शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनी दिला आदिवासींना उत्कर्षाचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 17:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मी देखील अतीदुर्गम डोंगराळ भागातून आलो आहे. आजही माङया गावाला जाण्यासाठी एक-दिड किलोमिटर पायी चालावे लागते. त्यामुळे तुमचे दु:ख आणि माङो दु:ख एक आहे या शब्दात आदिवासींची आपुलकी साधत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दु:खाचे रडगाणे करत बसण्यापेक्षा शिका, मेहनत घ्या, संघर्ष करा आणि जिद्दीने जिवनाचा उत्कर्ष साधा असा मंत्र त्यांनी यावेळी आदिवासींना दिला.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी सातपुडय़ाच्या अतीदुर्गम भागातील मोलगी व भगदरी येथील दौ:यावर आहेत. नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे अगोदर सकाळी साडेनऊ च्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर मोलगीला आले. तेथून शासकीय विश्रामगृहावर अधिका:यांशी चर्चा केल्यानंतर मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राचे त्यांनी उद्घाटन केले. त्यानंतर तेथे दाखल बालकांची पहाणी करून त्यांच्या पाल्यांशी संवाद साधला. त्यानंतर ग्रामिण रुग्णालयाची पहाणी केली. तेथून थेट भगदरी येथील अंगणवाडी व लघु तलावाची पहाणी केली. त्याच ठिकाणी बांधण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटनही त्यांनी केले. त्या ठिकाणी आदिवासीच्या सांस्कृतिक ठेव्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते त्याची पहाणी केली आणि तेथेच आदिवासींशी संवादही साधला. तत्पुर्वी आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी परंपरेनुसार त्यांना फेटा बांधून तसेच होळीतील प्रसिद्ध मोरखी टोप देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित आदिवासींनी वीज, पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य, वनदावे, वनगावे आदी संदर्भातील प्रश्नांचा पाढा वाचला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी विजेचा प्रश्न गांभिर्याने घेत संबधीत अधिका:यांच्या साक्षीने सहा महिन्यात 24 तास वीज पुरवठा करण्याबाबतच्या सुचना केल्या. 132 के.व्ही.चे केंद्र तात्काळ कार्यान्वीत करण्यासाठी मदतीची ग्वाही देतांना अधिका:यांनी जर मुदतीत काम पुर्ण केले नाही तर सहा महिन्यानंतर येथील आदिवासींसोबत आपणही या अधिका:यांना घेराव घालू असा मिश्कील टोलाही मारला. शासनाचा विविध योजनांचा लाभ लोकांर्पयत पोहचतो की नाही त्याचीही त्यांनी उपस्थितांकडून खातरजमा केली. विकासाचे काम सुरू राहील पण आपण आपली कामे व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत मेहनत घ्या, मुलांना शिकवा, चांगले संस्कार द्या ते निश्चितच उद्याचे राष्ट्रपती होतील असे स्वप्न दाखवत त्यांनी आदिवासींना धीर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. आकांक्षीत जिल्ह्यासाठी असलेला कार्यक्रम या भागात राबविला जाईल त्यामुळे विकासाला गती येईल असेही त्यांनी सांगितले.