शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

अखेर शेतकऱ्याने केळीवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या चार एकर क्षेत्रात व्यापाºयांकडून मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या चार एकर क्षेत्रात व्यापाºयांकडून मागणी नसल्याने, चार एकर क्षेत्रातील उभ्या पिकाला तवा फिरवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. विशेषत: नाशवंत शेतमाल उत्पादक शेतकरी लॉकडाऊनमुळे अडचणीत आला आहे. केळी उत्पादक शेतकºयांनी पीक उभे करण्यासाठी लाखो रूपये खर्च करूनही काही केळी उत्पादक शेतकºयांना मातीमोल भावात विकावे लागले तर काही शेतकºयांवर तवा फिरवण्याची परिस्थिती निर्माण झाली.तालुक्यातील केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. त्यांना तालुक्यातील केळी क्षेत्रही वाढले होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने निर्यात शक्य नाही. वाहतूक ठप्प असल्याने व्यापाºयांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. खरेदीदार नसल्याने शेतकºयांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.एक हजार झाडामागे ५० हजार ते लाख रूपये खर्च करावा लागतो. सध्या केळीची विक्री पूर्णपणे थांबली असल्यामुळे लागवडीचा खर्चदेखील निघत नाही. व्यापाºयांकडून मागणीदेखील बंद झाली आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. कोरोनामुळे नैसर्गिक संकट शेतकºयांच्या वाट्याला आले आहे. त्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी कोरोनाचा फटका बसलेल्या शेतकºयांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा होत आहे. सावकारी कर्ज काढून शेती गुंतवणूक केल्याने कर्ज फेडायचे कसे? कष्टाने पिकवूनही विक्री न झाल्यामुळे केलेला खर्च आणायचा कुठून? असे अनुत्तरित प्रश्न शेतकºयांच्या मनात आहेत. शहादा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे करून अनुदान लवकरात लवकर द्यावे अशी मागणी केळी उत्पादक शेतकºयांकडून करण्यात येत आहे.चार एकर क्षेत्रात केळी पिकाची लागवड केली होती. या वर्षीदेखील ती चांगली बहरली होती. मात्र कोरोनामुळे होत्याचे नव्हते झाले. संचारबंदी सुरू झाल्याने शेतातील एक डझन केळीचीदेखील विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे सरासरी साते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने केळीच्या क्षेत्रात तवा फिरवावा लागला..-प्रकाश छगन पाटील, मोहिदा त.ह., केळी उत्पादक शेतकरी.