शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

नमकीन पदार्थ बनविणारा कारखाना आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 11:58 IST

शहाद्यातील घटना : वेळीच नियंत्रण मिळविता आल्याने मोठा अनर्थ टळला

शहादा : नमकीन बनविणा:या कंपनीला बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. बॉयलर किंवा सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शहाद्यातील जुना प्रकाशा रोडवर सालदार नगर भागात सूर्या नमकीन नावाची कंपनी आहे. या ठिकाणी नमकीनचे विविध पदार्थ तयार करून ते खान्देशसह गुजरात व मध्यप्रदेशातील विविध भागात विक्री केली जाते. या कंपनीला बुधवारी रात्री 12 ते साडेबाराच्या दरम्यान अचानक आग लागली. काहींच्या  म्हणण्यानुसार पहिले सिलिंडर फुटल्यासारखा आवाज आल्यानंतर लागीचे लोळ बाहेर दिसले. त्यामुळे कंपनीतील बॉयलर किंवा सिलिंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचा अंदाज आहे. कंपनीत प्लॅस्टिकच्या पिशव्या, नमकीन बनविण्यासाठीचा कच्चा माल आणि लाकडी सामान असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिक तसेच राकेश सुभाष पाटील, संजय ताराचंद चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहादा पालिकेच्या अगिAशमन बंबासह नंदुरबार, दोंडाईचा व सातपुडा साखर कारखान्याच्या अगिAशमन बंबाला पाचारण करण्यात आले. नागरिकांनी देखील मिळेल त्या साधनांनी आग विझविण्यासाठी प्रय} केला. तीन तास अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. कंपनी लगतच कच्च्या घरांची मोठी वसाहत आहे. परंतु वेळीच आगीवर नियंत्रण मिळविता आल्याने पुढील अनर्थ टळला. आगीच्या वेळी बघ्यांची देखील मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे आग विझविण्यासाठी बंबांना शर्तीचे प्रय} करावे लागत होते. पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते. आगीत कंपनीचे संपर्ण शेड, स्वयंचलित मशिनरी, कच्चा माल, पक्का माल यासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तहसीलदार मनोज खैरनार, सर्कल बी. ओ. पाटील, कुकडेल भागाचे तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. शहादा पोलिसात अगिAउपद्रवान्वये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आगीच्या मुळ कारणाचा तपास करण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते कंपनीत सुमारे 200 कामगार काम करतात. सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेर्पयत या ठिकाणी काम चालते. कंपनीत कुणी नसतांना आग लागल्याने जिवीत हाणी टळली.सकाळी कंपनीचा झालेला कोळसा पाहून कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गहिवरून आले. रोजगार गेल्याने अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आले.कंपनी रहिवास भागात कशी सुरू करण्यात आली, आवश्यक त्या परवाणग्या घेण्यात आल्या होत्या काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.कंपनीतून येणारी दरुगधी, वेस्टेज माल उडणे यासह इतर कारणांमुळे या भागातील नागरिकांनी कंपनीचे स्थलांतर करण्याची मागणी केली होती असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.