शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने महाराष्ट्र दिन साजार करण्यात आला.पालकमंत्री पाडवी यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकट परतावून लावण्यासाठी नागरिकांना एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले असून, सर्वांच्या सहकार्याने जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशानाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहनही अ‍ॅड.पाडवी यांनी केले. ते म्हणाले, कोरोना विषाणुच्या संसर्गाबाबत जनतेत जागृती झाली आहे. प्रशासनाने ही समस्या उत्तमरितीने हाताळली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे.जिल्ह्यात पाच व्हेंटीलेटर्स असून, आणखी १० व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत. डायलिसीस यंत्र खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. बाहेरील राज्यात असलेल्या जिल्ह्यातील शेतमजुरांना आणण्याची कार्यवाही सुरू असून, त्यांची वैद्यकीय तपसणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी आणि मजुरांची यादी घेण्यात येत असून, त्यांना आणण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.प्रतिबंधीत क्षेत्रात नियमांचे कडकपणे पालन करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याचे पालकमंत्री म्हणाले. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे ९५ टक्केपेक्षा जास्त वाटप करण्यात आले असून, केंद्र सरकारद्वारा प्राप्त तांदूळाचेदेखील ८५ टक्के वाटप करण्यात आले आहे. रेशन दुकानदारांनी अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना सहाय्य करण्याच्या भूमीकेतून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात येत असून, आतापर्यंत १३ हजार मजूर कामावर असल्याची माहिती त्यांनी दिली.