शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 10:58 IST

डॉ़ राजेंद्रसिह : जलव्यवस्थापनाबाबत गावो-गावी जनजागृती आवश्यक

ठळक मुद्देनंदुरबार, यवतमाळ जिल्हे प्रायोगिक तत्वावर जल व्यवस्थापनाच्या संदर्भात राज्यातील नंदुरबार व यवतमाळ हे दोन जिल्हे शासनाने प्रायोगिक तत्वावर घेतले आहे. या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे सुरू झालेली आहेत. यासाठी गावक:यांनी जल व्यवस्थापनाच्या सुक्ष्म आराखडा त

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सध्या मुबलक प्रमाणात पाणी असले तरी भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे व्यवस्थापन करा. यासाठी गट बनवून त्यात अनुभवी व्यक्तींसोबत महिला, तरूणींचा समावेश करून गावा-गावात जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी अशी अपेक्षा जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी व्यक्त             केली़तळोदा तालुक्यातील कालीबेल येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने पाणी परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी यशदाचे समन्वयक डॉ.सुमंत पाडे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, प्रा.जयपाल शिंदे,              सरपंच मान्याभाऊ पावरा,            नाटय़ाभाऊ पावरा आदी उपस्थित होते. डॉ.सिंह गावक:यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, सद्या             मोठय़ा प्रमाणात दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. वाळवंटा पेक्षा इकडे ब:याच प्रमाणात मुबलक पाणी आहे. मात्र भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जानवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावक:यांनी आतापासूनच गावाचे, परिसराचे जलव्यवस्थापन केले पाहिजे. त्यासाठी उस, केळी सारखी पाण्याची पिके घेऊ नका. कमी पाण्यात येणारी पिके घ्या. शिवाय गावा-गावात ग्रामस्थांमध्ये जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती करा. याकरीता गट बनवून त्यात अनुभवी व्यक्ती, महिला व तरूणांना सहभागी करून जलव्यवस्थापन करणा:या आदर्श गावांना भेटी द्या, असेही त्यांनी सांगितल़े या वेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या आदिवासी गावाचे उदाहरण दिले. या गावात फक्त 75 कुटुंबे राहतात.              त्यांनी पाण्याचे  उत्तम व्यवस्थापन केल़े शासनाने त्यांना 1200                   हेक्टर जमीन देवून बांबूची लागवड केली. त्यामुळे त्यांना शासनाचा प्रचंड निधी मिळून गावाचा विकास साधला आहे. आपणही या गावाचा आदर्श घेत प्रत्येकाने जल व्यवस्थापन केल्यास पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार नसल्याचेही ते म्हणाल़े  या वेळी यशदाचे डॉ.पांडे, प्रतिभा शिंदे, तहसीलदार चंद्रे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचानल निशांत मगरे तर आभार दिलवरसिंग वळवी यांनी मानले. कार्यक्रमास कालीबेल गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.