शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

परतलेल्या स्थलांतरित मजुरांना गावालाच रोहयोची कामे द्या - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करोनामुळे मजुर वर्गाचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : करोनामुळे मजुर वर्गाचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, तृप्ती धोडमिसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील, कृषी उपसंचालक एम.एस. रामोळे उपस्थित होते.डॉ.भारूड म्हणाले की, मनरेगातून जिल्ह्यात पाच हजार १४४ कामे सुरू असून, ४१ हजार १५७ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संख्येत अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणांनी करावा. जिल्ह्यातुन ७५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने प्रलंबित असलेली कामे त्वरीत सुरू करण्यात यावीत. सध्या शेतीमजुरीची कामे कमी असल्यामुळे मनरेगा अंतर्गत कृषी विभागाने प्रत्येक तालुकास पाच हजार या प्रमाणे ३० हजार मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत.एका कृषी सहायकास पाच कामे, कृषी पर्यवेक्षक १०, कृषी अधिकाऱ्याने किमान १५ कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्यात मनरेगाची इतर कामे होत नसल्याने फळबाग लागवडीची १०० टक्के कामे केल्यास फळबागाच्या कामातून ३० ते ३५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी.मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पेपर सोप उपलब्ध करून देण्यात यावे. मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्रांकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि लक्षणे आढळल्यास लगेचच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावीत.काम करतांना पुरेसे अंतर ठेवून काम पूर्ण होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. जिल्ह्यात बोगस बी-बियाणे तसेच जादा दराने खताची विक्री होत असल्यास संबधित दुकानावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही दिले. मनरेगा अंतर्गत कामाची मागणी करण्याचे आवाहन करीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक मजुराला किमान २३८ रूपये मजूरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरूपानुसार या मजुरीमध्ये वाढदेखील होते. मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत १०० टक्के मजुरांच्या खात्यावर मजुरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मजुरांनी कामाची मागणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबैठकीस कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.