शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

सारंगखेड्यात पर्यटनाचा ‘सण्डे फिवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा येथील यात्रोत्सवात दिवसेंदिवस रंगत वाढत असून, रविवारी प्रचंड गर्दी दिसून आली. यामुळे लहान ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा येथील यात्रोत्सवात दिवसेंदिवस रंगत वाढत असून, रविवारी प्रचंड गर्दी दिसून आली. यामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.११ डिसेंबरपासून एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला सुरूवात झाली असून, जस जसे दिवस वाढत आहेत तस तसा सारंगखेडा यात्रोत्सव व चेतक फेस्टीवलची धूमही वाढत आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने झुले, भांडीबाजार, घोडे बाजार व खाद्य पदार्थ विक्रेते, मसाला विक्रेते व शीतपेय विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात भाविक खरेदी व खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतांना दिसून आले.शनिवारपासून चेतक महोत्सवाची रंगत वाढायला सुरूवात झाली. त्यातच रविवारी सुट्टी असल्याने यात्रोत्सवात गर्दीचा महापूर आल्याचे दिसून येत होते. या गर्दीमुळे विक्रेत्यांच्या चेहºयावर आनंद दिसून येत होता. सारंगखेडा यात्रा ही व्यावसायकांसाठी वर्षभरातील यात्रेचे लक्ष पूर्ण करणारी यात्रा आहे. येथील दत्त महाराजांच्या या यात्रोत्सवात प्रथम प्रभूदत्ताला विशेष मान आहे. यानंतर घोड्यांच्या बाजाराला ऐतिहासीक महत्व असून, याला चेतक फेस्टीवलची जोड लाभली आहे. त्यामुळे हा यात्रोत्सव महिनाभर रोजगार निर्मितीचा फेस्टीवल बनला आहे. सारंगखेडा हे गाव या फेस्टीवलमुळे जगाच्या नकाशावर पोहोचले आहे.चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी चेतक महोत्सवात अनेक कार्यक्रमांची मेजवानी ठेवली आहे. अहिराणी शो, लावणी शो, अश्व रांगाळी स्पर्धा, कॉमेडी शो, छोटा भीम, अश्व प्रदर्शन, जिल्हा परिषद शालेय नृत्य स्पर्धा, अश्व काठीयावाडी स्पर्धा, सारंग श्री शरीर सौष्ठव स्पर्धा, अश्व मारवाडी स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, अश्व दौड अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी चेतक फेस्टीवलमध्ये आहे.४घोडे बाजारात दिवसेंदिवस रंगत वाढत असून, घोडे बाजरात रविवारी ७५ घोड्यांची विक्री झाली असून, यातून ३३ लाख दोन हजार रूपयांची उलाढाल झाली आहे. तसेच आज अखेर दोन हजार ४०० घोड्यांची आवक मधून ३९२ घोड्यांची आज अखेर विक्री झाली आहे. यातून एक कोटी ४२ लाख २६ हजार ४०० रूपयांची उलाढाल झाली आहे. अर्थात सारंगखेडा येथील घोडे बाजाराने पाच दिवसात दीड कोटींचा टप्पा पार केला.४रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अगदी शहादा रोड ते टाकरखेड्यापर्यंतच्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच वाहतूक सुरळीत करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. मात्र व्यावसायिकांना आज अपेक्षेप्रमाणे फळ मिळाल्याने त्यांच्या चेहºयावर समाधानाचे चित्र दिसून आले.