शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

शासनातर्फे ज्वारी व मका खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

गेल्यावर्षी समाधानकारक पावसाळा झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षीही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, भुईमूग, मका, ज्वारी ...

गेल्यावर्षी समाधानकारक पावसाळा झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षीही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, भुईमूग, मका, ज्वारी पिकांचा पेरा केला होता. त्यात ज्वारी व मका या पिकांना शासनाने अनुक्रमे दोन हजार ६५० व एक हजार ८५० भाव जाहीर करून खरेदी करण्याचे जाहीर केले होते. तर, बाहेर खाजगी व्यापारी व बाजार समितीमध्ये एक हजार २०० ते एक हजार ४०० पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे हजार ते एक हजार २०० रुपयांचे नुकसान होऊ शकते.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारी व मक्याची काढणी करून साठवून ठेवला आहे. शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे रीतसर नोंदणीदेखील केलेली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीस शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आठवडा उलटून गेला तरी अद्याप खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तयार असलेला माल शेतकऱ्यांनी खळ्यात किंवा शेतातच झाकून ठेवल्याने अवकाळी पावसाची भीती सतावत आहे.

खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपल्याने शेतकरी मशागतीकडे वळला असून, त्यात पिकवलेला माल तसाच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. बाहेर मार्केटला हजार ते एक हजार २०० रुपये दर कमी मिळत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे लक्ष शासकीय खरेदी केंद्राकडे लागून आहे. मान्सून तोंडावर येऊन ठेपला असून बियाणे, रासायनिक खते, शेती अवजारे खरेदीसाठी शेतकरी हतबल झाला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील अद्याप कुठलाही खुलासा होत नसल्याचे नंदुरबार बाजार समितीचे माजी सभापती दिनेश पाटील यांनी सांगितले. शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून, आर्थिक संकटातून शेतकरी वाचू शकेल. म्हणून शासनाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.