शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अखेर केळी कटाई सुरू; भाव मात्र मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 21:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीमुळे धास्तावलेल्या मजूर वर्गाची प्रशासन आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या केळीची कटाई सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना महामारीमुळे धास्तावलेल्या मजूर वर्गाची प्रशासन आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या केळीची कटाई सुरू झाली आहे. तथापि व्यापाऱ्यांकडून अतिशय स्वस्तात खरेदी केली जात असल्यामुळे उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याची शेतकºयांची व्यथा आहे. व्यापाºयांच्या अडवणुकीच्या धोरणाबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.कोरोना या महामारीचे देशावरील संकट अधिकच गडद होत आहे. आता जिल्ह्यातही त्याने आपले डोकेवर काढले आहे. त्यामुळे शेतमजुरांमध्येदेखील त्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. या मजुरवर्गाने शेतीच्या कामावर जाणे ही बंद केले होते. मजुरांचा फटका केळी उत्पादक शेतकºयांना बसला होता. कारण परराज्यातून येणाºया केळीच्या वाहनचालकाच्या संसर्गामुळे मजूर वर्ग केळीची कापणी करण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे परिपक्व झालेल्या केळीच्या बागाचे नुकसान होत असे. परिणामी त्रस्त शेतकºयांनी महसूल प्रशासनास निवेदन दिले होते. त्यात धास्तावलेल्या मजुरांची भिती काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार तहसीलदार पंकज लोखंडे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, फौजदार ज्ञानेश्वर पाकळे यांनी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांची बोरद येथे बैठक घेतली होती. त्यांनी मजुरांची भिती काढून वाहनचालकांची आरोग्य तपासणी केली जात असते. त्यामुळे संसर्गाची शक्यता नसते. त्याच बरोबर मजुरांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची सूचना व्यापाºयांना केली आहे. त्यानंतर बोरद, मोड, तळवे, मोरवड, मोहिदा, धानोरा, खेडले परिसरातील शेतकºयांची केळीची कटाई सुरळीत झाली असली तरी केळीच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे.पिलबाग तर सोडा नक्तीलाच २५० ते ३०० रूपये दराने मागणी केली जात आहे. व्यापारी संगनमत करून अडवणुकीचे धोरण घेत असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. कोरोनामुळे वाहतुकीची कटकट, मालाची मागणी अशा सबब सांगून शेतकºयांची प्रचंड आर्थिकलूट करीत असल्याचेही शेतकरी सांगतात. वास्तविक केळीचे रोप लावणीपासून तर परिपक्वहोण्यापर्यंत लाखो रूपये खर्चकरावा लागला आहे. शिवाय वाढत्या तापमानामुळे केळीचे घडच झाडावरून सटकत आहे.साहजिकच शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात आता सातत्याने घसरणाºया दराने भर घातली आहे. शेजारच्या जळगाव जिल्ह्यात ७०० रूपये दर आहे. एवढेच नव्हे शहादा तालुक्यातही ५०० पेक्षा अधिक दर आहे. मग तळोदा तालुक्यातील शेतकºयांच्या बाबतीतच का? व्यापारी अडवणुकीचे धोरण घेत आहेत, असा सवाल उपस्थित करून प्रशासनही यात दखल घेत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जिल्हा प्रशासनाने तरी व्यापारी शेतकºयांची बैठक घेऊन केळीच्या दराबाबत निश्चित समाधानकारक तोडगा काढावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. केळी, पपईच्या वाहतुकीबाबत प्रशासनाने शिथिलतेचे धोरण घेतले आहे, असे असतांना केवळ वाहतुकीच्या अडचणीचे कारण पुढे करून केळी उत्पादकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे शेतकरी म्हणतात. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.