शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

माघारीसाठी अनेकांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डमी, अपक्ष आणि पक्षाचा अधिकृत उमेदवाराचे मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी आता विनवण्या, मनधरणी करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डमी, अपक्ष आणि पक्षाचा अधिकृत उमेदवाराचे मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी आता विनवण्या, मनधरणी करीत आश्वासनांची खैरात सुरू झाली आहे. ३० तारखेपर्यंत माघारीची मुदत असल्यामुळे त्याच्या आत संबधितांना समजविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, माघारीसाठी दबाव येणार हे लक्षात घेता अनेक उमेदवार व अपक्ष हे दोन दिवसांपासून नॉट रिचबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात काही अपवाद वगळता मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात हौशी मंडळींचा देखील मोठा भरणा आहे. सुदैवाने अशा मंडळींचे नामांकन अर्ज छाननीत वैध ठरल्याने आता त्यांना जरा जास्तच भाव आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा डोकेदुखी ठरणाºया उमेदवारांना माघारीसाठी प्रयत्न करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.नात्यागोत्याचा आधारअपक्ष व इतर उमेदवारांच्या माघारीसाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार आता नातेगोत्याचाही आधार घेत आहेत. नात्यामधील इतर मंडळींना वरिष्ठ व आदर असलेल्या मंडळींना अशा लोकांकडे संबधीत उमेदवाराच्या मनधरणीसाठी पाठविले जात आहे.यासाठी नातेवाईकांच्या बैठकांचे सत्र देखील सुरू आहे. त्यात चर्चा करून माघारीसाठी विनवण्या केल्या जात आहेत तर कुठे दबाव आणला जात आहे. नाहीच ऐकले तर पाहून घेण्याची भाषा देखील नात्यागोत्यातील बैठकांमधून दिसून येत आहे. येत्या काही दिवसात अर्थात रविवारपर्यंत या सर्व घडामोडींना आणखी वेग येणार आहे.राजकीय दडपणहीमाघारीसाठी राजकीय दडपण देखील टाकले जात आहे. ज्यांनी ज्या पक्षाकडून उमेदवारी मागितली ती मिळाली नाही तर लागलीच दुसºया पक्षाकडून उमेदवारी घेत उमेदवारी अर्ज दाखल केला गेला आहे. त्यामुळे अशा उमेदवारांची माघार कशी होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.यापुढील काळात राजकीय आश्वासने देखील दिली जात आहेत. ग्रामपंचायतीत संधी देण्यासोबतच इतर माध्यमही वापरली जात आहेत. काहींना जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कामे उपलब्ध करून देण्यासह इतर माध्यमातून संधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. अर्थात संबधीतांची सत्ता आली तर ते शक्य आहे. सुरुवातीला राजकीय पदाधिकारी शब्द टाकत आहेत परंतु त्यांचेही ऐकले नाही तर थेट नेत्यांकडून संबधीतांना सांगितले जात आहे. त्यासाठी नेत्याच्या कार्यालयात संबधीताला नेणे किंवा गावातच प्रतिष्ठीताकडे बैठक बोलावून अशा उमेदवारांना समजविण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत.बेरीज-वजाबाकीकाही कारणांनी संबधीत उमेदवारांनी माघार घेतलीच नाही तर त्यातून आपल्याला किती तोटा होऊ शकतो, किती मते विरोधात जावू शकतात याचे गणितही लावले जात आहे. जर विजयाची खात्री असेल तर असे प्रमुख उमेदवार संबधीतांना माघारीसाठी फारसा प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे.याउलट ज्या अपक्ष किंवा बंडखोर उमेदवारामुळे कसा फायदा होईल, किती मतांचा फरक पडेल याचीही चाचपणी केली जात आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना मुद्दाम रिंगणात राहू दिले जात आहे. त्यासाठी त्याला रसद देखील पुरविली जात आहे. त्याने माघार घेवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.एकुणच अर्ज छाननी नंतर आता माघारीकडे लक्ष लागून आहे. छाननीनंतर अनेक गट व गणातील लढती स्पष्ट झालेल्या आहेत. तरीही माघारीनंतर आणखी चित्र स्पष्ट होणार आहे. अनेकांना सोप्या तर काहींना कठीण लढतींना देखील सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत काय काय घडामोडी होतात, कोण-कोण माघार घेतो, कुणाची उमेदवारी आणि बंडखोरी कुणाला फायद्याची आणि पथ्यावर पडणारी ठरते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.माघारीची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस मोठ्या घडामोडी ग्रामिण भागात होणार असल्याचे चित्र आहे.काही प्रमुख उमेदवारांनीच स्वत: काही अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा फायदा व तोटा हे येणाºया काळातच दिसणार आहे.भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी यांनी जास्तीत जास्त मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. अपक्षांचाही भरणा भरपूर गट व गणात दिसून येत आहे.माघारीनंतर प्रचारासाठी अवघे सात दिवस मिळणार असल्यामुळे अनेकांनी आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे.