शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

परतलेल्या स्थलांतरित मजुरांना गावालाच रोहयोची कामे द्या - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करोनामुळे मजुर वर्गाचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : करोनामुळे मजुर वर्गाचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, तृप्ती धोडमिसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील, कृषी उपसंचालक एम.एस. रामोळे उपस्थित होते.डॉ.भारूड म्हणाले की, मनरेगातून जिल्ह्यात पाच हजार १४४ कामे सुरू असून, ४१ हजार १५७ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संख्येत अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणांनी करावा. जिल्ह्यातुन ७५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने प्रलंबित असलेली कामे त्वरीत सुरू करण्यात यावीत. सध्या शेतीमजुरीची कामे कमी असल्यामुळे मनरेगा अंतर्गत कृषी विभागाने प्रत्येक तालुकास पाच हजार या प्रमाणे ३० हजार मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत.एका कृषी सहायकास पाच कामे, कृषी पर्यवेक्षक १०, कृषी अधिकाऱ्याने किमान १५ कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्यात मनरेगाची इतर कामे होत नसल्याने फळबाग लागवडीची १०० टक्के कामे केल्यास फळबागाच्या कामातून ३० ते ३५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी.मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पेपर सोप उपलब्ध करून देण्यात यावे. मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्रांकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि लक्षणे आढळल्यास लगेचच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावीत.काम करतांना पुरेसे अंतर ठेवून काम पूर्ण होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. जिल्ह्यात बोगस बी-बियाणे तसेच जादा दराने खताची विक्री होत असल्यास संबधित दुकानावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही दिले. मनरेगा अंतर्गत कामाची मागणी करण्याचे आवाहन करीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक मजुराला किमान २३८ रूपये मजूरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरूपानुसार या मजुरीमध्ये वाढदेखील होते. मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत १०० टक्के मजुरांच्या खात्यावर मजुरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मजुरांनी कामाची मागणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबैठकीस कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.