शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे भवितव्य पाणीसाठय़ावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:45 IST

24 तास पाणीपुरवठा : योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर

नंदुरबार : शहराला 24 तास पाणी पुरवठा करणा:या योजनेला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. सद्य स्थितीत पालिकेने तयार केलेला अहवाल जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मंजुरीसाठी गेला आहे. योजना मंजुर झाली तरी यंदा ती कार्यान्वीत होणार नाही हे स्पष्टच आहे. आधीच विरचक प्रकल्पात अवघा 38 टक्के पाणीसाठा आहे. येत्या काळात त्यात आणखी घट होण्याच्या शक्यतेमुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची जाणवणार आहे. परिणामी योजना राबविण्यास अडचणी येतील.नंदुरबार शहराला पाणी पुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षीत केला जातो. प्रकल्प किमान 60 टक्के भरला तरी वर्षभर शहराला दोनवेळा नियमित पाणीपुरवठा होईल एवढी त्याची क्षमता आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून अपु:या पजर्न्यमानामुळे हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कधीही भरला नाही. यंदा देखील प्रकल्पात पुर्ण पावसाळ्यात केवळ 20 टक्के पाणीसाठय़ात वाढ झाली. आधीचा 22 टक्के व नव्याने भर पडलेल्या 20 टक्के साठय़ानुसार 42 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. गेल्या दोन महिन्यात त्यात आणखी चार टक्यांनी घट होऊन साठा 38 टक्यांवर आला आहे. येत्या काळात आणखी घट होण्याचे प्रमाण पहाता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.24 तास पाणीपुरवठाची योजनापालिकेने शिरपूर नगरपालिकेच्या धर्तीवर 24 तास पाणी पुरवठय़ाची योजना आखली आहे. आठवडय़ाचे सातही दिवस 24 तास पाणी अर्थात 24 बाय 7 असे या योजनेचे नाव आहे. यासाठी मात्र, प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला मिटर बसविण्यात येणार आहे. या योजनेचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाकडे आता तांत्रीक मंजुरीसाठी ती पाठविण्यात आली आहे. या योजनेसाठी काही ठिकाणी नवीन पाईपलाईन तर काही ठिकाणी जलकुंभ उभारून झोन तयार करावे लागणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे.पाणीसाठय़ाची गरजही योजना राबविण्यासाठी विरचक प्रकल्पात दरवर्षी पावसाळ्यात किमान 50 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा होणे आवश्यक आहे. तरच 24 तास नळांना पाणी राहू शकते. गेल्या काही वर्षातील पावसाळा आणि एकुणच प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता अपवादात्मक स्थितीत प्रकल्पातील पाणीसाठा 50 टक्केपेक्षा अधीक गेला आहे. त्यामुळे योजनेचे भवितव्य संपुर्णपणे या प्रकल्पातील पाणीसाठय़ावरच राहणार आहे. त्यामुळे विरचकसह आंबेबारा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. पाणीसाठा आरक्षीतयंदा पालिकेने विरचकसह आंबेबारा धरणातील संपुर्ण पाणीसाठा आरक्षीत केला आहे. आंबेबारा प्रकल्पही यंदा 70 टक्केच भरला होता. सद्य स्थितीत आंबेबारा प्रकल्पातही 55 ते 60 टक्के पाणीसाठा आहे. आंबेबारा धरणातून शिवणनदीतील चारीद्वारे पाणी आष्टे येथील पंपींग स्टेशनर्पयत आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठवून ते शहरात पुरविले जाते. शहरातील उंचावरील भागात नळांना पाणी येण्याचे प्रमाण कमी आहे. 40 ते 50 मिनिटांच्या पाणीपुरवठय़ाच्या वेळेत अवघा दहा ते 15 मिनिटे अशा भागात पाणीपुरवठा होतो. त्यात प्रामुख्याने ज्ञानदीप सोसायटीचा उंचावरील भाग, वाघेश्वरी टेकडीच्या उंचावरील भाग, संजय नगरचा काही भाग यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा भागात पालिकेने पर्यायी उपाययोजना करून पुरेसा पाणीपुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या भागांमधील नागरिकांमधून होत आहे.