शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील अतिवृष्टीत पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन जण तर घराची भिंत अंगावर पडून दोनजण अशा एकुण पाच जणांचा मृत्यू झाला. 27 पाळीव जनावरे देखील दगावली असून 100 पेक्षा अधीक घरांचे नुकसान झाले आहे. एक पूल आणि पाच रस्ते देखील वाहून गेले आहेत. धुळे-सुरत महामार्गावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन जण तर घराची भिंत अंगावर पडून दोनजण अशा एकुण पाच जणांचा मृत्यू झाला. 27 पाळीव जनावरे देखील दगावली असून 100 पेक्षा अधीक घरांचे नुकसान झाले आहे. एक पूल आणि पाच रस्ते देखील वाहून गेले आहेत. धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, पंचनाम्यांच्या कामांना गती देण्यात आली आहे.अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सईदा हसन काकर (57) रा.राजीवनगर, नवापूर, जमनाबाई लाशा गावीत (65) रा. बालाहाट, नवापूर, वंतुबाई दोंदल्या गावीत (55) रा.खोकसा,  काशीराम बाबजी गावीत (50) रा. वाघळापाडा यांचा समावेश आहे. आणखी एकाचे नाव समजू शकले नाही. नवापूर तालुक्यात शुक्रवारी उत्तररात्री तीन तास मुसळधार पाऊस झाला. तीन तासात 140 मि.मी. पाऊस झाला. एकटय़ा विसरवाडी मंडळात 235 मि.मी.पाऊस झाला. यामुळे नदी, नाल्यांना पूर येवून मोठय़ा प्रमाणावर जिवीत व वित्तहाणी झाली. याशिवाय 17 म्हशी, पाच गायी, चार शेळ्या व एक घोडा असे एकुण 27 पाळीव प्राणी देखील दगावले आहेत. नवापूर शहरातील रंगावली नदी काठावरील 65 घरे भुईसपाट झाली आहेत तर इतर ठिकाणी 15 व विसरवाडी येथे 15 आणि चिंचपाडा येथे 10 घरांचे नुकसान झाले आहे.पावसामुळे व पुरामुळे चार ठिकाणचे रस्ते तर एक पूल वाहून गेला आहे. त्यामुळे दळणवळण यंत्रणा देखील ठप्प झाली आहे. धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूक विसरवाडी ते दहिवेलदरम्यान ठप्प झाल्याने या मार्गावरील वाहतूक साक्री, पिंपळनेर, दहिवेल व विसरवाडी, खांडबारा, नंदुरबार, शेवाळीफाटा अशी वळविण्यात आली आहे.जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसात नवापूर व धडगाव तालुक्याला झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दहा मंडळात 65 मि.मी.पेक्षा अधीक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस विसरवाडी महसूल मंडळात झाला आहे. या भागात ढगफुटीचा अनुभव नागरिकांना आला. तीन तासात तब्बल 235 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल चिंचपाडा मंडळात 192 मि.मी., नवापूर मंडळात 140 मि.मी., नवागाव मंडळात 90 तर खांडबारा मंडळात 64 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. उघडय़ावर आलेल्यांना तात्पुरती मदत देवून त्यांच्या निवा:याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांच्यासह महसूलच्या सर्व वरिष्ठ अधिका:यांनी घटनास्थळी भेटी देवून मदतकार्याला वेग दिला आहे.