शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पत्ता व अकाउंटच सापडले नसल्याने नुकसानभरपाईचे ११ लाख शासन समर्पित; शेतकरी नुकसान भरपाई, सर्वाधिक नंदुरबार तालुक्यातील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षी आलेल्या क्यार चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या २५ हजार ७९ शेतकऱ्यांपैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गेल्या वर्षी आलेल्या क्यार चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या २५ हजार ७९ शेतकऱ्यांपैकी जवळपास २४० शेतकऱ्यांचा पत्ता किंवा बँक अकाउंटच सापडले नसल्याने जवळपास १० लाख ८३ हजार ९१८ रुपयांचा निधी शासनाला परत करावा लागला. त्यात सर्वाधिक शेतकरी हे नंदुरबार, शहादा व तळोदा तालुक्यातील आहेत.

गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर महिन्यात क्यार चक्रीवादळ आणि अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करून शासनाकडे सादर करण्यात आले होते. अशा शेतकऱ्यांची संख्या जवळपास २५ हजार ७९ इतकी होती. एवढ्या शेतकऱ्यांचा पंचनामा करून शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने जवळपास १६ कोटी आठ लाख १८ हजार ८३२ रुपयांची रक्कम जिल्ह्याला मंजूर केली होती. शेतकरीनिहाय त्यांच्या बँक खात्यात ती रक्कम जमा करायची होती. यातील जवळपास ९९.३३ टक्के शेतकऱ्यांचे बँक खाते व इतर कागदपत्रे बरोबर असल्याने त्यांच्या बँक खात्यात त्यांची रक्कम जमा करण्यात आली; परंतु २४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा ना पत्ता सापडला, ना बँक खाते आढळून आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे जवळपास १० लाख ८३ हजार ९१८ रुपये शासन समर्पित करावे लागले.

बँक खाते आधारशी लिंक नाही

अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारशी लिंक नसल्यामुळे अशा खात्यांमध्ये डीबीटीद्वारे रक्कम टाकताना तांत्रिक अडचणी आल्या होत्या. याबाबत वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहनदेखील करण्यात आले होते; परंतु अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याने त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळू शकली नसल्याचे चित्र आहे.

सर्वाधिक धडगाव तालुका

सर्वाधिक नुकसान भरपाई धडगाव तालुक्याला तब्बल आठ कोटी ८५ लाख ११ हजार ८५० रुपये इतकी मिळाली होती. एकूण १२ हजार ७०४ शेतकरी बाधित झाले होते. या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. सर्वात कमी रक्कम ही नंदुरबार तालुक्याला मिळाली. ६६ लाख ४० हजार ६३५ रुपये वाटप करण्यात आले. ९७४ शेतकरी संख्या होती. टक्केवारी ८९.५६ टक्के इतकी आहे.

नोव्हेंबरनंतरच्या नुकसानाचे काय?

नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ यामुळेदेखील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे करण्यात आले असून, शासनाकडे नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; परंतु त्याबाबत अद्यापही काहीही निर्णय झालेला नसल्याचे चित्र आहे.