवून गेले. या नेत्यांनी आदिवासींचे दु:ख ऐकुण भारावले, सहानुभूतीचे बोल सांगितले, पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मात्र या सर्वांपेक्षा वेगळ्या भुमिकेतून आदिवासींची मने जिंकली. त्यांनी आदिवासी दुर्गम भागातील धुळीने माखलेले रस्ते, वीज, आरोग्याचा प्रश्नांचा पाढा ऐकुण अजिबात सहानुभूती दर्शविली नाही. याउलट त्यांनी आदिवासींना आपल्या स्वत:च्या जिवानातून आणि वाणीतून जगण्याचे बळ भरले. ते म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री राहिलो, राज्यपाल झालो, खासदार झालो पण आजही माझ्या गावापर्यंत जाण्यासाठी मला काही अंतर पायीच जावे लागते. तुम्ही ज्या परिस्थितीत राहतात त्याहीपेक्षा माझ्या भागाची परिस्थिती गंभीर आहे. बालपणी मी देखील गरीबी भोगली आहे. अगदी हायस्कूलचे शिक्षण घेईपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती.... त्यामुळे परिस्थितीला घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जा, खूप मेहनत घ्या आणि यश साध्य करा असा मंत्र देत राज्यपालांनी आदिवासींच्या हृदयातच स्थान मिळविले. त्यामुळे आदिवासींनी राज्यपालांशी अतिशय मुक्तपणे खुल्या मनाने संवाद साधला. राज्यपाल कोश्यारी यांनी देखील तेवढ्याच सहजतेने आदिवासींचे प्रश्न ऐकुण अधूनमधून मिश्किलपणे कोपरखेळी घेत लोकांना सतत हसत ठेवले. ते म्हणाले, मी राज्यपाल झालो पण आजही सकाळचा चहा स्वत: बनवतो आणि भांडीही धुतो. येथे उपस्थित खासदार डॉ.हिना गावीत आणि मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी हे देखील स्वत: चहा करीत नसतील. त्यावर के.सी.पाडवी यांनी मी जेवन देखील बनवतो असे उत्तर देताच एकच हास्य फुलले.मंत्री पाडवी यांच्या उत्तरावर तेवढ्या सहजतेने राज्यपालांनी मी तुमच्याकडे जेवायला येईल असे सांगून त्यांना समाधानी केले. प्रश्न मांडतांना काही महिलांनी रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी सहज गंमत करीत ‘अरे बाबा मेरा भी रोजगार की व्यवस्था करो, मै भी यहा आके रहेने वाला हू.... असे सांगताच पुन्हा हास्य फुलले.अंगणवाडी केंद्रात उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसमोर बोलतांना त्यांनी मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड या चौघांना एका रांगेत उभे करून आदिवासी पालकांना समजावून सांगितले, बघा येथील मंत्री, खासदार, जि.प.अध्यक्षा आणि जिल्हाधिकारी हे चारही जण आदिवासी आहेत. ते या पदापर्यंत पोहचू शकतात तर तुमची मुले का नाही.तुम्ही देखील यांची प्रेरणा घ्या आणि मुलांना शिकवा असे थेट लोकांच्या मनाला भिडेल असे उदाहरण दिले. त्यामुळे उपस्थित अधिकच प्रभावीत झाले.साधेपणाबाबत राज्यपालांनी स्वत:च्या जीवनशैलीचे उदाहरणे दिली. ते सांगतांनाच आज या भागात मी तुम्हाला भेटायला आलो आहे. तुमच्यात राहणार तरच तुमचे प्रश्न समजेल. पण माझी राहण्याची व्यवस्था येथे एका शासकीय बंगल्यात केली आहे. तेथे खूप काही सुविधा करण्यात आल्या आहेत. पण मला त्यात रस नाही.मला आपल्यातीलच एकाच्या घरी मुक्काम करायचा आहे. फक्त त्या घरात शौचालय असायला हवे एवढीच माझी अट असल्याचे सांगत उपस्थित आदिवासींशी नाते अजून घट्ट केले.