शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आदिवासींचा दु:खाशी नाते जोडत राज्यपालांनी जिंकले आदिवासींचे मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:03 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींचे दु:ख आणि वेदना ऐकुण भारावून न जाता थेट आपले ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींचे दु:ख आणि वेदना ऐकुण भारावून न जाता थेट आपले दु:ख आदिवासींच्या दु:खात मिसळून त्यांच्याशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समरस झाले. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच राज्यपालांनी आदिवासींची मने जिंकले आणि संवादाचा मार्ग मोकळा करीत आदिवासींच्या एकएक प्रश्नांचे हसतखेळत निराकरण केले.सातपुड्याच्या दुर्गम भागात आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री, बडे नेते व राज्यपालही येवून गेले. या नेत्यांनी आदिवासींचे दु:ख ऐकुण भारावले, सहानुभूतीचे बोल सांगितले, पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मात्र या सर्वांपेक्षा वेगळ्या भुमिकेतून आदिवासींची मने जिंकली. त्यांनी आदिवासी दुर्गम भागातील धुळीने माखलेले रस्ते, वीज, आरोग्याचा प्रश्नांचा पाढा ऐकुण अजिबात सहानुभूती दर्शविली नाही. याउलट त्यांनी आदिवासींना आपल्या स्वत:च्या जिवानातून आणि वाणीतून जगण्याचे बळ भरले. ते म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री राहिलो, राज्यपाल झालो, खासदार झालो पण आजही माझ्या गावापर्यंत जाण्यासाठी मला काही अंतर पायीच जावे लागते. तुम्ही ज्या परिस्थितीत राहतात त्याहीपेक्षा माझ्या भागाची परिस्थिती गंभीर आहे. बालपणी मी देखील गरीबी भोगली आहे. अगदी हायस्कूलचे शिक्षण घेईपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती.... त्यामुळे परिस्थितीला घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जा, खूप मेहनत घ्या आणि यश साध्य करा असा मंत्र देत राज्यपालांनी आदिवासींच्या हृदयातच स्थान मिळविले. त्यामुळे आदिवासींनी राज्यपालांशी अतिशय मुक्तपणे खुल्या मनाने संवाद साधला. राज्यपाल कोश्यारी यांनी देखील तेवढ्याच सहजतेने आदिवासींचे प्रश्न ऐकुण अधूनमधून मिश्किलपणे कोपरखेळी घेत लोकांना सतत हसत ठेवले. ते म्हणाले, मी राज्यपाल झालो पण आजही सकाळचा चहा स्वत: बनवतो आणि भांडीही धुतो. येथे उपस्थित खासदार डॉ.हिना गावीत आणि मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी हे देखील स्वत: चहा करीत नसतील. त्यावर के.सी.पाडवी यांनी मी जेवन देखील बनवतो असे उत्तर देताच एकच हास्य फुलले.मंत्री पाडवी यांच्या उत्तरावर तेवढ्या सहजतेने राज्यपालांनी मी तुमच्याकडे जेवायला येईल असे सांगून त्यांना समाधानी केले. प्रश्न मांडतांना काही महिलांनी रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी सहज गंमत करीत ‘अरे बाबा मेरा भी रोजगार की व्यवस्था करो, मै भी यहा आके रहेने वाला हू.... असे सांगताच पुन्हा हास्य फुलले.अंगणवाडी केंद्रात उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसमोर बोलतांना त्यांनी मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड या चौघांना एका रांगेत उभे करून आदिवासी पालकांना समजावून सांगितले, बघा येथील मंत्री, खासदार, जि.प.अध्यक्षा आणि जिल्हाधिकारी हे चारही जण आदिवासी आहेत. ते या पदापर्यंत पोहचू शकतात तर तुमची मुले का नाही.तुम्ही देखील यांची प्रेरणा घ्या आणि मुलांना शिकवा असे थेट लोकांच्या मनाला भिडेल असे उदाहरण दिले. त्यामुळे उपस्थित अधिकच प्रभावीत झाले.साधेपणाबाबत राज्यपालांनी स्वत:च्या जीवनशैलीचे उदाहरणे दिली. ते सांगतांनाच आज या भागात मी तुम्हाला भेटायला आलो आहे. तुमच्यात राहणार तरच तुमचे प्रश्न समजेल. पण माझी राहण्याची व्यवस्था येथे एका शासकीय बंगल्यात केली आहे. तेथे खूप काही सुविधा करण्यात आल्या आहेत. पण मला त्यात रस नाही.मला आपल्यातीलच एकाच्या घरी मुक्काम करायचा आहे. फक्त त्या घरात शौचालय असायला हवे एवढीच माझी अट असल्याचे सांगत उपस्थित आदिवासींशी नाते अजून घट्ट केले.