शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

माघारीसाठी अनेकांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डमी, अपक्ष आणि पक्षाचा अधिकृत उमेदवाराचे मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी आता विनवण्या, मनधरणी करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डमी, अपक्ष आणि पक्षाचा अधिकृत उमेदवाराचे मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी आता विनवण्या, मनधरणी करीत आश्वासनांची खैरात सुरू झाली आहे. ३० तारखेपर्यंत माघारीची मुदत असल्यामुळे त्याच्या आत संबधितांना समजविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, माघारीसाठी दबाव येणार हे लक्षात घेता अनेक उमेदवार व अपक्ष हे दोन दिवसांपासून नॉट रिचबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात काही अपवाद वगळता मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात हौशी मंडळींचा देखील मोठा भरणा आहे. सुदैवाने अशा मंडळींचे नामांकन अर्ज छाननीत वैध ठरल्याने आता त्यांना जरा जास्तच भाव आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा डोकेदुखी ठरणाºया उमेदवारांना माघारीसाठी प्रयत्न करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.नात्यागोत्याचा आधारअपक्ष व इतर उमेदवारांच्या माघारीसाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार आता नातेगोत्याचाही आधार घेत आहेत. नात्यामधील इतर मंडळींना वरिष्ठ व आदर असलेल्या मंडळींना अशा लोकांकडे संबधीत उमेदवाराच्या मनधरणीसाठी पाठविले जात आहे.यासाठी नातेवाईकांच्या बैठकांचे सत्र देखील सुरू आहे. त्यात चर्चा करून माघारीसाठी विनवण्या केल्या जात आहेत तर कुठे दबाव आणला जात आहे. नाहीच ऐकले तर पाहून घेण्याची भाषा देखील नात्यागोत्यातील बैठकांमधून दिसून येत आहे. येत्या काही दिवसात अर्थात रविवारपर्यंत या सर्व घडामोडींना आणखी वेग येणार आहे.राजकीय दडपणहीमाघारीसाठी राजकीय दडपण देखील टाकले जात आहे. ज्यांनी ज्या पक्षाकडून उमेदवारी मागितली ती मिळाली नाही तर लागलीच दुसºया पक्षाकडून उमेदवारी घेत उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांची माघार कशी होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.यापुढील काळात राजकीय आश्वासने देखील दिली जात आहेत. ग्रामपंचायतीत संधी देण्यासोबतच इतर माध्यमही वापरली जात आहेत. काहींना जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कामे उपलब्ध करून देण्यासह इतर माध्यमातून संधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. अर्थात संबधीतांची सत्ता आली तर ते शक्य आहे. सुरुवातीला राजकीय पदाधिकारी शब्द टाकत आहेत परंतु त्यांचेही ऐकले नाही तर थेट नेत्यांकडून संबधीतांना सांगितले जात आहे. त्यासाठी नेत्याच्या कार्यालयात संबधीताला नेणे किंवा गावातच प्रतिष्ठीताकडे बैठक बोलावून अशा उमेदवारांना समजविण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.बेरीज-वजाबाकीकाही कारणांनी संबधीत उमेदवारांनी माघार घेतलीच नाही तर त्यातून आपल्याला किती तोटा होऊ शकतो, किती मते विरोधात जावू शकतात याचे गणितही लावले जात आहे. जर विजयाची खात्री असेल तर असे प्रमुख उमेदवार संबधीतांना माघारीसाठी फारसा प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे.याउलट ज्या अपक्ष किंवा बंडखोर उमेदवारामुळे कसा फायदा होईल, किती मतांचा फरक पडेल याचीही चाचपणी केली जात आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना मुद्दाम रिंगणात राहू दिले जात आहे. त्यासाठी त्याला रसद देखील पुरविली जात आहे. त्याने माघार घेवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.एकुणच अर्ज छाननी नंतर आता माघारीकडे लक्ष लागून आहे. छाननीनंतर अनेक गट व गणातील लढती स्पष्ट झालेल्या आहेत. तरीही माघारीनंतर आणखी चित्र स्पष्ट होणार आहे. अनेकांना सोप्या तर काहींना कठीण लढतींना देखील सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत काय काय घडामोडी होतात, कोण-कोण माघार घेतो, कुणाची उमेदवारी आणि बंडखोरी कुणाला फायद्याची आणि पथ्यावर पडणारी ठरते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.माघारीची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस मोठ्या घडामोडी ग्रामिण भागात होणार असल्याचे चित्र आहे.काही प्रमुख उमेदवारांनीच स्वत: काही अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा फायदा व तोटा हे येणाºया काळातच दिसणार आहे.भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी यांनी जास्तीत जास्त मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. अपक्षांचाही भरणा भरपूर गट व गणात दिसून येत आहे.माघारीनंतर प्रचारासाठी अवघे सात दिवस मिळणार असल्यामुळे अनेकांनी आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे.