शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

परतलेल्या स्थलांतरित मजुरांना गावालाच रोहयोची कामे द्या - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करोनामुळे मजुर वर्गाचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : करोनामुळे मजुर वर्गाचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, तृप्ती धोडमिसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील, कृषी उपसंचालक एम.एस. रामोळे उपस्थित होते.डॉ.भारूड म्हणाले की, मनरेगातून जिल्ह्यात पाच हजार १४४ कामे सुरू असून, ४१ हजार १५७ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संख्येत अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणांनी करावा. जिल्ह्यातुन ७५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने प्रलंबित असलेली कामे त्वरीत सुरू करण्यात यावीत. सध्या शेतीमजुरीची कामे कमी असल्यामुळे मनरेगा अंतर्गत कृषी विभागाने प्रत्येक तालुकास पाच हजार या प्रमाणे ३० हजार मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत.एका कृषी सहायकास पाच कामे, कृषी पर्यवेक्षक १०, कृषी अधिकाऱ्याने किमान १५ कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्यात मनरेगाची इतर कामे होत नसल्याने फळबाग लागवडीची १०० टक्के कामे केल्यास फळबागाच्या कामातून ३० ते ३५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी.मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पेपर सोप उपलब्ध करून देण्यात यावे. मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्रांकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि लक्षणे आढळल्यास लगेचच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावीत.काम करतांना पुरेसे अंतर ठेवून काम पूर्ण होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. जिल्ह्यात बोगस बी-बियाणे तसेच जादा दराने खताची विक्री होत असल्यास संबधित दुकानावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही दिले. मनरेगा अंतर्गत कामाची मागणी करण्याचे आवाहन करीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक मजुराला किमान २३८ रूपये मजूरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरूपानुसार या मजुरीमध्ये वाढदेखील होते. मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत १०० टक्के मजुरांच्या खात्यावर मजुरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मजुरांनी कामाची मागणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबैठकीस कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.