सविस्तर वृत्त असे की, रायखेड शिवारात भागीबाई रामदास पाटील यांच्या तीन एकर शेतात पपई पिकाची लागवड केली आहे. शनिवारी दुपारी शेतात पपई तोडणीसाठी व्यापारी आले असता शेतात पाहणी केली असता परिपक्व झालेले पपई सुमारे पाच ते सहा टन पिकाची चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ शेतमालक भागीबाई रामदास पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी शेतात येऊन पाहणी केल्यावर शेतातून परिपक्व झालेले पपई पीक चोरी झाल्याचे समजले. सुमारे पाच ते सहा टन पपईची चोरी झाल्याने ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतमालकाने दिली.
चोरट्यांची शेतमालावर नजर
परिसरात शेतीपयोगी वस्तू चोरीच्या घटनांबरोबरच चोरट्यांची नजर आता शेतपिकांवरही पडली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून खराब होऊन मोठे नुकसान झाले होते. आता हळूहळू शेतकऱ्यांना पपई पिकाबरोबर केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. परंतु त्यातच चोरट्यांनी मोर्चा शेतमालावर वळवल्याने पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.