शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाचे आगमन होण्यापूर्वी जिल्ह्यात उन्हाळ्याच्या प्रारंभी जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उष्माघात कक्ष तयार करून ते ...

नंदुरबार : कोरोनाचे आगमन होण्यापूर्वी जिल्ह्यात उन्हाळ्याच्या प्रारंभी जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उष्माघात कक्ष तयार करून ते कार्यान्वित केले जात होते. परंतु, गेल्या दोन वर्षांत उन्हाळ्यात लाॅकडाऊन सुरू राहत असल्याने हे कक्ष तयार करणे थांबविण्यात आले आहेत.

जिल्ह्यात उष्माघाताने नागरिकांवर मृत्यू ओढवण्याचे प्रमाण हे नगण्य आहे. परंतु तापमानाचा पारा ४२ पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याने २०१९ पर्यंत प्रत्येक ठिकाणी १० खाटांचे उष्माघात कक्ष तयार करण्यात येत होते. लग्नसराईत बाहेरगावाहून आलेले तसेच कामगार यांना या कक्षाचा बऱ्यापैकी लाभ झाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. परंतु २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे वेळोवेळी सुरू राहणारा लाॅकडाऊन या कक्षांना टाळे लावणारा ठरला आहे. विशेष म्हणजे गत दोन वर्षांत उष्माघाताचा एकही रुग्ण जिल्हा रुग्णालय किंवा इतर कुठे दाखल झालेला नाही.

ऊन वाढले तरी

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी उकाडा कायम आहे. तत्पूर्वी तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला होता. सलग आठवडाभर तापमानवाढीमुळे उकाडा होत होता. परंतु लाॅकडाऊन असल्याने नागरिक दुपारी घराबाहेरच पडत नसल्याने वाढलेले तापमान जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

उन्हाळा घरातच..

मार्च २०२० पासून सुरू झालेले लाॅकडाऊन तीन महिने सुरू होते. यानंतर यंदाही एक एप्रिलपासून सुरू झालेले लाॅकडाऊन टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आले. यातून नागरिकांचा उन्हाळा घरातच गेला आहे. गरजेची कामे सकाळच्या वेळेत होत आहेत. दुपारी बाहेर पडण्याचे कारण नसल्याने उन्हाचा सामना टळतो आहे.