शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

योजनेचे भवितव्य पाणीसाठय़ावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:45 IST

24 तास पाणीपुरवठा : योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर

नंदुरबार : शहराला 24 तास पाणी पुरवठा करणा:या योजनेला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. सद्य स्थितीत पालिकेने तयार केलेला अहवाल जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मंजुरीसाठी गेला आहे. योजना मंजुर झाली तरी यंदा ती कार्यान्वीत होणार नाही हे स्पष्टच आहे. आधीच विरचक प्रकल्पात अवघा 38 टक्के पाणीसाठा आहे. येत्या काळात त्यात आणखी घट होण्याच्या शक्यतेमुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची जाणवणार आहे. परिणामी योजना राबविण्यास अडचणी येतील.नंदुरबार शहराला पाणी पुरवठय़ासाठी विरचक प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षीत केला जातो. प्रकल्प किमान 60 टक्के भरला तरी वर्षभर शहराला दोनवेळा नियमित पाणीपुरवठा होईल एवढी त्याची क्षमता आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून अपु:या पजर्न्यमानामुळे हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कधीही भरला नाही. यंदा देखील प्रकल्पात पुर्ण पावसाळ्यात केवळ 20 टक्के पाणीसाठय़ात वाढ झाली. आधीचा 22 टक्के व नव्याने भर पडलेल्या 20 टक्के साठय़ानुसार 42 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. गेल्या दोन महिन्यात त्यात आणखी चार टक्यांनी घट होऊन साठा 38 टक्यांवर आला आहे. येत्या काळात आणखी घट होण्याचे प्रमाण पहाता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.24 तास पाणीपुरवठाची योजनापालिकेने शिरपूर नगरपालिकेच्या धर्तीवर 24 तास पाणी पुरवठय़ाची योजना आखली आहे. आठवडय़ाचे सातही दिवस 24 तास पाणी अर्थात 24 बाय 7 असे या योजनेचे नाव आहे. यासाठी मात्र, प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला मिटर बसविण्यात येणार आहे. या योजनेचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाकडे आता तांत्रीक मंजुरीसाठी ती पाठविण्यात आली आहे. या योजनेसाठी काही ठिकाणी नवीन पाईपलाईन तर काही ठिकाणी जलकुंभ उभारून झोन तयार करावे लागणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे.पाणीसाठय़ाची गरजही योजना राबविण्यासाठी विरचक प्रकल्पात दरवर्षी पावसाळ्यात किमान 50 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा होणे आवश्यक आहे. तरच 24 तास नळांना पाणी राहू शकते. गेल्या काही वर्षातील पावसाळा आणि एकुणच प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता अपवादात्मक स्थितीत प्रकल्पातील पाणीसाठा 50 टक्केपेक्षा अधीक गेला आहे. त्यामुळे योजनेचे भवितव्य संपुर्णपणे या प्रकल्पातील पाणीसाठय़ावरच राहणार आहे. त्यामुळे विरचकसह आंबेबारा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. पाणीसाठा आरक्षीतयंदा पालिकेने विरचकसह आंबेबारा धरणातील संपुर्ण पाणीसाठा आरक्षीत केला आहे. आंबेबारा प्रकल्पही यंदा 70 टक्केच भरला होता. सद्य स्थितीत आंबेबारा प्रकल्पातही 55 ते 60 टक्के पाणीसाठा आहे. आंबेबारा धरणातून शिवणनदीतील चारीद्वारे पाणी आष्टे येथील पंपींग स्टेशनर्पयत आणले जाते. तेथील विहिरीत पाणी साठवून ते शहरात पुरविले जाते. शहरातील उंचावरील भागात नळांना पाणी येण्याचे प्रमाण कमी आहे. 40 ते 50 मिनिटांच्या पाणीपुरवठय़ाच्या वेळेत अवघा दहा ते 15 मिनिटे अशा भागात पाणीपुरवठा होतो. त्यात प्रामुख्याने ज्ञानदीप सोसायटीचा उंचावरील भाग, वाघेश्वरी टेकडीच्या उंचावरील भाग, संजय नगरचा काही भाग यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा भागात पालिकेने पर्यायी उपाययोजना करून पुरेसा पाणीपुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या भागांमधील नागरिकांमधून होत आहे.