शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

नवापूर शहरात लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी फारसा प्रभाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात दुपारी १ ...

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात दुपारी १ वाजेपर्यंत काही आस्थापनांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश असला तरी इतर दुकानेही नवापूर शहरात सुरूच राहिल्याने लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याची स्थिती होती.

या वेळी नाशवंत वस्तूंची दुकाने, मिठाई, बेकरी पदार्थ, चिकन, मटण, मासे, फळे, भाजीपाला, रसवंतीगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ यांना घरपोच पार्सल सेवा देण्यास सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी संचारबंदीत नवापूर शहरात काही दुकाने उघडी दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बहुतांश दुकाने दुपारपर्यंत उघडी राहिली. यात इलेक्ट्रिक, मोबाइल, चप्पल, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, पानटपऱ्या उघड्या होत्या.

नवापूर शहरात सकाळी व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनला प्रचंड विरोध करीत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना दुकाने उघडी ठेवण्याची विनंती केली. परंतु तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे, असे व्यापाऱ्यांना सांगितले. मात्र नगरपालिका प्रशासनाने उघडलेली इतर दुकाने बंद करण्याची तसदी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पालिकेने केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्ण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी १ ते १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. परंतु संचारबंदीला नवापूर शहरात फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. या वेळी अनेक आस्थापने उघडी असल्याचे दिसून आले.

नवापूर पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत नवापूर शहरातील सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान, काही हॉटेल्समध्ये ग्राहक नाश्ता करीत असतानाही दिसून आले. हॉटेल व्यवसायिकदेखील आदेशाचे पालन करीत नाहीत.

पहिल्या दिवशी संचारबंदीत अनेक दुकाने उघडी असल्याने काही व्यापाऱ्यांनी प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत दुसऱ्या दिवशी दुकाने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदी ही नागरिकांच्या हितासाठी लागू केली आहे. यात व्यापाऱ्यांचे नुकसान होत असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवस दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

नवापूर शहरातील काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवून दुकाने दुपारी १० ते ११ वाजता बंद केली. तसेच काही व्यापारी मुद्दाम दुकाने उघडी ठेवत आहेत. नगरपालिका प्रत्येक दुकानदारापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही तीन दिवसांपासून शहरात रिक्षा फिरवून त्याबाबत सूचना देत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणती दुकाने सुरू राहतील, काेणती नाही, ते दुकानदारांना सांगितले आहे. शुक्रवारी आदेशातील दुकानेच सुरू राहून अन्य सर्व दुकाने बंद राहतील.

- महेश चौधरी, मुख्याधिकारी, नगरपालिका, नवापूर