शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर शहरात लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी फारसा प्रभाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात दुपारी १ ...

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात दुपारी १ वाजेपर्यंत काही आस्थापनांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश असला तरी इतर दुकानेही नवापूर शहरात सुरूच राहिल्याने लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याची स्थिती होती.

या वेळी नाशवंत वस्तूंची दुकाने, मिठाई, बेकरी पदार्थ, चिकन, मटण, मासे, फळे, भाजीपाला, रसवंतीगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ यांना घरपोच पार्सल सेवा देण्यास सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी संचारबंदीत नवापूर शहरात काही दुकाने उघडी दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बहुतांश दुकाने दुपारपर्यंत उघडी राहिली. यात इलेक्ट्रिक, मोबाइल, चप्पल, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, पानटपऱ्या उघड्या होत्या.

नवापूर शहरात सकाळी व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनला प्रचंड विरोध करीत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना दुकाने उघडी ठेवण्याची विनंती केली. परंतु तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे, असे व्यापाऱ्यांना सांगितले. मात्र नगरपालिका प्रशासनाने उघडलेली इतर दुकाने बंद करण्याची तसदी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पालिकेने केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्ण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी १ ते १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. परंतु संचारबंदीला नवापूर शहरात फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. या वेळी अनेक आस्थापने उघडी असल्याचे दिसून आले.

नवापूर पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत नवापूर शहरातील सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान, काही हॉटेल्समध्ये ग्राहक नाश्ता करीत असतानाही दिसून आले. हॉटेल व्यवसायिकदेखील आदेशाचे पालन करीत नाहीत.

पहिल्या दिवशी संचारबंदीत अनेक दुकाने उघडी असल्याने काही व्यापाऱ्यांनी प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत दुसऱ्या दिवशी दुकाने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदी ही नागरिकांच्या हितासाठी लागू केली आहे. यात व्यापाऱ्यांचे नुकसान होत असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवस दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

नवापूर शहरातील काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवून दुकाने दुपारी १० ते ११ वाजता बंद केली. तसेच काही व्यापारी मुद्दाम दुकाने उघडी ठेवत आहेत. नगरपालिका प्रत्येक दुकानदारापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही तीन दिवसांपासून शहरात रिक्षा फिरवून त्याबाबत सूचना देत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणती दुकाने सुरू राहतील, काेणती नाही, ते दुकानदारांना सांगितले आहे. शुक्रवारी आदेशातील दुकानेच सुरू राहून अन्य सर्व दुकाने बंद राहतील.

- महेश चौधरी, मुख्याधिकारी, नगरपालिका, नवापूर