शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने महाराष्ट्र दिन साजार करण्यात आला.पालकमंत्री पाडवी यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकट परतावून लावण्यासाठी नागरिकांना एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले असून, सर्वांच्या सहकार्याने जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशानाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहनही अ‍ॅड.पाडवी यांनी केले. ते म्हणाले, कोरोना विषाणुच्या संसर्गाबाबत जनतेत जागृती झाली आहे. प्रशासनाने ही समस्या उत्तमरितीने हाताळली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे.जिल्ह्यात पाच व्हेंटीलेटर्स असून, आणखी १० व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत. डायलिसीस यंत्र खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. बाहेरील राज्यात असलेल्या जिल्ह्यातील शेतमजुरांना आणण्याची कार्यवाही सुरू असून, त्यांची वैद्यकीय तपसणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी आणि मजुरांची यादी घेण्यात येत असून, त्यांना आणण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.प्रतिबंधीत क्षेत्रात नियमांचे कडकपणे पालन करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याचे पालकमंत्री म्हणाले. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे ९५ टक्केपेक्षा जास्त वाटप करण्यात आले असून, केंद्र सरकारद्वारा प्राप्त तांदूळाचेदेखील ८५ टक्के वाटप करण्यात आले आहे. रेशन दुकानदारांनी अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना सहाय्य करण्याच्या भूमीकेतून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात येत असून, आतापर्यंत १३ हजार मजूर कामावर असल्याची माहिती त्यांनी दिली.