शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

थंब मशीनच्या वारंवारच्या नादुरुस्तीमुळे कर्मचारी कंटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदसाठी असलेल्या तीन थंब मशीन वारंवार बंद राहत असल्यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. ...

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदसाठी असलेल्या तीन थंब मशीन वारंवार बंद राहत असल्यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. मशीनवर तांत्रिक कारणामुळे गैरहजर नोंदले गेल्यास वरिष्ठाकडून नोटिसीला सामोरे जावे लागते. दररोज सकाळी सव्वानऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास व सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास थंब मशीनजवळ कर्मचाऱ्यांची गर्दी होते, रांगा लागतात. जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी थंब मशीन बसविण्यात आले आहेत. तीन थंब मशीन असूनही त्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या वेळी नेटवर्क नसणे, बिघाड होणे या कारणांमुळे वारंवार बंद राहत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळची उपस्थिती नोंद करण्यास अर्थात थंब करण्यास अडचणी येतात. काही वेळा निर्धारित वेळ निघून जाते. त्यामुळे लेटमार्क लावला जातो किंवा गैरहजर अशी नोंद केली जाते. त्यामुळे वरिष्ठांकडून आलेल्या नोटिसीला तोंड द्यावे लागते. वास्तविक कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर राहूनही केवळ थंब मशीनच्या तांत्रिक कारणामुळे किंवा नादुरुस्तीमुळे कर्मचाऱ्यांना लेटमार्क किंवा गैरहजर नोंदीला सामोरे जावे लागते. दररोजची ही समस्या निर्माण झाली आहे. मशीन दुरुस्त करावेत, प्रभावी इंटरनेट नेटवर्क जोडावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे. अन्यथा आणखी मशीन वाढवाव्या अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.