शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पत्ता व अकाउंटच सापडले नसल्याने नुकसानभरपाईचे ११ लाख शासन समर्पित; शेतकरी नुकसान भरपाई, सर्वाधिक नंदुरबार तालुक्यातील शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षी आलेल्या क्यार चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या २५ हजार ७९ शेतकऱ्यांपैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गेल्या वर्षी आलेल्या क्यार चक्रीवादळ आणि अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या २५ हजार ७९ शेतकऱ्यांपैकी जवळपास २४० शेतकऱ्यांचा पत्ता किंवा बँक अकाउंटच सापडले नसल्याने जवळपास १० लाख ८३ हजार ९१८ रुपयांचा निधी शासनाला परत करावा लागला. त्यात सर्वाधिक शेतकरी हे नंदुरबार, शहादा व तळोदा तालुक्यातील आहेत.

गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर महिन्यात क्यार चक्रीवादळ आणि अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करून शासनाकडे सादर करण्यात आले होते. अशा शेतकऱ्यांची संख्या जवळपास २५ हजार ७९ इतकी होती. एवढ्या शेतकऱ्यांचा पंचनामा करून शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने जवळपास १६ कोटी आठ लाख १८ हजार ८३२ रुपयांची रक्कम जिल्ह्याला मंजूर केली होती. शेतकरीनिहाय त्यांच्या बँक खात्यात ती रक्कम जमा करायची होती. यातील जवळपास ९९.३३ टक्के शेतकऱ्यांचे बँक खाते व इतर कागदपत्रे बरोबर असल्याने त्यांच्या बँक खात्यात त्यांची रक्कम जमा करण्यात आली; परंतु २४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा ना पत्ता सापडला, ना बँक खाते आढळून आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे जवळपास १० लाख ८३ हजार ९१८ रुपये शासन समर्पित करावे लागले.

बँक खाते आधारशी लिंक नाही

अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारशी लिंक नसल्यामुळे अशा खात्यांमध्ये डीबीटीद्वारे रक्कम टाकताना तांत्रिक अडचणी आल्या होत्या. याबाबत वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहनदेखील करण्यात आले होते; परंतु अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याने त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळू शकली नसल्याचे चित्र आहे.

सर्वाधिक धडगाव तालुका

सर्वाधिक नुकसान भरपाई धडगाव तालुक्याला तब्बल आठ कोटी ८५ लाख ११ हजार ८५० रुपये इतकी मिळाली होती. एकूण १२ हजार ७०४ शेतकरी बाधित झाले होते. या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. सर्वात कमी रक्कम ही नंदुरबार तालुक्याला मिळाली. ६६ लाख ४० हजार ६३५ रुपये वाटप करण्यात आले. ९७४ शेतकरी संख्या होती. टक्केवारी ८९.५६ टक्के इतकी आहे.

नोव्हेंबरनंतरच्या नुकसानाचे काय?

नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ यामुळेदेखील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे करण्यात आले असून, शासनाकडे नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; परंतु त्याबाबत अद्यापही काहीही निर्णय झालेला नसल्याचे चित्र आहे.