शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अखेर कोलवीमाळला पोहोचली वीज : अक्कलकुव्यापासून अवघे 13 किलोमीटर अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील कोलवीमाळ या गावात 25 वर्षानंतर वीजेचा प्रकाश पोहोचला आहे. अक्कलकुवा शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावरील कोलवीमाळ येथे वीज कंपनीकडून वीज वाहिण्या जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गाव प्रकाशात उजळून निघाले. 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी ग्रामस्थ व भिल्लिस्थान टाईगर सेना यांच्याकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील कोलवीमाळ या गावात 25 वर्षानंतर वीजेचा प्रकाश पोहोचला आहे. अक्कलकुवा शहरापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावरील कोलवीमाळ येथे वीज कंपनीकडून वीज वाहिण्या जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गाव प्रकाशात उजळून निघाले. 25 वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी ग्रामस्थ व भिल्लिस्थान टाईगर सेना यांच्याकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. सातपुडय़ातील विविध गावांमध्ये विजेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. भौगोलिक दृष्टय़ा उंच सखल भागातील गाव पाडय़ांना वीज देण्यासाठी वीज कंपनीकडे योग्य ते साहित्य नसल्याने अनेक गावांना आजवर वीज मिळू शकली नाही. याबाबत तालुक्यातील कोलवीमाळ येथील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला भिलीस्थान टाईगर सेनेचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र पाडवी, नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष अजय गावीत व तालुकाध्यक्ष रुपसिंग वसावे यांनी प्रतिसाद देत रास्ता रोको आंदोलन केले होते. या वेळी उपस्थित ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीकडून वीज देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आठ महिन्यांपासून सातपुडय़ातील डोंगर आणि वनक्षेत्रात उच्च क्षमतेच्या वीज वाहिनी व उंच मनोरे उभारण्याचे काम सुरू होते. हे काम नुकतेच पूर्णत्वास येवून कोलवीमाळ गावात वीज पोहोचली आहे. गेल्या 25 वषार्पासून अंधारात असलेले गाव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या गावात आदिवासीचे श्रद्धास्थान असलेल्या याहा  मोगी मातेची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून भरवली जात आहे.  या यात्रेत हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे गावात वीज अपेक्षित होती. परंतु याकडे लोकप्रतिनिधींनीदेखील दुर्लक्ष केल्याने अखेर भिल्लीस्थान टायगर सेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना न्याय मिळाल्याने  12 फेब्रुवारी 2018 रोजी रूपसिंग टी. वसावे, गुलाबसिंग वसावे, सरपंच कौशल्या गुमानसिंग तडवी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, सदस्य व विजा पुंजारा यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमेश तडवी, अविनाश वळ्वी सुनील वसावे यासह ग्रामस्थ उपस्थित