शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
4
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
5
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
6
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
7
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
8
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
9
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
10
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
11
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
12
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
13
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
14
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
15
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
16
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
17
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
18
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
19
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

बिबट्याने केल्या चार शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा येथील जुना उटावदकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा येथील जुना उटावदकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या शेताच्या बांधावर रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान बिबट्याने चार शेळ्या फस्त केल्याची घटना घडली. बिबट्याचे वाढते हल्ले चिंताजनक झाले असून वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.रविवारी दुपारी गोविंद अशोक पाडवी हे आपल्याकडील आठ-दहा शेळ्या घेऊन उटावद शिवारात चारण्यासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास त्याने शेळ्या चरण्यासाठी सोडल्या व एका झाडाच्या आडोशाला जाऊन बसला. तीन वाजेच्या सुमारास सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या शेताच्या बांधावर बिबट्याने कळपावर हल्ला चढवला. त्यात चार शेळ्या फस्त केल्या. घडलेला प्रकार रखवालदार कालूसिंग बबन वळवी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या एक शेळी बाजूच्या उसाच्या शेतात ओढून नेण्यात यशस्वी ठरला. याबाबत वनविभागाला वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. या बिबट्यास तात्काळ जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.मागील आठवड्यात बिबट्याने याच परिसरात हातोडा रस्त्यावरील चंदनवेली परिसरात मानवी वस्तीत दर्शन दिले होते. मागील आठवडाभरापासून अमरधाम परिसरातही बिबट्या वेळोवेळी निदर्शनास आला आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावलेला आहे. मात्र पिंजºयात शिकार न ठेवल्यामुळे बिबट्याने पिंजºयाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना वनविभाग मात्र निद्रावस्थेत आहे. घटनेनंतर कार्यवाही करण्यापेक्षा हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नये, त्यांना जंगलातच सुरक्षितता वाटावी, अशा उपाययोजनांकडे वनविभााने दुर्लक्ष केले आहे. यामुळे उपाययोजनांसाठी वनविभाग अजून किती बळींची वाट पाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.