शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जाची ‘प्रतिक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १४ हजार शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १४ हजार शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा आठ जुलै रोजी करण्यात आली होती़ यानुसार शेतकऱ्यांसाठी शासनाने ९९ कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर ही रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात आली होती़ परंतु यानंतर मात्र कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळालेले नाही़एक महिन्यापूर्वी शासनाने जिल्हा प्रशासनाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनंतर पीक कर्ज वाटपात गती येऊन शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळणे गरजेचे होते़ परंतू आॅगस्ट महिन्याच्या चार तारखेपर्यंत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभासद असलेले कर्जमुक्त शेतकरी पीककर्जाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले होते़ जिल्हा बँकेने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८८ टक्के कर्ज वाटप केल्याची माहिती देण्यात आली आहे़ मात्र वाटप केलेले कर्ज हे मागील वर्षाच्या नियमित शेतकºयांनाच दिल्याचे सांगण्यात आले आहे़ उर्वरित कर्ज हे विविध कार्यकारी संस्थेच्या सभासदांना देण्यात आले आहे़ यातून शेतकºयांची स्पष्ट संख्या अद्यापही समोर आलेली नाही़ दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज अद्यापही संथ गतीने सुरू आहे़ गेल्या महिन्यात १० टक्के कर्जवाटप करणाºया राष्ट्रीयकृत बँकांची प्रगती ही १५ टक्क्यांपर्यंतच असल्याची माहिती आहे़ दरम्यान कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांना नव्याने कर्ज मिळण्यास बँकांचे कामकाज कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे़ कर्जमुक्त झालेल्या शेतकºयांच्या याद्या गावोगावी, बँकांच्या शाखांबाहेर लावण्याचे आदेश होते़ परंतु बँकांनी अशा प्रकारे कारवाई केली नाही़ आॅनलाईन पद्धतीने याद्या प्रसिद्ध केल्या़ परंतु आदिवासी बहुल भागात शेतकºयांना आॅनलाईनेच ज्ञान नसल्याने ‘ते’ कर्जमुक्त झाले याची माहिती उशिराने त्यांच्यापर्यंत पोहोचून नवीन कर्ज मिळण्यापासून ते वंचित राहिले आहेत़४शासनाकडून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ११८ लाभार्थी शेतकºयांसाठी ६५ कोटी ५ लाख तर इतर बँकांच्या ३ हजार ८०२ लाभार्थींना ३४ कोटी १९ लाख रुपयांचा निधी देत थकीत खाती निल करण्यात आली आहेत़४जिल्हा बँकेच्या १० हजार शेतकºयांची खाती निल झाल्याने नियमित चार हजार आणि खाती निल झालेले १० हजार अशा १४ हजार शेतकºयांना पीक कर्ज मिळणे अपेक्षित होते़ परंतू आजअखेरीस केवळ ६ हजार ९९७ शेतकरी आणि २२८ विविध कार्यकारी संस्थांना पिक कर्ज वितरीत करण्यात आला आहे़बँकेने ५३ कोटी ७५ लाख रूपयांचे कर्ज शेतकºयांना वाटप केले असून ८८ टक्के कर्ज यंदाच्या हंगामात वाटप केल्याचे सांगण्यात आले आहे़दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांना यंदा किमान ४५ कोटी ७३ लाख रूपयांचा पीक कर्ज वाटपाचा लक्षांक देण्यात आला होता़ खाजगी, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँक मिळून ही रक्कम ५९ कोटी रूपयांपर्यंत जाणे अपेक्षित होते़ परंतु गेल्या महिन्यात बँकांनी केवळ १० टक्के कर्ज वाटप केले होते़ आतापर्यंत या बँक कर्जवाटपात मागेच आहेत़ सुमारे चार हजार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप झाल्याचे समजते़राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँक यांनी कोणत्या पिकासाठी कर्ज वाटप केले हेही यंदा समजून घेणे महत्त्वाचे आहे़ जिल्हा बँकेने बहुतांश शेतकºयांना ऊसासाठी कर्ज दिल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू जिल्ह्यात ऊसाचे हेक्टरी क्षेत्र कमी आहे़ ऊसासाठी शेतकºयांना कर्जाचा पुरवठा हा जादा असायला हवा परंतु बँक मात्र १० ते २० हजार रूपयात कर्ज देऊन शेतकºयांची बोळवण करत आहे़ राज्यातील इतर भागात ऊसाचा पेरा करणाºया शेतकºयांना किमान दीड ते दोन लाख रूपये पीक कर्ज देण्यात येते़