शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका पाकीट थेट वर्गातच पोहचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी पाणी वाटप आणि इतर कामांसाठी विद्यार्थी किंवा बालकांना कामास लावू नये ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बोर्डाच्या परिक्षेच्या वेळी पाणी वाटप आणि इतर कामांसाठी विद्यार्थी किंवा बालकांना कामास लावू नये अशा सक्त सुचना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटू नये यासठी बंद पाकिट थेट वर्गातच पर्यवेक्षकांना दिले जाणार आहे.दहावी व बारावीच्या परिक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. कॉपी रोखण्यसाठी आणि परीक्षा सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना वेळोवेळी बोर्ड अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. केंद्रसंचालकांची नुकतीच बैठक झाली त्यात विविध बाबींचे मार्गदर्शन मंडळाचे अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील यांनी केले. यावेळी मंडळाचे सचिव नितीन उपासणी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, धुळ्याचे उपशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे, कैलास जैन व केंद्रसंचालक उपस्थित होते. उपासणी यांनी मार्गदर्शन केले. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. यासाठी यंदा मंडळाने कडक पाऊले उचलली आहेत. यंदापासून पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकांचे बंद पाकिट थेट त्यांच्या वर्गात जावून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेवून ते फोडले जाणार आहे.बरेच परिक्षार्थी आपला हात फॅक्चर झाल्याचे भासवून दुसºया लेखनिकाची मागणी करतात. यावर मंडळाने अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्वतंत्र प्रशासकीय पॅनेल तयार करून त्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास विभागीय मंडळात बोलविले जाणार आहे.यात फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास त्यास तात्काळ डिबार करण्यात येणार आहे. ज्या दिवशी विषय शिक्षकांचा पेपर असेल त्या दिवशी ते शिक्षक परीक्षा केंद्र परिसरात येणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे.वर्गात एकापेक्षा अधीक कॉपी केस आढळली तर त्या पर्यवेक्षकावरही कारवाई करण्यात येईल. याचबरोबर परीक्षा कालावधीत इमारतीतील इंटरनेट सेवा बंद ठेवावी. अनधिकृत व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश देवू नये. वर्ग खोल्यांमधील वीज पुरवठा, पाणी, सुस्थितील बेंच याची व्यवस्था करावी.बालकामगारांना परीक्षा केंद्रात काम देवू नये. तसे आढळल्यास केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल. सहसा शाळेतील परिचरांनाच हे काम देण्यात यावे. जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या वेगवेगळ्या दक्षता समित्या आहेत. याशिवाय बैठे पथक स्थापन करण्यात आलेले आहेत.यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.