शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाण्याचे वॉटर ऑडीटसाठी आता फ्लो वॉटर मिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:50 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार पालिकेला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातील दोन्ही मुख्य जलवाहिनींवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पालिकेला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातील दोन्ही मुख्य जलवाहिनींवर वॉटर फ्लो मिटर बसविण्यात येत आहे. यामुळे धरणातील किती पाणी पालिका घेते, प्रत्यक्षात किती पाणीपुरवठा होतो याची नोंद ठेवली जाणार आहे. या कामाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. यामुळे शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शहराचे लवकरच वॉटर ऑडीट केले जाणार असून त्यानंतर सध्याच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठा किती काळ करावा याचा निर्णय घेतला जाणार आहे.नंदुरबार शहराला शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून मुख्यत: पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय 25 ते 30 टक्के भागात आंबेबारा धरणातील पाण्याचा आष्टे पंपींग स्टेशनमधून उपसा करण्यात येतो. शासनाच्या आदेशानुसार आता ज्या धरणातून, प्रकल्पातून किंवा विहिरीतून पाणी घ्यावयाचे असेल तर त्यासाठी वॉटर फ्लो मिटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेने विरचक प्रकल्पातील दोन पाईपलाईनवर अशा प्रकारचे वॉटर मिटर बसविण्यास सुरुवात केली आहे.500 मि.मी.जलवाहिन्याविरचक प्रकल्पात असलेल्या इंटकवेल मधून पाणी उपसा करण्यासाठी 500 मि.मी.च्या दोन जलवाहिन्या आहेत. त्यातील पाणी तेथेच असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात टाकले जाते. या दोन्ही जलवाहिन्यांवर 450 मि.मी. आकाराच्या पाईपमध्ये हे वॉटर फ्लो मिटर बसविण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाचे सभापती कैलास पाटील यांच्यासह अभियंता व सर्व कर्मचारी या ठिकाणी दिवसभर ठाण मांडून होते. गुरुवारी सायंकाळर्पयत 70 टक्के काम पुर्ण करण्यात आले होते. मध्यरात्रीर्पयत काम पुर्ण करून लागलीच पाणी पंपींग करण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. जर काही तांत्रिक अडचणी आल्या नाहीच तर शुक्रवार, 25 रोजी दुपार्पयत काही भागातील पाणी पुरवठा सुरू करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभागाने करून ठेवले आहे. अंदाजे मोजमापआतार्पयत अंदाजे पाण्याचे मोजमाप केले जात होते. पाणी उपसा करणा:या विद्युत मोटारींची क्षमता, त्या किती तास चालल्या त्यावरून पाणी उपसाचा अंदाज काढला जात होता. तो अंदाज अचूक राहत नव्हता. त्यामुळे वॉटर ऑडीट करतांना किंवा धरणातील किती पाणीसाठा  उचलला हे जाणून घेण्यासाठी   अंदाजे आकडेवारी समोर आणावी लागत होती. आता वॉटर फ्लो मिटरमुळे ती आकडेवारी अचूक मिळणार आहे. पाणीसाठा आरक्षीतशहराला पाणी पुरवठासाठी विरचक प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला तर 50 टक्के पाणीसाठा हा पालिका आरक्षीत करतो. जर 60 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा झाला तर संपर्ण पाणीसाठा आरक्षीत केला जात असतो. यंदा तर केवळ 41 टक्केच पाणीसाठा झाल्याने संपुर्ण पाणीसाठा पालिकेने आरक्षीत केला आहे. अशीच स्थिती आंबेबारा धरणातील आहे. तेथील पाणीसाठा देखील पालिकेने आरक्षीत करून घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी    स्थिती असूनही यंदा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या स्थितीला फारसे सामोरे जावे लागणार नसल्याचे चित्र आहे.