शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी इमारत दुरूस्ती, पदभरती या विषयावर गाजली सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:09 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत दुरूस्ती, नवीन बांधकाम, पदभरती या विषयावर सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. येत्या काळात नवीन अंगणवाडी ...

नंदुरबार : जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत दुरूस्ती, नवीन बांधकाम, पदभरती या विषयावर सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. येत्या काळात नवीन अंगणवाडी बांधकामाला प्राधान्य राहणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी यावेळी दिली.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सभापती दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, अधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत पाणी टंचाई, रस्त्यांची कामे आणि अंगणवाडी बांधकाम यावर चर्चा करण्यात आली. दुर्गम भागात अनेक अंगणवाडय़ा या कुडाच्या घरात किंवा कच्चा घरात भरत असतात. त्यामुळे नवीन अंगणवाडय़ांना मंजुरी मिळावी अशी मागणी सदस्या संध्या पाटील यांनी केली. अक्कलकुवातील केशवनगर भागात चक्क सार्वजनिक शौचालयांच्या बाजुला अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. एकीकडे प्रशासन अंगणवाडींच्या माध्यमातून कुपोषण दूर करण्याचा प्रय} करीत आहे तर दुसरीकडे अशा पद्धतीने बालकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही जागा कुणी सुचवली व कुणी मंजूर केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. चौपाळे येथील तिन्ही अंगणवाडींची दुरवस्था झाली असल्याचे सागर धामणे यांनी सांगितले. नवापूर तालुक्यात अंगणवाडी भरतीत 50 हजार ते एक लाख रुपये उमेदवारांकडून घेतले जात असल्याचा आरोप रतन गावीत यांनी केला. त्याची चौकशीची मागणीही त्यांनी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी यांनी पुढील दोन वर्षात जेथे अंगणवाडी नाही तेथे नवीन बांधकाम करण्यात येईल. शिवाय दुरूस्तीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कामांवरील स्थगिती उठलीजिल्हा परिषदेने 50-54 योजनेअंतर्गत जवळपास 27 कोटींची कामे प्रस्तावीत केली होती. या कामांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील स्थगिती उठविण्यात आली असून या कामांना लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. दुर्गम भागातील ही कामे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दुष्काळी कामांकडे दुर्लक्षधडगाव तालुक्यातील दुष्काळी कामांसदर्भात रतन पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला. अतिदुर्गम भागातील कुपनलिकांना पाणी नाही, हातपंप नादुरूस्त आहेत. ज्या ठिकाणी कुपनलिका केल्या आहेत त्या ठिकाणी हातपंपाचे साहित्य बसविण्यात आलेले नाही. सपाटीवरील भागात कामे होतात परंतु दुर्गम व आडवळणारील गाव व पाडय़ांवर कामे केली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी अशा गावांचा सव्र्हे करून लागलीच कामे करावी व टंचाईबाबत माहिती द्यावी अशा सुचना अधिका:यांना दिल्या. यावेळी इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला पुलवामा अतिरेकी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी आपला परिचय करून दिला.