शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

खतांनी भरलेला ट्रक उलटला : अक्कलकुवा जवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ 8833) हा शहाद्याहून खताच्या गोण्या भरून गुजरात राज्यात जाण्यासाठी निघाला होता. हा ट्रक अंकलेश्वर-ब:हाणपुर  राज्यमार्गावरील अक्कलकुवा शहराबाहेरील एका हॉटेल नजीकच्या वळणार आला असता भरधाव              वेगात असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उतरला. अनियंत्रित वेगामुळे  वळणाचा अंदाज चुकल्याने हा ट्रक रस्त्यावरून खाली उतरला व           रस्त्याच्या कडेला  असणा:या खड्डयात जाऊन आदळला. भरधाव वेग असल्याने खड्डयात आदळलेला ट्रक पलटी  झाला. हा अपघात एवढा भीषण  होता की, रस्त्याच्या             कडेवरून उतरलेला हा ट्रक  आदळला जाऊन अक्षरश: चित्रपटातील दृष्यांमध्ये शोभावा अशा पध्दतीने पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ट्रकचे चारही चाके वरच्या दिशेला झाली असून ट्रक मधील खताच्या गोण्या  ट्रक खालीच दाबल्या गेल्या. या ट्रकमध्ये चालक व सहचालक यांच्यासह अजून दोन ते तीन जण बसले असल्याची माहिती देण्याचे आली आली. या भीषण अपघातात ते बचावले असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत़ अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्यमार्गावर दिवस-रात्र मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. वाहनांची वाढलेली वर्दळ व दळणवळणाच्या दृष्टीने या मार्गाची उपयुक्तता लक्षात घेता राज्यमार्गावरील तळोदा ते अंकलेश्वर र्पयतचा रस्ता हा शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून सुमारे दीड वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या मार्गावर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना झाल्या नसल्याचे दिसून येते. दर दिवसाआड राज्य मार्गावरील तळोदा ते  खापर दरम्यान वाहने पलटी  होण्याचे प्रकार घडून येतात. भरधाव वेगाने धावणारी अनियंत्रित व ओव्हरलोड वाहने ही त्यामाग प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते.