शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खतांनी भरलेला ट्रक उलटला : अक्कलकुवा जवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावरील अक्कलकुव्याजवळ खतांनी भरलेला ट्रक भरधाव वेगामुळे उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु यामुळे अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े ही घटना गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती असे की, खतांनी भरलेला ट्रक (क्रमांक जी.ज़े 5 ङोड़ 8833) हा शहाद्याहून खताच्या गोण्या भरून गुजरात राज्यात जाण्यासाठी निघाला होता. हा ट्रक अंकलेश्वर-ब:हाणपुर  राज्यमार्गावरील अक्कलकुवा शहराबाहेरील एका हॉटेल नजीकच्या वळणार आला असता भरधाव              वेगात असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उतरला. अनियंत्रित वेगामुळे  वळणाचा अंदाज चुकल्याने हा ट्रक रस्त्यावरून खाली उतरला व           रस्त्याच्या कडेला  असणा:या खड्डयात जाऊन आदळला. भरधाव वेग असल्याने खड्डयात आदळलेला ट्रक पलटी  झाला. हा अपघात एवढा भीषण  होता की, रस्त्याच्या             कडेवरून उतरलेला हा ट्रक  आदळला जाऊन अक्षरश: चित्रपटातील दृष्यांमध्ये शोभावा अशा पध्दतीने पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ट्रकचे चारही चाके वरच्या दिशेला झाली असून ट्रक मधील खताच्या गोण्या  ट्रक खालीच दाबल्या गेल्या. या ट्रकमध्ये चालक व सहचालक यांच्यासह अजून दोन ते तीन जण बसले असल्याची माहिती देण्याचे आली आली. या भीषण अपघातात ते बचावले असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत़ अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्यमार्गावर दिवस-रात्र मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. वाहनांची वाढलेली वर्दळ व दळणवळणाच्या दृष्टीने या मार्गाची उपयुक्तता लक्षात घेता राज्यमार्गावरील तळोदा ते अंकलेश्वर र्पयतचा रस्ता हा शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून सुमारे दीड वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या मार्गावर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना झाल्या नसल्याचे दिसून येते. दर दिवसाआड राज्य मार्गावरील तळोदा ते  खापर दरम्यान वाहने पलटी  होण्याचे प्रकार घडून येतात. भरधाव वेगाने धावणारी अनियंत्रित व ओव्हरलोड वाहने ही त्यामाग प्रमुख कारणे असल्याचे बोलले जाते.