शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सरकारने श्रमिकांना देशोधडीला लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:37 IST

संडे स्पेशल मुलाखत सरकारने लॉकडाऊन केले, पण श्रमिकांचे काय हाल होतील याचा विचार न केल्याने आज श्रमिक देशोधडीला लागला आहे.- मेधा पाटकर

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसरकारचे आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रशासनात कुठलाही समन्वय नसल्याने स्थलांतरीतांचे प्रचंड हाल होत आहे. या स्थलांतरीत श्रमिकांना आपापल्या गावी जाण्याची परवाणगी देण्यात येत असली तरी त्यात प्रचंड अडचणी आहेत. शिवाय त्यांना गावी जाण्यासाठी सुविधाही दिली जात नसल्याने हे मजूर अक्षरश: देशोधडीला लागल्याची खंत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.स्थलांतरीत मजुरांच्या बाबतीत सरकारचे नेमके काय चुकले आहे?खरे तर १९७९ च्या कायद्यानुसार परराज्यातील श्रमीक जर कुठेही कामाला आला असेल तर त्याची नोंदणी होणे आवश्यक होते. परंतु तशी नोंदणी न झाल्याने राज्यातील श्रमिकांबाबत व स्थलांतरीतांचा आकडा शासनाकडे नाही. दुसरी बाब म्हणजे या मजुरांना गावी जाण्यासाठी त्यांच्या आकलनानुसार प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. पण आॅनलाईन परवाणगी सुरू केल्याने बहुतांश मजुर अशिक्षीत असल्याने त्यांना त्याची माहिती होण्यास अवघड गेले. आता पोलीस ठाण्यात पाठविले जात आहे. महानगरात अथवा ग्रामिण भागातही मजूर लांब राहतो, तेथून लॉकडाऊनच्या काळात पोलीस ठाणे गाठणे त्यांना अवघड जात आहे. त्यात मानसिक, आर्थिक व शाररिक त्रासही सहन करावा लागत आहे.स्थलांतरीतांसाठी काय सुविधा आवश्यक आहेत?राज्यात छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आदी लांबच्या राज्यातून अनेक श्रमिक येथे कामासाठी आले आहेत. या मजुरांना जाण्यासाठी रेल्वेची सुविधा सुरुवातीपासून उपलब्ध करून देण्याची गरज होती, कारण हजारोच्या संख्येने मजुर रोज जात असल्याने त्यांना बस, ट्रकने प्रवास करणे अवघड होते. या प्रवासामुळे अनेक ठिकाणी मजुर घेवून जाणाऱ्या बसेस आणि ट्रकांचा अपघातही झाला.सरकारने लॉकडाऊन जाहीर केले, पण त्यात लोकांचे काय हाल होणार याचा कुठलाही विचार केला नाही. त्याचा सर्वाधिक फटका श्रमिकांना व शेतकऱ्यांना होत आहे. या कारणांना केंद्र सरकार खºया अर्थाने दोषी असल्याचा आरोपही मेधा पाटकर यांनी केला.निधी जातो कुठे...आजही लाखो मजूर आपल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना तात्काळ वाहन मिळत नाही. रेल्वेची सुविधा अथवा इतर सुविधांसाठी चार ते पाच दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. अशा स्थितीत या मजुरांसाठी शासनाने पुरेसे निवारा केंद्र उभारण्याची गरज आहे. पण सरकार या कामासाठी निधी नाही असे म्हणते. तर मग आपत्ती व्यवस्थापनाचा निधी, प्रधानमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला लोकांनी कोट्यावधी रुपये दिले आहेत. हा निधी जातो कुठे आणि कोणत्या कामासाठी वापरणार.