शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

तीन गुन्ह्यातील पाच जण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:25 IST

लाखोंचा ऐवज जप्त : घरफोडी, पाकीटमार व मोबाईल चोरीतील संशयीत

नंदुरबार : शहरात घरफोडी, पाकीटमार करणा:या चोरटय़ांना शहर पोलिसांनी जेरबंद केले असून वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून एकुण दोन लाख 88 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या संशयीतांकडून आणखी काही इतर चोरीच्या घटनांची माहिती मिळणार असून त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात दुचाकी चोरीच्या घटनांची मालिका सुरूच असून दुचाकी चोरटय़ांनाही जेरबंद करण्याची मागणी होत आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी व पाकीटमारीसह मोबाईल चोरटय़ांचा सुळसुळाट झाला आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा असल्याची संधी साधून या चोरटय़ांनी उच्छाद मांडला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. गणेशोत्सव आणि मोहर्रम बंदोबस्ताचा ताण संपताच शहर पोलिसांनी चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार तीन गुन्ह्यातील पाच संशयीतांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख 87 हजार 900 रुपयांपेक्षा अधीकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरटे हे स्थानिकच असून त्यांना आणखी इतर कुठल्या ठिकाणच्या चोरटय़ांची मदत आहे किंवा कसे यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस निरिक्षक गिरीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील धुळे रोड परिसरातील एका दुकानातून चोरटय़ांनी एक लाख तीन हजार, 500 रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले होते. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून संतोष उर्फ खंडय़ा सुरेश कदम, रा.संजयनगर व नारायण नंदू गवळी  रा.गवळीवाडा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुकान फोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून ब्ल्यू डार्ट कुरीयरचे सामान, लॅपटॉप, प्रिंटर व मोटरसायकल असा एकुण एक लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दुसरी घटना बसस्थानकात घडली होती. बसमध्ये चढत असतांना एका प्रवाशाचे पाकीट मारले गेले होते. त्यावेळी संशयीतरित्या फिरत असतांना तेथील डय़ुटीवरील कर्मचा:याने रवींद्र भिला साळवे, रा.उमर्दे खुर्द याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने प्रवाशाच्या खिशातून पाच हजार 400 रुपये रोख काढल्याचे सांगितले. त्याच्यासोबत उमेश मंगलसिंग पाटील, रा.स्वराज्य नगर, नंदुरबार हा देखील असल्याचे सांगितल्यावर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पाच हजार 400 रुपये जप्त करण्यात आले. त्याशिवाय अल्पवयीन गुन्हेगाराकडून चार हजार रुपये जप्त करण्यात  आले. या संशयीतांनी एकुण 12  हजार 500 रुपयांची पाकिटमारी केली होती. पैकी नऊ हजार 400 रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. बसस्थानकातच एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरीस गेला होता. याबाबत पोलिसांनी रवींद्र भिला साळवे यालाच ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली देत 14 हजार 208 रुपये किंमतीचा    मोबाईल काढून दिला. त्याची अधीक चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणाहून एकुण आठ जणांचे एक लाख दोन हजार रुपयांचे मोबाईल चोरल्याचे सांगितले. ते मोबाईल देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक गिरीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार रवींद्र कुवर, रामा वळवी, गणेश चव्हाण, विश्वास गावीत, राकेश मोरे, लक्ष्मीकांत निकुंभ, योगेश लोंढे, जितेंद्र पाडवी, विजय ढिवरे, भरत पावरा यांनी ही कामगिरी केली.