शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बदलत्या जीवनशैलीमुळे ‘मनोविकारा’त भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अनुवांशिकपणे निर्माण झालेल्या आजाराची समस्या गंभीर बनली आहे. असे असतानाच धावपळ, वाढती स्पर्धा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अनुवांशिकपणे निर्माण झालेल्या आजाराची समस्या गंभीर बनली आहे. असे असतानाच धावपळ, वाढती स्पर्धा, कामांचा वाढता ताण अशा बदलत्या जीवनशैलीमुळे मनोविकारात अधिक भर पडत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत केवळ सहा महिन्यातच एकुण चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे.मानवाच्या न दिसणा:या आजारांमध्ये मनोविकार हा एक प्रमुख आजार असून या आजाराचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्यांची कारणेही वेगवेगळी दिसून येतात. त्यात जैविक हे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे. त्यात अनुवांशिकता, रसायनांचे कमी-अधिक प्रमाण, मानसशास्त्रीय कारण ही आहेत. बदलती जीवनशैली हे देखील मनोविकाराचे एक मोठे कारण आहे. बदलत्या जीवनशैलीतील कारणांमध्ये ताणतणाव, वाढती स्पर्धा, धावपळ, चिंता, कामांना वाढता ताण यासह अनेक कारणांचा उल्लेख करता येतो.  समाजात अनुवांशिक प्रकारातील प्रामुख्याने मनोविकारच आढळून येत होता.  परंतु दिवसेंदिवस जीवनशैलीत आमुलाग्र बदल होऊ लागल्यामुळे मनोविकाराच्या समस्यांमध्ये अन्य प्रकाराचा देखील शिरकाव झाल्याचे म्हटले जाते. सातत्याने चिंतन करणा:या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक दिसून येतो. अनुवांशिकपणे जडलेल्या मनोविकाराची समस्या गंभीर झाली. अनुवांशिकनंतर बदलत्या जीवनशैलीमुळेही मनोविकारात अधिक भर पडू लागली आहे.या समस्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य प्रशासनामार्फत नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गाव पातळीवरही मागील तीन वर्षापासून मानसोपचार पथक विविध घटकाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधी बाह्यरुग्ण विभागात तीन हजार 340 तर आंतररुग्ण विभागातून 201 रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय मासिक भेटींतर्गत 646 अशा एकुण चार हजार 187 रुग्णांवर उपचार झाल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आहे. 

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त दि.10 आक्टोबरपासून जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जनजागृतीसाठी सप्ताह राबविण्यात येत आहे. यात गुरुवारी जिल्हा रुग्णालयात रांगोळी स्पर्धा व पथनाटय़, शुक्रवारी नर्सिग महाविद्यालय पथराई येथे भित्तीपत्रक स्पर्धा, शनिवारी समाजकार्य महाविद्यालय, तळोदा येथे भित्तीपत्रक व निबंध स्पर्धा  दि. 14 रोजी पाडळदा येथे मानसिक आरोग्य शिबीर,  दि. 15 रोजी ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे मासिक बाह्यरुग्ण तपासणी व जनजागृती कार्यक्रमतर  दि. 16 रोजी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे बक्षीस वितरण असे कार्यक्रम होणार आहे. 

स्पर्धामुळे मनोविकाराची समस्या गंभीर बनली आहे. त्यात झोप न लागणे, अनियमित आहार, अस्वस्थता ही कारणे प्रमुख ठरतात.कामांचा ताण व अन्य ताणतणांमुळे नोकरदारांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण अधिक दिसून येते.नंदुरबारात बाहेरुन येणा:या काही डॉक्टरांमार्फतही केला जातो उपचार.