शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

Vidhan Sabha 2019: सासरे, जावाईला दिली हॅटट्रीकची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:52 IST

मनोज शेलार।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदारसंघ निर्मितीपासून नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु 1995 च्या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत हे ...

मनोज शेलार। लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मतदारसंघ निर्मितीपासून नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु 1995 च्या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत हे प्रस्थापितांना आव्हान देत अपक्ष निवडून आले. तेंव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसपासून दुरावला. गेल्या 25 वर्षापासून मतदारसंघात डॉ.गावीत हेच प्रतिनिधीत्व करीत आहेत. असे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र काँग्रेस अर्थात चंद्रकांत रघुवंशी यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे.  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच नंदुरबार हा स्वतंत्र मतदारसंघ राहिला आहे. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी अर्थात 1962 च्या पहिल्या निवडणुकीत मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी होता. परंतु नंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ एस.टी.प्रवर्गासाठी राखीव राहिला आहे. मतदारसंघावर 1962 ते 1995 र्पयत माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांची अर्थात काँग्रेसची पकड होती. त्यांच्या काळात माजी गृहराज्यमंत्री व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे सासरे कै.आर.पी.वळवी यांनी 1967 ते 1985 र्पयत नेतृत्व केले. सतत चार वेळा निवडून आल्याने कै.वळवी यांना काँग्रेसने गृहराज्यमंत्री बनविले.  परंतु 1985 च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही. त्यांच्या ऐवजी प्रा.इंद्रसिंग वसावे यांना तिकिट दिल्याने ते निवडून आले. त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर काँग्रेसने पुन्हा 1990 मध्ये उमेदवार बदलला. पंचायत समितीचे माजी सभापती प्रताप रुपजी वळवी यांना काँग्रेसने तिकिट दिले ते देखील निवडून आले. तब्बल 33 वर्ष काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ 1995 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसपासून दुरावला.विजयकुमार गावीत यांची एण्ट्रीमतदारसंघात काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण झाले होते. लोकांना बदल हवा असे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यासाठी सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. राजकीय पाश्र्वभुमी लाभलेले आणि उच्चशिक्षीत उमेदवार म्हणून डॉ.विजयकुमार गावीत यांना विरोधकांनी निवडणुकीसाठी तयार केले. 1995 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून डॉ.गावीत मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. तेंव्हापासून मात्र  त्यांचेच वर्चस्व या मतदारसंघात राहिले आहे. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीचा उदय झाला. शरद पवार यांनी डॉ. गावीत यांना राष्ट्रवादीत प्रवेश देवून तिकीटही दिले.  राष्ट्रवादीच्या तिकिटावर डॉ.गावीत तीन टर्म निवडून आले. तिन्ही टर्ममध्ये त्यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाले. आता 2019 च्या निवडणुकीत बरेच राजकीय फेरबदल झालेले आहेत. 

 नंदुरबार मतदार संघातील योगायोग असा की दुस:या निवडणुकीपासून पाचव्या निवडणुकीर्पयत सलग चार वेळा निवडून आलेले कै.आर.पी.वळवी हे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे सासरे होते. सास:यांचा विजयाचा कित्ता डॉ.गावीत यांनीही गिरविला. ते देखील सलग पाच वेळा निवडून आले आहेत. कै.वळवी हे एकाच पक्षातून निवडून येत तर डॉ.गावीत यांनी दोन वेळा पक्ष बदलला आहे. मतदार संघातील हा देखील एक योगायोगच म्हणता येईल. 1995 र्पयत मतदार संघात आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच पक्षाचे वर्चस्व  होते. नंतर अर्थात 1995 पासून हे सूत्र बदलले. आमदार एका पक्षाचा तर स्थानिक स्वराज्य संस्था या दुस:या पक्षाकडे असे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे तेंव्हापासून गावागावात दोन गट पडले. दोन पक्षांचे कार्यकर्ते निर्माण झाले आणि त्यातून राजकीय वर्चस्वासाठी स्पर्धा निर्माण झाली. ती आजतागायत सुरू आहे. आता राजकीय समिकरणे बदलली असली तरी येणा:या काळाची प्रतिक्षा आहेच.

 नंदुरबार मतदरासंघ सर्वसाधाण व्हावा यासाठी पुरेपूर प्रय} झाला. त्यानुसार 2008 मध्ये झालेल्या मतदार संघांच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ नंदुरबार शहरापासून थेट शिरपूर तालुक्याच्या सिमेर्पयत विस्तारीत करण्यात आला. परिणामी आदिवासी मतदारांची संख्या कमी झाली. परंतु राज्यातील आदिवासी मतदार संघांच्या एकुण संख्या होत नसल्याने नंदुरबारचही त्यात समावेश झाला. परिणामी सर्वसाधारण मतदार संघाचे स्वप्न भंगले.मतदार संघाचे पहिले आमदार कै.गजमल तुळशीराम पाटील अर्थात जी.टी.बापुजी यांचे तालुक्यात प्रस्थ होते. त्यांनी नंदुरबारात शैक्षणिक संस्था देखील सुरू केली.  त्या माध्यमातून अनेक वर्ष त्यांनी समाजसेवा व राजकारण केले. पंचायत समितीचे ते सभापती व विविध पदांवर देखील होते.