शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

उसाला 3200 रुपयांचा भाव द्या प्रकाशा येथे ऊस परिषदेत राजू शेट्टी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : उसाला प्रती टन 3200 रुपयांचा भाव द्यावा आणि पहिली उचल तीन हजार रुपयांची द्यावी अन्यथा शेतक:यांनी जो कारखाना जास्त भाव देईल त्या कारखान्यांना ऊस द्यावा, असे आवाहन करीत शासनाने जर गाडय़ा अडवल्या तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : उसाला प्रती टन 3200 रुपयांचा भाव द्यावा आणि पहिली उचल तीन हजार रुपयांची द्यावी अन्यथा शेतक:यांनी जो कारखाना जास्त भाव देईल त्या कारखान्यांना ऊस द्यावा, असे आवाहन करीत शासनाने जर गाडय़ा अडवल्या तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. त्याचबरोबर पुष्पदंतेश्वर साखर कारखाना हा शेतक:यांचा होता तो परत मिळविण्यासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.प्रकाशा येथील सद्गुरू दगा महाराज धर्मशाळेच्या प्रांगणात सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील पहिली ऊस परिषद झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून खासदार राजू शेट्टी बोलत होते. व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तूपकर, संघटनेचे नेते जगदीश इनामदार, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दीपक पगार, नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, धुळे जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, पवन देशमुख,          डोंगर पगार, कृष्णदास पाटील, पुष्पदंतेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद चौधरी, नंदुरबार  बाजार समितीचे सभापती भरत पाटील, नथ्थू पाटील, उपसरपंच भरत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले की, सरकारने परराज्यात ऊस  विक्रीला बंदी केली आहे. मात्र स्थानिक कारखाने जर शेतक:यांना भाव देत नसतील तर शेतक:याला कुठेही ऊस विक्री करता आली पाहिजे. साखर विक्री देशभर होऊ शकते मग ऊस का शेतक:यांनी  देऊ नये. या भागातील कारखान्यांचा उतारा कमी असल्याबाबत  त्यांनी सांगितले, गु:हाळात व इतर ठिकाणी उसाचा उतारा चांगला मिळतो मग कारखान्यांना का मिळत नाही. काही कारखाने ऊस वजन चोरण्यासाठी काटा मारतात. कारखान्याची आधुनिक यंत्रणा असताना याठिकाणी नऊची  रिकव्हरी व बाहेर 13 ची रिकव्हरी का मिळते, असा प्रश्न करून कारखान्यांच्या पारदर्शी व्यवहारासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही त्यांनी केली. आपण कुठल्याही पक्षाची अथवा   कुठल्याही कारखान्याचा एजंट नाही तर फक्त आणि फक्त शेतक:यांची   बाजू मांडण्यासाठी येथे आलेलो  आहे. गुजरातमधील कारखान्यांची बाजू आपण घेणार नाहीत पण ते  जर शेतक:यांना जास्त भाव देत असतील तर तेथे शेतक:यांना का ऊस देऊ नये, असा प्रश्नही त्यांनी केला. त्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतक:यांनी संघटित होण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्वामीनाथन आयोग लागू करण्याची ठाम भूमिका मांडत त्यांनी शेतक:यांसाठी मोदी सरकारमधून बाहेर पडून सरकारला विरोध नोंदविल्याचेही सांगितले. या सरकारने आपला विश्वासघात केल्याचे ते म्हणाले.  या वेळी त्यांनी विविध विषयांवर   मत मांडत शेतक:यांसाठी सरकारशी दोन हात करण्याचा इशाराही दिला. पुष्पदंतेश्वर साखर कारखाना हा शेतक:यांचा कारखाना असून तो परत मिळविण्यासाठी संघर्ष  तीव्र करण्याचा संकेत त्यांनी दिला.