शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

न्यायालयाच्या आदेशामुळे इच्छुकांचे देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चेला उधान आले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चेला उधान आले होते. सोशल मिडियाद्वारे मेसेजची देवानघेवान होऊन त्यात निवडणुकीलाच स्थगिती मिळाल्याचे सांगितले जात होते. परंतु खरी परिस्थिती आणि न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर या चर्चांना पुर्णविराम मिळाला. तरीही १६ तारखेला न्यायालय काय निर्णय देते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत ५० टक्केच्या आत आरक्षण आणण्यासंदर्भात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने १६ डिसेंबरच्या आत यासंदर्भातील माहिती न्यायालयात सादर करावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यासंदर्भातील मेसेज दुपारी अचानक व्हायरल झाले. अनेकांनी तर थेट निवडणुकीला स्थगिती मिळाल्याचे मेसेज फिरविले. यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीसाठी इच्छूकांमध्ये चलबिचलता निर्माण झाली. नेमके आदेश काय आहेत, खरेच निवडणुकीला स्थगिती मिळाली का? आता निवडणूक कधी होईल? यासह इतर विविध प्रश्न उपस्थित केले जात होते.अनेकांनी राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर न्यायालयाचे आदेश नेमके काय आहेत याची खात्री झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.धाकधूक कायम१६ तारखेला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. न्यायालयातील दाखल याचिकांवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू असतांनाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. अनेक पक्षांच्या इच्छुकांच्या मुलाखती होऊन त्यातून छाननी करून नावे अंतिम करण्यापर्यंत काही पक्षांनी तयारी ठेवली आहे. दुसरीकडे इच्छुकांनी प्राथमिक चाचपणी करून भेटीगाठी आणि वातावरण निर्मितीवर खर्च सुरू केला आहे. अशा उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये आता १६ तारखेच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले जाते किंवा कसे, झालेला खर्च वाया जातो का? याबाबतही अनेकांच्या मनातील चलबिचलता कायम आहे.

जिल्हा परिषद निवडणूक आधीच वर्षभर रेंगाळली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपली होती. त्यानंतर तीन महिने मुदतवाढ मिळाली. पुन्हा मुदतवाढ देण्यास शासनाने नकार दिल्यानंतर प्रशासक राज आले. गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक कामकाज पहात आहेत. आता नवीन वर्षात नवीन अध्यक्ष जिल्हा परिषदेला मिळतील अशी अपेक्षा असतांना मात्र आता न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा निवडणूक प्रक्रिया अधांतरी झाली आहे.