शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शासनातर्फे ज्वारी व मका खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

गेल्यावर्षी समाधानकारक पावसाळा झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षीही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, भुईमूग, मका, ज्वारी ...

गेल्यावर्षी समाधानकारक पावसाळा झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षीही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, भुईमूग, मका, ज्वारी पिकांचा पेरा केला होता. त्यात ज्वारी व मका या पिकांना शासनाने अनुक्रमे दोन हजार ६५० व एक हजार ८५० भाव जाहीर करून खरेदी करण्याचे जाहीर केले होते. तर, बाहेर खाजगी व्यापारी व बाजार समितीमध्ये एक हजार २०० ते एक हजार ४०० पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे हजार ते एक हजार २०० रुपयांचे नुकसान होऊ शकते.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारी व मक्याची काढणी करून साठवून ठेवला आहे. शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे रीतसर नोंदणीदेखील केलेली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीस शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आठवडा उलटून गेला तरी अद्याप खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तयार असलेला माल शेतकऱ्यांनी खळ्यात किंवा शेतातच झाकून ठेवल्याने अवकाळी पावसाची भीती सतावत आहे.

खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपल्याने शेतकरी मशागतीकडे वळला असून, त्यात पिकवलेला माल तसाच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. बाहेर मार्केटला हजार ते एक हजार २०० रुपये दर कमी मिळत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे लक्ष शासकीय खरेदी केंद्राकडे लागून आहे. मान्सून तोंडावर येऊन ठेपला असून बियाणे, रासायनिक खते, शेती अवजारे खरेदीसाठी शेतकरी हतबल झाला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील अद्याप कुठलाही खुलासा होत नसल्याचे नंदुरबार बाजार समितीचे माजी सभापती दिनेश पाटील यांनी सांगितले. शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून, आर्थिक संकटातून शेतकरी वाचू शकेल. म्हणून शासनाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.