शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेढब बांधकामामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:24 IST

नंदुरबार रेल्वे स्थानक : प्लॅटफार्म एकची रुंदी जास्त असल्याने अपघाताची शक्यता वाढली

नंदुरबार : नंदुरबार रेल्वेस्थानकाचा प्लॅटफार्म क्रमांक एक प्रवाशांच्या जीवावर उठणारा ठरत आहे़ प्लॅटफार्म व रेल्वे रुळ यातील अंतर नियमापेक्षा जास्त असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे़ विशेष म्हणजे नुकतेच संबंधित प्लॅटफार्मचे डागडुज्जीचेही काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते़गुरुवारी धावती नवजीवन एक्सप्रेस पकडताना झालेल्या अपघातात पद्मशाली शंकर या तेलंगाना येथील मुळ रहिवासी असलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला होता़ रेल्वेमधील सूत्रांनी सांगितल्यानुसार अपघातात प्रवाशाची चूक तर होतीच परंतु रेल्वे रुळ व प्लॅटफार्म यातील अंतरदेखील जास्त असल्याने अपघातात जिवीतहाणी झाल्याचे सांगण्यात आले होते़नुकतीच झाली होती डागडुज्जीगेल्या काही महिन्यांपूर्वी प्लॅटफार्म क्रमांक एक व काही प्रमाणात दोनचेही काम पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते़ डागडुज्जीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना आवश्यक असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे़ याउलट प्लॅटफार्म दोनवर मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आलेली आहे़ प्लॅटफार्म क्रमांत दोन वरील सिमेंटचे बांधकाम काही प्रमाणात बाहेर काढण्यात आलेले आहे़ यामुळे रेल्वे रुळ व प्लॅटफार्ममधील अंतर कमी होण्यास मदत झालेली आहे़ दरम्यान, अपवादात्मक परिस्थितीत प्रवाशाचा पाय सटकून तो रेल्वेखाली आल्यास प्लॅटफार्म व रेल्वे यात पुरेशी पोकळी असल्याने प्रवासी वाचण्याची शक्यता अधिक आहे़ तशी व्यवस्था प्लॅटफार्म क्रमांक एकवर नाही़ सलग बांधकाम करण्यात आलेले असल्याने अपघात जिवीतहाणी होण्याचा धोका अधिक निर्माण झालेला आहे़याबाबत विभागीय वरिष्ठ अभियंता पी़एस़ यादव यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, प्लॅटफार्म क्रमाक एकचे बांधकाम आधीपासूनच करण्यात आलेले आहे़ त्यामुळे संबंधित प्लॅटफार्मची केवळ डागडुज्जी करण्यात आलेली आहे़ प्लॅटफार्म क्रमांक एकचे बांधकाम दोन सारखे करणे शक्य नसून यासाठी साधारणत: दोन कोटी रुपयांचा खर्च येईल शिवाय याला तीन ते चार महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही या वेळी अभियंता पी़एस़ यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ रेल्वे रुळ व प्लॅटफार्मातील अंतर हे १.६ मीटर एवढे असणे आवश्यक असते़ परंतु प्रत्यक्षात प्लॅटफार्म क्रमांक एकवर या नियमाला तिलांजली देण्यात आली आहे़ या ठिकाणी रेल्वे प्लॅटफार्म व रेल्वे रुळातील केंद्र भाग यातील अंतर हे प्रत्येक ठिकाणी असमान असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे साहजिकच यातून अपघात होऊन जिवीतहाणी होण्याचा धोका अधिक वाढला असल्याचेच यातून दिसून येत आहे़ दरम्यान, प्लॅटफार्म क्रमांक एक हा अत्यंत अशास्त्रीयदृष्टीने व नियमाला धाब्यावर बसवून बांधण्यात आलेला आहे़ त्यामुळे याचे पुन्हा नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे़ गुरुवारी धावती नवजीवन एक्सप्रेस पकडताना झालेल्या अपघातात मृत्यू झालेला अज्ञात व्यक्ती हा पद्मशाली शंकरच असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे़ गुरुवारी रात्री मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आल्यावर मृताची ओळख पटली़ पद्मशाली शंकर हा मुळचा तेलंगाना येथील रहिवासी आहे़ सूरत येथे बहिण राहत असल्याने कामाच्या शोधात पद्मशाली हा सूरत येथे गेला होता़ तेथे छोटे-मोठे काम मिळाल्यामुळे रोजगारासाठी तोही तेथेच स्थायीक झालेला होता़ दरम्यान, तीन ते चार महिन्यातून एक वेळा पद्मशाली हा आपल्या मुळ गावी तेलंगाना येथे जात असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली़ दरम्यान, गावी गेल्यानंतर पुन्हा सूरत येथे कामावर जाण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले़ नंदुरबार येथे काही वेळ रेल्वे थांबत असते़ तसेच येथील रेल्वे स्थानकावर जेवनाचीही बऱ्यापैकी सोय असल्याने अनेक प्रवासी मिळालेल्या काही मिनीटांमध्ये जेवन घेण्यासाठी रेल्वे बाहेर जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली़