शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उसाला 3200 रुपयांचा भाव द्या प्रकाशा येथे ऊस परिषदेत राजू शेट्टी यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : उसाला प्रती टन 3200 रुपयांचा भाव द्यावा आणि पहिली उचल तीन हजार रुपयांची द्यावी अन्यथा शेतक:यांनी जो कारखाना जास्त भाव देईल त्या कारखान्यांना ऊस द्यावा, असे आवाहन करीत शासनाने जर गाडय़ा अडवल्या तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : उसाला प्रती टन 3200 रुपयांचा भाव द्यावा आणि पहिली उचल तीन हजार रुपयांची द्यावी अन्यथा शेतक:यांनी जो कारखाना जास्त भाव देईल त्या कारखान्यांना ऊस द्यावा, असे आवाहन करीत शासनाने जर गाडय़ा अडवल्या तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. त्याचबरोबर पुष्पदंतेश्वर साखर कारखाना हा शेतक:यांचा होता तो परत मिळविण्यासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.प्रकाशा येथील सद्गुरू दगा महाराज धर्मशाळेच्या प्रांगणात सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील पहिली ऊस परिषद झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून खासदार राजू शेट्टी बोलत होते. व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तूपकर, संघटनेचे नेते जगदीश इनामदार, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख दीपक पगार, नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, धुळे जिल्हाध्यक्ष जगदीश पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, पवन देशमुख,          डोंगर पगार, कृष्णदास पाटील, पुष्पदंतेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद चौधरी, नंदुरबार  बाजार समितीचे सभापती भरत पाटील, नथ्थू पाटील, उपसरपंच भरत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले की, सरकारने परराज्यात ऊस  विक्रीला बंदी केली आहे. मात्र स्थानिक कारखाने जर शेतक:यांना भाव देत नसतील तर शेतक:याला कुठेही ऊस विक्री करता आली पाहिजे. साखर विक्री देशभर होऊ शकते मग ऊस का शेतक:यांनी  देऊ नये. या भागातील कारखान्यांचा उतारा कमी असल्याबाबत  त्यांनी सांगितले, गु:हाळात व इतर ठिकाणी उसाचा उतारा चांगला मिळतो मग कारखान्यांना का मिळत नाही. काही कारखाने ऊस वजन चोरण्यासाठी काटा मारतात. कारखान्याची आधुनिक यंत्रणा असताना याठिकाणी नऊची  रिकव्हरी व बाहेर 13 ची रिकव्हरी का मिळते, असा प्रश्न करून कारखान्यांच्या पारदर्शी व्यवहारासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही त्यांनी केली. आपण कुठल्याही पक्षाची अथवा   कुठल्याही कारखान्याचा एजंट नाही तर फक्त आणि फक्त शेतक:यांची   बाजू मांडण्यासाठी येथे आलेलो  आहे. गुजरातमधील कारखान्यांची बाजू आपण घेणार नाहीत पण ते  जर शेतक:यांना जास्त भाव देत असतील तर तेथे शेतक:यांना का ऊस देऊ नये, असा प्रश्नही त्यांनी केला. त्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतक:यांनी संघटित होण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्वामीनाथन आयोग लागू करण्याची ठाम भूमिका मांडत त्यांनी शेतक:यांसाठी मोदी सरकारमधून बाहेर पडून सरकारला विरोध नोंदविल्याचेही सांगितले. या सरकारने आपला विश्वासघात केल्याचे ते म्हणाले.  या वेळी त्यांनी विविध विषयांवर   मत मांडत शेतक:यांसाठी सरकारशी दोन हात करण्याचा इशाराही दिला. पुष्पदंतेश्वर साखर कारखाना हा शेतक:यांचा कारखाना असून तो परत मिळविण्यासाठी संघर्ष  तीव्र करण्याचा संकेत त्यांनी दिला.