शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वनकायदा मसुदा अखेर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र सरकारने वन कायदा 1927 मध्ये बदल करून जंगल विभागाचे अधिकार वाढवून आदिवासींना जंगलातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र सरकारने वन कायदा 1927 मध्ये बदल करून जंगल विभागाचे अधिकार वाढवून आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्याचे षड्यंत्र रचत या कायद्यात बदल करण्यासाठी नवा मसुदा जारी केला होता. त्याला सर्व आदिवासी क्षेत्रातून जन संघटनांतर्फे विरोध करण्यात       आला. त्यामुळे केंद्राचा वन कायद्याचा नवीन मसुदा अखेर मागे घेण्यात आला.या कायद्यात वन विभागातील अधिकारात पोलिसांना असलेले अधिकार व कोर्टाला असलेले शिक्षेचे अधिकार असे दोन्ही अधिकार देण्याचे प्रस्तावित होते. एखादा माणूस संशयित असेल तर त्याच्यावर गोळी चालवण्याचे अधिकार त्यात दिले आहेत. गोळीबार करणा:या अधिका:यांविरुध्द कोणतीही कार्यवाही होणार नाही याचे आश्वासन म्हणजे सशस्त्र सेना विशेष बॉर्डरवरचे अधिकार वन  विभागाला देवून आदिवासींचे जीवन नेहमी असुरक्षित करण्याचे जणू सरकारने निश्चित केले होते, नवीन प्रस्तावित कायद्याच्या आराखडय़ात जंगलाला आग लागल्यावर पूर्ण गावाला शिक्षा केली जाईल, एकदा का केस दाखल झाली की, ती कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही अधिका:याला मागे घेता येणार नाही मग ती कितीही खोटी केस असू दे, या कायद्यात जंगल वनीकरण व वृक्षारोपणच्या नावा खाली   खाजगी कंपनीना देण्याचा अधिकार नमूद आहे  म्हणजे आपल्याला जंगलातून हाकलून काढण्याचे   मोठे षड्यंत्र यात होते, जंगल नष्ट झाले असे कारण देवून मिळालेले वन पट्टे व सामुदायिक वन अधिकार कधीही काढून घेण्याचे अधिकारही या मसुद्यात होते. आदिवासीवर सरळ सरळ कु:हाड चालवणे व खाजगीकरण करून अडाणी, अंबानी यांच्या ताब्यात देण्याचा सरकारच्या या कुट नितीला लोकसंघर्ष मोर्चाने तीव्र विरोध करीत जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा, अमळनेर व नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा व  धडगाव येथे मोर्चे काढून हा प्रस्तावित कायदा मागे घेण्यासंबंधी शासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकाशा व भुसावळ येथे त्यांच्या दौ:यात अडवून याबाबतीत निवेदन दिले होते.या वेळी देशभरातील वाढता विरोध बघून अखेर केंद्र शासनाने हा  मसुदा शासनाचा नव्हता तर वन विभागाने केलेला तो अभ्यास मसुदा  होता असे सांगत आम्ही हा मसुदा रद्द करीत आहोत असे जाहीर केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. या वेळी आदिवासींशिवाय जंगलांचे संरक्षण व संवर्धन होऊ शकत नाही आणि गेल्या काही काळात आदिवासींना दिलेल्या वन हक्कांमुळे देशात 13 हजार किलोमीटर वन आच्छादन वाढले आहे, असेही त्याननी सांगितले. शासनाने अखेर या कायद्यातील बदल रद्द केल्यामुळे संघटित आदिवासी समुहांच्या ऊलगुलानचे हे यश असून, लोकसंघर्ष मोर्चा या निर्णयाचे स्वागत करीत आहे, असे संघटनेच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले.

देशभरातील वाढता विरोध लक्षात घेता केंद्र शासनाने हा मसुदा शासनाचा नसून, वनविभागाने केलेला तो अभ्यास मसुदा असल्याचे सांगत तो रद्द करीत असल्याचे जाहीर केले.