शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्याने केळीवर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या चार एकर क्षेत्रात व्यापाºयांकडून मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील मोहिदा त.ह. येथील शेतकऱ्यांनी परिपक्व झालेल्या केळीच्या चार एकर क्षेत्रात व्यापाºयांकडून मागणी नसल्याने, चार एकर क्षेत्रातील उभ्या पिकाला तवा फिरवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. विशेषत: नाशवंत शेतमाल उत्पादक शेतकरी लॉकडाऊनमुळे अडचणीत आला आहे. केळी उत्पादक शेतकºयांनी पीक उभे करण्यासाठी लाखो रूपये खर्च करूनही काही केळी उत्पादक शेतकºयांना मातीमोल भावात विकावे लागले तर काही शेतकºयांवर तवा फिरवण्याची परिस्थिती निर्माण झाली.तालुक्यातील केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. त्यांना तालुक्यातील केळी क्षेत्रही वाढले होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने निर्यात शक्य नाही. वाहतूक ठप्प असल्याने व्यापाºयांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. खरेदीदार नसल्याने शेतकºयांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.एक हजार झाडामागे ५० हजार ते लाख रूपये खर्च करावा लागतो. सध्या केळीची विक्री पूर्णपणे थांबली असल्यामुळे लागवडीचा खर्चदेखील निघत नाही. व्यापाºयांकडून मागणीदेखील बंद झाली आहे. यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. कोरोनामुळे नैसर्गिक संकट शेतकºयांच्या वाट्याला आले आहे. त्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी कोरोनाचा फटका बसलेल्या शेतकºयांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा होत आहे. सावकारी कर्ज काढून शेती गुंतवणूक केल्याने कर्ज फेडायचे कसे? कष्टाने पिकवूनही विक्री न झाल्यामुळे केलेला खर्च आणायचा कुठून? असे अनुत्तरित प्रश्न शेतकºयांच्या मनात आहेत. शहादा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे करून अनुदान लवकरात लवकर द्यावे अशी मागणी केळी उत्पादक शेतकºयांकडून करण्यात येत आहे.चार एकर क्षेत्रात केळी पिकाची लागवड केली होती. या वर्षीदेखील ती चांगली बहरली होती. मात्र कोरोनामुळे होत्याचे नव्हते झाले. संचारबंदी सुरू झाल्याने शेतातील एक डझन केळीचीदेखील विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे सरासरी साते आठ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने केळीच्या क्षेत्रात तवा फिरवावा लागला..-प्रकाश छगन पाटील, मोहिदा त.ह., केळी उत्पादक शेतकरी.