शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

योजनेचे भवितव्य पाणीसाठय़ावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:45 IST

24 तास पाणीपुरवठा : योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर

नंदुरबार : शहराला 24 तास पाणी पुरवठा करणा:या योजनेला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. सद्य स्थितीत पालिकेने तयार केलेला अहवाल जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मंजुरीसाठी गेला आहे. योजना मंजुर झाली तरी यंदा ती कार्यान्वीत होणार नाही हे स्पष्टच आहे. आधीच विरचक प्रकल्पात अवघा 38 टक्के पाणीसाठा आहे. येत्या काळात त्यात आणखी घट होण्याच्या शक्यतेमुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची जाणवणार आहे. परिणामी योजना राबविण्यास अडचणी येतील.नंदुरबार शहराला पाणी पुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षीत केला जातो. प्रकल्प किमान 60 टक्के भरला तरी वर्षभर शहराला दोनवेळा नियमित पाणीपुरवठा होईल एवढी त्याची क्षमता आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून अपु:या पजर्न्यमानामुळे हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कधीही भरला नाही. यंदा देखील प्रकल्पात पुर्ण पावसाळ्यात केवळ 20 टक्के पाणीसाठय़ात वाढ झाली. आधीचा 22 टक्के व नव्याने भर पडलेल्या 20 टक्के साठय़ानुसार 42 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. गेल्या दोन महिन्यात त्यात आणखी चार टक्यांनी घट होऊन साठा 38 टक्यांवर आला आहे. येत्या काळात आणखी घट होण्याचे प्रमाण पहाता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.24 तास पाणीपुरवठाची योजनापालिकेने शिरपूर नगरपालिकेच्या धर्तीवर 24 तास पाणी पुरवठय़ाची योजना आखली आहे. आठवडय़ाचे सातही दिवस 24 तास पाणी अर्थात 24 बाय 7 असे या योजनेचे नाव आहे. यासाठी मात्र, प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला मिटर बसविण्यात येणार आहे. या योजनेचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाकडे आता तांत्रीक मंजुरीसाठी ती पाठविण्यात आली आहे. या योजनेसाठी काही ठिकाणी नवीन पाईपलाईन तर काही ठिकाणी जलकुंभ उभारून झोन तयार करावे लागणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे.पाणीसाठय़ाची गरजही योजना राबविण्यासाठी विरचक प्रकल्पात दरवर्षी पावसाळ्यात किमान 50 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा होणे आवश्यक आहे. तरच 24 तास नळांना पाणी राहू शकते. गेल्या काही वर्षातील पावसाळा आणि एकुणच प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता अपवादात्मक स्थितीत प्रकल्पातील पाणीसाठा 50 टक्केपेक्षा अधीक गेला आहे. त्यामुळे योजनेचे भवितव्य संपुर्णपणे या प्रकल्पातील पाणीसाठय़ावरच राहणार आहे. त्यामुळे विरचकसह आंबेबारा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. पाणीसाठा आरक्षीतयंदा पालिकेने विरचकसह आंबेबारा धरणातील संपुर्ण पाणीसाठा आरक्षीत केला आहे. आंबेबारा प्रकल्पही यंदा 70 टक्केच भरला होता. सद्य स्थितीत आंबेबारा प्रकल्पातही 55 ते 60 टक्के पाणीसाठा आहे. आंबेबारा धरणातून शिवणनदीतील चारीद्वारे पाणी आष्टे येथील पंपींग स्टेशनर्पयत आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठवून ते शहरात पुरविले जाते. शहरातील उंचावरील भागात नळांना पाणी येण्याचे प्रमाण कमी आहे. 40 ते 50 मिनिटांच्या पाणीपुरवठय़ाच्या वेळेत अवघा दहा ते 15 मिनिटे अशा भागात पाणीपुरवठा होतो. त्यात प्रामुख्याने ज्ञानदीप सोसायटीचा उंचावरील भाग, वाघेश्वरी टेकडीच्या उंचावरील भाग, संजय नगरचा काही भाग यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा भागात पालिकेने पर्यायी उपाययोजना करून पुरेसा पाणीपुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या भागांमधील नागरिकांमधून होत आहे.