शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जाची ‘प्रतिक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १४ हजार शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १४ हजार शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा आठ जुलै रोजी करण्यात आली होती़ यानुसार शेतकऱ्यांसाठी शासनाने ९९ कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर ही रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात आली होती़ परंतु यानंतर मात्र कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळालेले नाही़एक महिन्यापूर्वी शासनाने जिल्हा प्रशासनाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनंतर पीक कर्ज वाटपात गती येऊन शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळणे गरजेचे होते़ परंतू आॅगस्ट महिन्याच्या चार तारखेपर्यंत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद असलेले कर्जमुक्त शेतकरी पीककर्जाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले होते़ जिल्हा बँकेने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८८ टक्के कर्ज वाटप केल्याची माहिती देण्यात आली आहे़ मात्र वाटप केलेले कर्ज हे मागील वर्षाच्या नियमित शेतकºयांनाच दिल्याचे सांगण्यात आले आहे़ उर्वरित कर्ज हे विविध कार्यकारी संस्थेच्या सभासदांना देण्यात आले आहे़ यातून शेतकºयांची स्पष्ट संख्या अद्यापही समोर आलेली नाही़ दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज अद्यापही संथ गतीने सुरू आहे़ गेल्या महिन्यात १० टक्के कर्जवाटप करणाºया राष्ट्रीयकृत बँकांची प्रगती ही १५ टक्क्यांपर्यंतच असल्याची माहिती आहे़ दरम्यान कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांना नव्याने कर्ज मिळण्यास बँकांचे कामकाज कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे़ कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांच्या याद्या गावोगावी, बँकांच्या शाखांबाहेर लावण्याचे आदेश होते़ परंतु बँकांनी अशा प्रकारे कारवाई केली नाही़ आॅनलाईन पद्धतीने याद्या प्रसिद्ध केल्या़ परंतु आदिवासी बहुल भागात शेतकºयांना आॅनलाईनेच ज्ञान नसल्याने ‘ते’ कर्जमुक्त झाले याची माहिती उशिराने त्यांच्यापर्यंत पोहोचून नवीन कर्ज मिळण्यापासून ते वंचित राहिले आहेत़४शासनाकडून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ११८ लाभार्थी शेतकºयांसाठी ६५ कोटी ५ लाख तर इतर बँकांच्या ३ हजार ८०२ लाभार्थींना ३४ कोटी १९ लाख रुपयांचा निधी देत थकीत खाती निल करण्यात आली आहेत़४जिल्हा बँकेच्या १० हजार शेतकºयांची खाती निल झाल्याने नियमित चार हजार आणि खाती निल झालेले १० हजार अशा १४ हजार शेतकºयांना पीक कर्ज मिळणे अपेक्षित होते़ परंतू आजअखेरीस केवळ ६ हजार ९९७ शेतकरी आणि २२८ विविध कार्यकारी संस्थांना पिक कर्ज वितरीत करण्यात आला आहे़बँकेने ५३ कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज शेतकºयांना वाटप केले असून ८८ टक्के कर्ज यंदाच्या हंगामात वाटप केल्याचे सांगण्यात आले आहे़दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांना यंदा किमान ४५ कोटी ७३ लाख रूपयांचा पीक कर्ज वाटपाचा लक्षांक देण्यात आला होता़ खाजगी, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँक मिळून ही रक्कम ५९ कोटी रूपयांपर्यंत जाणे अपेक्षित होते़ परंतु गेल्या महिन्यात बँकांनी केवळ १० टक्के कर्ज वाटप केले होते़ आतापर्यंत या बँक कर्जवाटपात मागेच आहेत़ सुमारे चार हजार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप झाल्याचे समजते़राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँक यांनी कोणत्या पिकासाठी कर्ज वाटप केले हेही यंदा समजून घेणे महत्त्वाचे आहे़ जिल्हा बँकेने बहुतांश शेतकºयांना ऊसासाठी कर्ज दिल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू जिल्ह्यात ऊसाचे हेक्टरी क्षेत्र कमी आहे़ ऊसासाठी शेतकºयांना कर्जाचा पुरवठा हा जादा असायला हवा परंतु बँक मात्र १० ते २० हजार रूपयात कर्ज देऊन शेतकºयांची बोळवण करत आहे़ राज्यातील इतर भागात ऊसाचा पेरा करणाºया शेतकºयांना किमान दीड ते दोन लाख रूपये पीक कर्ज देण्यात येते़