शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पंचायत समिती सभापती पदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सद्या १० सदस्यीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सद्या १० सदस्यीय पंचायत समितीत काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांचे सारखेच बलाबल असल्यामुळे पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असली तरी पहिल्या चान्स वरून ती फोल ठरल्याचे बोलले जाते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर सभापती, उपसभापतींचे भवितव्य ठरणार आहे.तळोदा पंचायत समितीवर आतापावेतो काँग्रेस पक्षाने सत्ता काबीज केली होती. परंतु नुकत्याच झालेल्या निवणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या तीन गटांसह पंचायत समितीच्या १० पैकी पाच जागा काँग्रेसकडून हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे १० सदस्यीय पंचायत समितीत या दोन्ही पक्षांचे सारखेच बलाबल झाल्यामुळे पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.पंचायत समितीतील रंगणाऱ्या अशा सत्ता संघर्षाकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्यातच सभापती व उपसभापतींच्या निवडणूक येत्या १६ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षाच्या सभापतींचे आरक्षणदेखील जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले आहे. आरक्षणानुसार सभापतीपद हे अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे. म्हणजे सभापतीपदासाठी आदिवासी पुरूष व महिला या दोघ सदस्यांना समान संधी आहे. काँग्रेसकडे चार महिला सदस्या निवडून आल्या आहेत तर भाजपाकडे एकच महिला सदस्या निवडून आली आहे.पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भाजपा व काँग्रेसच्या दोन्ही स्थानिक नेत्यांमध्ये सत्तेच्या अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु दोघा नेत्यांनी पहिल्यांदा अडीच वर्षाच्या सभापतींचा दावा केल्यामुळे ही चर्चा मध्येच फिसकटल्याचीही चर्चा आहे. त्यातच दोघा पक्षांनी आपापले सदस्य बाहेर गावी सहलीकरीता पाठविल्यामुळे फोडा-फोडीचा संवाददेखील थांबला असल्याचे बोलले जात आहे. सभापती-उपसभापतींची अधिकृत निवडणूक घेतली जाणार असली तरी समसमान संख्येमुळे या पदाधिकाऱ्यांचे भवितव्य ईश्वर चिठ्ठीमुळेच शेवटी ठरणार आहे. साहजिकच कोणत्या सदस्यांना ईश्वर पावन होतो. याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.