शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

तळोद्यातील विद्याथ्र्याची पाच हजार रोपांची रोपवाटीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : श्रमदान अन् स्वखर्चातून शहरातील महाविद्यालयीन तरुणानी रोप वाटीकेचे काम हाती घेतले असून,  विविध प्रजातीचे साधारण पाच हजार रोपे तयार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. विशेष म्हणजे सर्व रोपे वेगवेगळ्या फल फळावळची असल्याने सातपुडय़ातील आदिवासींना रोजगार मिळणार आहे. कारण रोपे मुख्यता सातपुडय़ाच्या डोंगरावरच लावण्यात येणार आहे.     ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : श्रमदान अन् स्वखर्चातून शहरातील महाविद्यालयीन तरुणानी रोप वाटीकेचे काम हाती घेतले असून,  विविध प्रजातीचे साधारण पाच हजार रोपे तयार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. विशेष म्हणजे सर्व रोपे वेगवेगळ्या फल फळावळची असल्याने सातपुडय़ातील आदिवासींना रोजगार मिळणार आहे. कारण रोपे मुख्यता सातपुडय़ाच्या डोंगरावरच लावण्यात येणार आहे.         एकेकाली गर्द झाडी व हिरवाईने नटलेला सतपुडा गेल्या तीन, चार दशकापासून उध्वस्त होत आहे. अलीकडे बेसुमार वृक्षतोडीमुळे तर आता पूर्णता बोडका झाला आहे. साहजिकच त्याचे वैभवदेखील लयास पावले आहे. त्याचे गत वैभव प्राप्त होण्यासाठी शहरातील दिग्विजय प्रतिष्ठानचे वृक्ष मित्र दिग्विजय माळी, प्रा.डॉ.महेंद्र माळी, हितेश वाघ, अंकित सूर्यवंशी, अजय परदेशी, जयदीप सूर्यवंशी, निखिल सागर, शिवम सूर्यवंशी, जागृत तवाले, मनोज कुमावत, सौरभ सूर्यवंशी, गौरव माळी अशा 15 महाविद्यालयीन तरुणांनी तळोदा महाविद्यालचे भूगोल विभागाचे प्रमुख प्रा.राजू यशोद यांचा सहकार्याने महाविद्यालयाच्या जागेवर म्हणजे पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर  श्रमदान व स्वखर्चाने  रोपवाटीकेचे काम हाती घेतले आहे.गेल्या महीना भरपासून हे युवक तीव्र उन्हाची तमा न बाळगता अतिशय मेहनत घेवून काम करीत आहेत. आता पावेतो त्यांनी यावर आठ ते दहा हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले. या रोपवाटीकेत मुख्यता महू, आंबा, सीताफल, जांभूळ, करवंद अशा प्रजातीची फळांची रोपे लावण्यात येत आहे. ही रोपे  दोन वर्षे चांगली वाढल्या नंतर लागवडीस देण्यात येणार आहेत. इथेच सेंद्रीय खतदेखील तयार करुण रोजगार निर्मितिचे प्रशिक्षण युवकांना दिले जाणार आहे. एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवडीवर भर देत असल्याचे चित्र आहे. परंतु ते जगतीलच याची शास्वती नाही. तथापि हे तरुण शासनाकडून कुठलीच मदतीची अपेक्षा न करता स्वखर्चाने रोप वाटीका तयार करीत आहे. युवकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.सातपुडय़ातील तरुणा ना रोजगार मिळणार:या रोप वाटीकेच्या माध्यमातून हे युवक हरीत सतपुडा अभियान राबविणार आहेत. कारण डोंगरावरच वृक्षांची लागवड करणार आहेत. त्यातही महू, आंबा, सीताफल या वृक्षावर  अधिक भर देणार असल्यामुळे तेथील आदिवासीना रोजगार प्राप्त होईल. असे असले तरी या तरुणांची वृक्ष लागवड चळवळीस इतर युवकांनी ही हातभार          लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.