शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

खतांनी भरलेला ट्रक उलटला : अक्कलकुवा जवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ 8833) हा शहाद्याहून खताच्या गोण्या भरून गुजरात राज्यात जाण्यासाठी निघाला होता. हा ट्रक अंकलेश्वर-ब:हाणपुर  राज्यमार्गावरील अक्कलकुवा शहराबाहेरील एका हॉटेल नजीकच्या वळणार आला असता भरधाव              वेगात असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उतरला. अनियंत्रित वेगामुळे  वळणाचा अंदाज चुकल्याने हा ट्रक रस्त्यावरून खाली उतरला व           रस्त्याच्या कडेला  असणा:या खड्डयात जाऊन आदळला. भरधाव वेग असल्याने खड्डयात आदळलेला ट्रक पलटी  झाला. हा अपघात एवढा भीषण  होता की, रस्त्याच्या             कडेवरून उतरलेला हा ट्रक  आदळला जाऊन अक्षरश: चित्रपटातील दृष्यांमध्ये शोभावा अशा पध्दतीने पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ट्रकचे चारही चाके वरच्या दिशेला झाली असून ट्रक मधील खताच्या गोण्या  ट्रक खालीच दाबल्या गेल्या. या ट्रकमध्ये चालक व सहचालक यांच्यासह अजून दोन ते तीन जण बसले असल्याची माहिती देण्याचे आली आली. या भीषण अपघातात ते बचावले असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत़ अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्यमार्गावर दिवस-रात्र मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. वाहनांची वाढलेली वर्दळ व दळणवळणाच्या दृष्टीने या मार्गाची उपयुक्तता लक्षात घेता राज्यमार्गावरील तळोदा ते अंकलेश्वर र्पयतचा रस्ता हा शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून सुमारे दीड वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या मार्गावर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना झाल्या नसल्याचे दिसून येते. दर दिवसाआड राज्य मार्गावरील तळोदा ते  खापर दरम्यान वाहने पलटी  होण्याचे प्रकार घडून येतात. भरधाव वेगाने धावणारी अनियंत्रित व ओव्हरलोड वाहने ही त्यामाग प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते.