शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

सिव्हीलच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी पुर्ण करून जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी पुर्ण करून जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रियेला वेग आला आहे. त्रुटीच्या पुर्तता पुर्ण झाल्या किंवा कशा याची पहाणी करण्यासाठी केंद्रीय समिती लवकरच नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देण्याची शक्यता आहे.नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले आहे. परंतु प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू होण्यासंदर्भात असलेली तयारी अगदीच धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. गेल्या सहा महिन्यांपासून मात्र महाविद्यालयाच्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठीच्या तयारीला वेग आला आहे.केंद्रीय समितीची भेटदोन महिन्यांपूर्वी केंद्रीय समितीने नियोजित महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी समितीने अनेक त्रुट्या काढल्या होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. वेळेत त्रूटी दूर झाल्यास समिती पुन्हा भेट देवून आपला अहवाल देणार आहे. आता अहवाल आॅल क्लेअर असल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यलायात पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न गेल्या महिनाभरापासून युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी स्थानिक स्तवंत्र समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत.हस्तांतर प्रक्रिया अंतीम टप्प्यातजिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपुर्ण रुग्णालयात ज्या ज्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आणि त्याअंतर्गत येणारे विभाग व त्यांचे फलक होते ते सर्व बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याच्या समितीने या सर्व प्रक्रियेची पहाणी केली.आवश्यक बेडची संख्या पुर्णजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाºया आवश्यक बेडची संख्या पुर्ण झाली आहे. साधारणत: ५०० बेडची गरज असते, ती पुर्ण झाली आहे. त्यामुळे रुग्णालय हस्तांतरण करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा रुग्णालयातील आवश्यक ते सर्व कर्मचारी देखील आता वैद्यकीय रुग्णालयाकडे वर्ग होणार आहेत. यामुळे आताच्या परिस्थितीत ७० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्तता पुर्ण झाली आहे. उर्वरित ३० टक्के कर्मचारी हे सरळ सेवा भरतीनेच भरावे लागणार आहेत. त्यासाठी लवकरच शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. कंत्राटी कर्मचाºयांचा प्रश्न मात्र कायम राहणार आहे. या कर्मचाºयांनाही सामावून घेतले जावे अशी मागणी करण्यात येत आहे.