शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

रिक्त जागांच्या अनुशेषावर लक्ष केंद्रीत : अनुसूचित जमाती कल्याण समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीन दिवसांपासून तळ ठोकुन असलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समिती शनिवारी रवाना होताच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेषचा मोठा प्रश्न असून तो दूर करण्यासाठी समिती काही शिफारशी करणार असल्याचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी स्पष्ट केले. विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरुवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीन दिवसांपासून तळ ठोकुन असलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समिती शनिवारी रवाना होताच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेषचा मोठा प्रश्न असून तो दूर करण्यासाठी समिती काही शिफारशी करणार असल्याचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी स्पष्ट केले. विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरुवारपासून जिल्ह्यात दाखल झाली होती. 15 सदस्यीय समिती होती. त्यापैकी 11 सदस्य दाखल झाले होते. त्यात समिती अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांच्यासह आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा,  आमदार संतोष टारफे, आमदार पास्कल धनारे, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा समावेश होता.समितीने पहिल्या दिवशी दिवसभर विविध विभागांचा आढावा घेतला. दुस:या दिवशी जिल्ह्यातील विविध 42 ठिकाणी समितीने भेटी दिल्या. काही ठिकाणी समितीसमोर समस्यांचा पाढा वाचण्यात आला तर काही ठिकाणी समितीला विविध बाबी प्रकर्षाने आढळून आल्या. रिक्त पदांचा अनुशेषजिल्ह्यात पेसा कायदा लागू आहे. पेसा कायद्याअंतर्गत रिक्त जागा सहसा ठेवता येत नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात तरी किमान समायोजन करावे लागते. परंतु ते देखील होत नसल्याची स्थिती जिल्ह्यात आहे. जिल्हाधिका:यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात वेळोवेळी शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत परंतु त्यावरही कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. ही बाब समितीसमोर प्रकर्षाने मांडण्यात आली. समितीने देखील बारकाईने माहिती घेत कुठल्या विभागात किती जागांचा अनुशेष आहे. त्या का भरल्या गेल्या नाहीत. त्या भरण्यासाठी काय प्रय} झाले याचा आढावा घेतला.समितीचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी अनौपचारिक बोलतांना रिक्त पदांचा अनुशेष भरून काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. समितीने केलेल्या अभ्यासानुसार आता अहवाल तयार करून तो शासनाकडे सोपविला जाणार आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असे अपेक्षीत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा आदिवासी व दुर्गम असला तरी येथील कामे चांगली आहेत. काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रय} झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.