शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

तळोदा पंचायत समिती सभापती पदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सद्या १० सदस्यीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सद्या १० सदस्यीय पंचायत समितीत काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांचे सारखेच बलाबल असल्यामुळे पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असली तरी पहिल्या चान्स वरून ती फोल ठरल्याचे बोलले जाते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर सभापती, उपसभापतींचे भवितव्य ठरणार आहे.तळोदा पंचायत समितीवर आतापावेतो काँग्रेस पक्षाने सत्ता काबीज केली होती. परंतु नुकत्याच झालेल्या निवणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या तीन गटांसह पंचायत समितीच्या १० पैकी पाच जागा काँग्रेसकडून हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे १० सदस्यीय पंचायत समितीत या दोन्ही पक्षांचे सारखेच बलाबल झाल्यामुळे पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.पंचायत समितीतील रंगणाऱ्या अशा सत्ता संघर्षाकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्यातच सभापती व उपसभापतींच्या निवडणूक येत्या १६ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षाच्या सभापतींचे आरक्षणदेखील जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले आहे. आरक्षणानुसार सभापतीपद हे अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे. म्हणजे सभापतीपदासाठी आदिवासी पुरूष व महिला या दोघ सदस्यांना समान संधी आहे. काँग्रेसकडे चार महिला सदस्या निवडून आल्या आहेत तर भाजपाकडे एकच महिला सदस्या निवडून आली आहे.पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भाजपा व काँग्रेसच्या दोन्ही स्थानिक नेत्यांमध्ये सत्तेच्या अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु दोघा नेत्यांनी पहिल्यांदा अडीच वर्षाच्या सभापतींचा दावा केल्यामुळे ही चर्चा मध्येच फिसकटल्याचीही चर्चा आहे. त्यातच दोघा पक्षांनी आपापले सदस्य बाहेर गावी सहलीकरीता पाठविल्यामुळे फोडा-फोडीचा संवाददेखील थांबला असल्याचे बोलले जात आहे. सभापती-उपसभापतींची अधिकृत निवडणूक घेतली जाणार असली तरी समसमान संख्येमुळे या पदाधिकाऱ्यांचे भवितव्य ईश्वर चिठ्ठीमुळेच शेवटी ठरणार आहे. साहजिकच कोणत्या सदस्यांना ईश्वर पावन होतो. याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.