शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तीन गुन्ह्यातील पाच जण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:25 IST

लाखोंचा ऐवज जप्त : घरफोडी, पाकीटमार व मोबाईल चोरीतील संशयीत

नंदुरबार : शहरात घरफोडी, पाकीटमार करणा:या चोरटय़ांना शहर पोलिसांनी जेरबंद केले असून वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून एकुण दोन लाख 88 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या संशयीतांकडून आणखी काही इतर चोरीच्या घटनांची माहिती मिळणार असून त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात दुचाकी चोरीच्या घटनांची मालिका सुरूच असून दुचाकी चोरटय़ांनाही जेरबंद करण्याची मागणी होत आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी व पाकीटमारीसह मोबाईल चोरटय़ांचा सुळसुळाट झाला आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा असल्याची संधी साधून या चोरटय़ांनी उच्छाद मांडला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. गणेशोत्सव आणि मोहर्रम बंदोबस्ताचा ताण संपताच शहर पोलिसांनी चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार तीन गुन्ह्यातील पाच संशयीतांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख 87 हजार 900 रुपयांपेक्षा अधीकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरटे हे स्थानिकच असून त्यांना आणखी इतर कुठल्या ठिकाणच्या चोरटय़ांची मदत आहे किंवा कसे यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस निरिक्षक गिरीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील धुळे रोड परिसरातील एका दुकानातून चोरटय़ांनी एक लाख तीन हजार, 500 रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले होते. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून संतोष उर्फ खंडय़ा सुरेश कदम, रा.संजयनगर व नारायण नंदू गवळी  रा.गवळीवाडा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुकान फोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून ब्ल्यू डार्ट कुरीयरचे सामान, लॅपटॉप, प्रिंटर व मोटरसायकल असा एकुण एक लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दुसरी घटना बसस्थानकात घडली होती. बसमध्ये चढत असतांना एका प्रवाशाचे पाकीट मारले गेले होते. त्यावेळी संशयीतरित्या फिरत असतांना तेथील डय़ुटीवरील कर्मचा:याने रवींद्र भिला साळवे, रा.उमर्दे खुर्द याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने प्रवाशाच्या खिशातून पाच हजार 400 रुपये रोख काढल्याचे सांगितले. त्याच्यासोबत उमेश मंगलसिंग पाटील, रा.स्वराज्य नगर, नंदुरबार हा देखील असल्याचे सांगितल्यावर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पाच हजार 400 रुपये जप्त करण्यात आले. त्याशिवाय अल्पवयीन गुन्हेगाराकडून चार हजार रुपये जप्त करण्यात  आले. या संशयीतांनी एकुण 12  हजार 500 रुपयांची पाकिटमारी केली होती. पैकी नऊ हजार 400 रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. बसस्थानकातच एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरीस गेला होता. याबाबत पोलिसांनी रवींद्र भिला साळवे यालाच ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली देत 14 हजार 208 रुपये किंमतीचा    मोबाईल काढून दिला. त्याची अधीक चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणाहून एकुण आठ जणांचे एक लाख दोन हजार रुपयांचे मोबाईल चोरल्याचे सांगितले. ते मोबाईल देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक गिरीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार रवींद्र कुवर, रामा वळवी, गणेश चव्हाण, विश्वास गावीत, राकेश मोरे, लक्ष्मीकांत निकुंभ, योगेश लोंढे, जितेंद्र पाडवी, विजय ढिवरे, भरत पावरा यांनी ही कामगिरी केली.