शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

ब्राह्मणपुरी : कर्ज थकविणाऱ्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. ही थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे; परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या ...

ब्राह्मणपुरी : कर्ज थकविणाऱ्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. ही थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे; परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम सरकार देणार होते; परंतु त्याबाबत केवळ घोषणाच असल्याने प्रत्यक्षात कृती होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता थकबाकीदार व्हावे का? अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.

शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली बाब आहे. मात्र, याचवेळी जे नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. केवळ मधूनमधून घोषणा करीत असतात. या घोषणांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये साह्य केले जाईल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही दिसून येत नाही. त्यामुळे आम्हालाही थकबाकीदार शेतकरी व्हावे लागेल, अशा संतप्त भावना नियमितरीत्या कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी हे श्रीमंत शेतकरी आहेत असा समज शासनाचा आहे काय? नियमित कर्ज फेडणारे शेतकरी केवळ कर्जाची आलटपालट करतात. त्यामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांचा विचार करून अमलात आणाव्यात.

शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन योजना चालू केली होती; परंतु प्रोत्साहन योजना ही फसवी योजना ठरत आहे. म्हणून शेतकरी वर्ग पैसे भरण्यासाठी विचार करीत आहे.

- सुभाष तुकाराम पाटील, शेतकरी, गोगापूर, ता.शहादा.

सद्य:स्थितीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी गेलो असता शेतकरी म्हणतात की, प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान आमच्या खात्यावर जमा करावे व बाकी पीककर्ज रक्कम आम्ही भरण्यास तयार आहोत. शासनाकडून ५० हजार रुपये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणजे नियमित वसुलीसाठी अडचणी येणार नाहीत.

-जयदेव पाटील, चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, गोगापूर, ता. शहादा.