शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञानाचा अंधार दूर करणारी तरुणांची ‘टोळी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:33 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपण ज्या परिसरातून आलो त्या परिसरातील लोकांसाठी काही तरी करावे या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आपण ज्या परिसरातून आलो त्या परिसरातील लोकांसाठी काही तरी करावे या उद्देशाने एकत्र आलेल्या पुण्यातील खान्देशी तरुणांनी जिल्ह्यातील तब्बल २०० पेक्षा अधिक शाळांमध्ये वाचनालये सुरू केली आहेत. आपल्या उत्पन्नातील काही रक्कम या सेवा कार्यासाठी देऊन सुरू झालेला सेवेचा हा यज्ञ अखंड तेवत ठेवण्यासाठी या तरुणांची धडपड सुरू आहे.चार वर्षापूर्वी पुण्यात नोकरीनिमित्ताने कार्यरत असलेल्या कोठली, ता.शहादा येथील प्रवीण सुरेश महाजन या तरुणाला आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी काही केले पाहिजे ही कल्पना सूचली. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनीच त्यांनी जिल्ह्यातीलच काही ठराविक तरुणांना एकत्र करून त्याची कल्पना दिली आणि त्यातूनच ‘युवक मित्र परिवारा’ची स्थापना झाली. नंदुरबार जिल्हा हा विशेषत: राज्यातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा असल्याने या भागातील विनाअनुदानित व आदिवासी भागातील शाळांना पुस्तकाचे दान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी आपल्या उत्पन्नातील एक टक्का रक्कम दर महिन्याला गोळा करावी आणि त्यातून हे सेवा कार्य सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पाहता पाहता या युवक मित्र परिवारात नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातील ५० पेक्षा अधिक मित्र सहभागी झाले. हा मित्र परिवार आदिवासी भागातील शाळेला २०० पुस्तके भेट देऊन तेथे वाचनालय सुरू करतात. आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शाळा तसेच जळगाव जिल्ह्यातील आठ शाळांमध्ये असे वाचनालय सुरू झाले आहेत.याशिवाय जुने संगणकांची खरेदी करून तेदेखील आवश्यक असलेल्या शाळांना ते पुरवतात. या योजनेत ९८ शाळांना त्यांनी विनामूल्य संगणक पुरविले आहेत. त्यांच्या या कार्याला योगदान देण्यासाठी पुण्यातच सवलतीच्या दरात पुस्तके आणि संगणक देणारे विक्रेतेही पुढे आले आहेत.आता संगणकाबरोबरच आवश्यक त्या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरे व इतर शालेय वस्तूही हे युवक मोफत उपलब्ध करून देत आहेत. गेल्या चार वर्षापासून सुरू असलेली ही सामाजिक चळवळ अखंडपणे सुरू असून त्याला भविष्यातही खंड न पडण्याबाबत हे युवक काळजी घेत आहेत.साक्षरतेच्या बाबतीत सर्वात शेवट असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात वाचन चळवळ वृद्धींगत व्हावी व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने आम्ही मित्र परिवार एकत्र आलो आहोत. आमच्या कार्याला हातभार लावण्यासाठी अनेक दाते पुढे येत असतात. शिवाय मित्र परिवारातर्फे उत्पन्नातील एक टक्का रक्कम दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एकत्र केली जाते. त्यातूनच हे कार्य सुरू असून त्यात खरोखरच आनंद मिळतो.-प्रवीण महाजन, कोठली, ता.शहादा.