शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

पाच हजार विद्याथ्र्यानी साकारले तंबाखू मुक्तीचे बोधचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 16:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 28 शाळांमधील पाच हजार विद्याथ्र्यानी एकाच वेळी  साकारलेले ‘च्यूस लाईफ नॉट टोबॅको’चे बोधचिन्हाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 28 शाळांमधील पाच हजार विद्याथ्र्यानी एकाच वेळी  साकारलेले ‘च्यूस लाईफ नॉट टोबॅको’चे बोधचिन्हाने आणि तंबाखू मुक्तीची घेतलेली शपथ हा एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापीत झाला. पाच हजार विद्यार्थी आणि उपस्थितीत शिक्षक, पालक व अधिका:यांना खासदार डॉ.हिना गावीत यांनी शपथ दिली. जिल्हा प्रशासन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व सलाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार आधीच तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा म्हणून घोषीत झाला आहे. आता शाळांव्यतिरिक्त संपुर्ण जिल्हा तंबाखुमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नगराध्यक्ष परवेजखान, पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी., अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.डी.बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सिमा अहिरे, रोटरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, निलेश तवंर आदी उपस्थित होते.एवढय़ा मोठय़ा संख्येने विद्यार्थी एकत्र येत सामुहिक शपथ घेतल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. यावेळी बोलतांना खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्हा व्यसनमुक्त व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध समाजसेवी संस्थांचे प्रय} नक्कीच कौतूकास्पद आहे. निरोगी जीवनासाठी कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये. व्यसनांमुळे स्वत:चे जीवन तर उध्वस्त होतेच परंतु कुटूंब देखील उध्वस्त होते. त्यामुळे युवकांनी अशा व्यसनांपासून दूर राहावे आणि कुटूंब, समाज, देश विकासात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले, राज्यात सर्वात जास्त तंबाखू मुक्तीचे काम जिल्ह्यात झाले आहे. यासाठी शाळेतील विद्याथ्र्याचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. जिल्हा संपुर्णपणे व्यसनमुक्त होईल यासाठी सर्व स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, विद्यालय आणि प्रशासनाला मोठय़ा प्रमाणावर काम करावे लागणार आहे. भविष्यात ही चळवळ लोकचळवळ होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.बोधचिन्ह रेखाटन करण्यासाठी कला शिक्षक राजेंद्र ठाकरे, डी.डी.कुलकर्णी, अशोक मराठे, दिपक माळी, संतोष पाडवी, प्रकाश सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन पत्रकार रणजीत राजपूत यांनी केले. आभार नवनिर्माण समाज हितार्थ संस्थेचे रवी गोसावी यांनी मानले.