शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

विद्यार्थ्यांच्या वाढत्या कलमुळे आयटीआयला चांगले दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST

नंदुरबार : यंदा दहावीचे अवघे दोन विद्यार्थी वगळता सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची ...

नंदुरबार : यंदा दहावीचे अवघे दोन विद्यार्थी वगळता सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची अपेक्षा खरी ठरत आहे. आतापर्यंत दोन हजार ४१० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे आयटीआयला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच आयटीआयचे प्रवेश पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी आयटीआय मिळून चार हजारांपेक्षा अधिक जागा आहेत. यंदा दहावीच्या निकालाची वाढलेली टक्केवारी आयटीआयला तारून गेली आहे. परिणामी सर्वच ट्रेडसाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.

यंदा जास्त प्रतिसाद

n कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीचा अंतर्गत मूल्यमापनावर निकाल लागल्याने, विद्यार्थ्यांना भरमसाठ गुण मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे.

n जिल्ह्यात अकरावीच्या जागा १८ हजार आहेत. आणि विद्यार्थी २१ हजार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आयटीआयला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

n सहज रोजगार मिळेल अशा ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. अर्जात ट्रेड भरताना ते सहज लक्षात येत आहे.

n नंदुरबार तालुक्यात ६१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ६०५ जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

n उर्वरित जिल्ह्यात अर्थात नवापूर तालुक्यात ६५४जणांनी नोंदणी करून ६३५ अर्ज पात्र, अक्कलकुवा तालुक्यात १७६नोंदणी असून १७० पात्र, धडगाव तालुक्यात २५३ नोंदणी व २४१ पात्र, तळोदा तालुक्यात २१८नोंदणी २०७ अर्ज ऑनलाइन पात्र ठरले आहेत.