शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील शेतांमध्ये बिबट्यांसह वानरांच्या कळपाने धाव घेतल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ब्राह्मणपुरीकडून गणपती मंदिरमार्गे सुलवाडेकडे जाणाºया रस्त्यावर तीन बिबटे ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. मोटारसायकलचा लाईट चमकल्याने तिन्ही बिबटे जवळ असलेल्या केळीच्या बागेत पळाले. तेथून भयभीत झालेले तुषार मराठे, निखिल शिंदे व रोहित मराठे यांनी गावात येऊन ग्रामस्थांना याबाबत सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटनाही घडली होती. या बिबट्यांच्या वास्तव्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.दरम्यान, ब्राह्मणपुरी परिसरात वानरांची टोळी आली आहे. या टोळीतील वानरे गाव वस्तीत फिरकत असल्याने त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या त्यांच्याकडून नुकसान होत नसले तरी त्यांचा उपद्रव वाढण्याआधी बंदोबस्त करण्याची गरज आहे.