शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

प्रश्नपत्रिका पाकीट थेट वर्गातच पोहचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी पाणी वाटप आणि इतर कामांसाठी विद्यार्थी किंवा बालकांना कामास लावू नये ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी पाणी वाटप आणि इतर कामांसाठी विद्यार्थी किंवा बालकांना कामास लावू नये अशा सक्त सुचना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटू नये यासठी बंद पाकिट थेट वर्गातच पर्यवेक्षकांना दिले जाणार आहे.दहावी व बारावीच्या परिक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. कॉपी रोखण्यसाठी आणि परीक्षा सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना वेळोवेळी बोर्ड अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. केंद्रसंचालकांची नुकतीच बैठक झाली त्यात विविध बाबींचे मार्गदर्शन मंडळाचे अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील यांनी केले. यावेळी मंडळाचे सचिव नितीन उपासणी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, धुळ्याचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे, कैलास जैन व केंद्रसंचालक उपस्थित होते. उपासणी यांनी मार्गदर्शन केले. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. यासाठी यंदा मंडळाने कडक पाऊले उचलली आहेत. यंदापासून पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकांचे बंद पाकिट थेट त्यांच्या वर्गात जावून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेवून ते फोडले जाणार आहे.बरेच परिक्षार्थी आपला हात फॅक्चर झाल्याचे भासवून दुसºया लेखनिकाची मागणी करतात. यावर मंडळाने अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्वतंत्र प्रशासकीय पॅनेल तयार करून त्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विभागीय मंडळात बोलविले जाणार आहे.यात फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास त्यास तात्काळ डिबार करण्यात येणार आहे. ज्या दिवशी विषय शिक्षकांचा पेपर असेल त्या दिवशी ते शिक्षक परीक्षा केंद्र परिसरात येणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे.वर्गात एकापेक्षा अधीक कॉपी केस आढळली तर त्या पर्यवेक्षकावरही कारवाई करण्यात येईल. याचबरोबर परीक्षा कालावधीत इमारतीतील इंटरनेट सेवा बंद ठेवावी. अनधिकृत व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश देवू नये. वर्ग खोल्यांमधील वीज पुरवठा, पाणी, सुस्थितील बेंच याची व्यवस्था करावी.बालकामगारांना परीक्षा केंद्रात काम देवू नये. तसे आढळल्यास केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल. सहसा शाळेतील परिचरांनाच हे काम देण्यात यावे. जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या वेगवेगळ्या दक्षता समित्या आहेत. याशिवाय बैठे पथक स्थापन करण्यात आलेले आहेत.यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.