शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कडब्यासाठी बाहेर जिल्ह्यातील पशुपालकांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, राणीपूर, धवळीविहीर, रापापूर, कोठार, वरपाडा, गडीकोठडा, अंबागव्हाण, वाल्हेरी, सोमावल, मोदलपाडा आदी विविध गावांच्या ...

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, राणीपूर, धवळीविहीर, रापापूर, कोठार, वरपाडा, गडीकोठडा, अंबागव्हाण, वाल्हेरी, सोमावल, मोदलपाडा आदी विविध गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात शेतकरी दरवर्षी खरीप ज्वारीची पेरणी करतात. या खरीप ज्वारीला दादर म्हणूनही ओळखले जाते. या परिसरातील तसेच अक्कलकुवा, धडगाव परिसरातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात खरीप ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. ज्वारीच्या कणसाची कापणी केल्यानंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणात सुका चारा अर्थात कडबादेखील खरीप ज्वारीपासून मिळतो. सध्या तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील खरीप ज्वारीची कापणी झाली असून मोठ्या प्रमाणात कडबा निर्माण झाला आहे.

या कडब्याला शिरपूर, शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा, धुळे, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असते. मागील आठवडाभरापासून या भागातील पशुपालक व चाऱ्याचे व्यापारी या भागात दाखल झाले असून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांपासून कडब्याची खरेदी करीत आहेत. काही जण वाहनाद्वारे परजिल्हात कडबा खरेदी करून घेऊन जात आहेत. ८०० ते एक हजार रुपये प्रती शेकडा या भावाने कडब्याचे बंडल (पुळा) विकले जातात. यावर्षी त्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. एक ट्राली किंवा ट्रकमध्ये ९०० ते एक हजार कडब्याचे बंडल मावतात. एक शेतकरी आपल्या व जवळपासच्या शेतातून मिळून किमान दोन ट्राल्या किंवा ट्रकभर कडबा विक्री करीत आहे. म्हणजे कडबा विक्रीतून आठ ते १० हजार रुपये प्रती वाहन शेतकऱ्याला मिळतात.

अजून पाहिजे त्या प्रमाणात कडबा निघत नसली तरी पशुपालक कडबा उत्पादक शेतकऱ्यांना ॲडव्हान्स देऊन कडबा बुकिंग करून घेत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पशुपालकांना कडबा खरेदी करता आला नव्हता. त्याचा परिणाम कडबा उत्पादक शेतकऱ्यांवरदेखील झाला. त्यांचेही हजारांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. यामुळे परजिल्ह्यातील पशुपालक आतापासून या भागात येऊन कडबा मिळण्यासाठी फिल्डिंंग लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.