शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: सासरे, जावाईला दिली हॅटट्रीकची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:52 IST

मनोज शेलार।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदारसंघ निर्मितीपासून नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु 1995 च्या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत हे ...

मनोज शेलार। लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मतदारसंघ निर्मितीपासून नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. परंतु 1995 च्या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावीत हे प्रस्थापितांना आव्हान देत अपक्ष निवडून आले. तेंव्हापासून हा मतदारसंघ काँग्रेसपासून दुरावला. गेल्या 25 वर्षापासून मतदारसंघात डॉ.गावीत हेच प्रतिनिधीत्व करीत आहेत. असे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र काँग्रेस अर्थात चंद्रकांत रघुवंशी यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे.  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच नंदुरबार हा स्वतंत्र मतदारसंघ राहिला आहे. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी अर्थात 1962 च्या पहिल्या निवडणुकीत मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी होता. परंतु नंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ एस.टी.प्रवर्गासाठी राखीव राहिला आहे. मतदारसंघावर 1962 ते 1995 र्पयत माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांची अर्थात काँग्रेसची पकड होती. त्यांच्या काळात माजी गृहराज्यमंत्री व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे सासरे कै.आर.पी.वळवी यांनी 1967 ते 1985 र्पयत नेतृत्व केले. सतत चार वेळा निवडून आल्याने कै.वळवी यांना काँग्रेसने गृहराज्यमंत्री बनविले.  परंतु 1985 च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसने तिकीट दिले नाही. त्यांच्या ऐवजी प्रा.इंद्रसिंग वसावे यांना तिकिट दिल्याने ते निवडून आले. त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर काँग्रेसने पुन्हा 1990 मध्ये उमेदवार बदलला. पंचायत समितीचे माजी सभापती प्रताप रुपजी वळवी यांना काँग्रेसने तिकिट दिले ते देखील निवडून आले. तब्बल 33 वर्ष काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ 1995 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसपासून दुरावला.विजयकुमार गावीत यांची एण्ट्रीमतदारसंघात काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण झाले होते. लोकांना बदल हवा असे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यासाठी सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. राजकीय पाश्र्वभुमी लाभलेले आणि उच्चशिक्षीत उमेदवार म्हणून डॉ.विजयकुमार गावीत यांना विरोधकांनी निवडणुकीसाठी तयार केले. 1995 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून डॉ.गावीत मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. तेंव्हापासून मात्र  त्यांचेच वर्चस्व या मतदारसंघात राहिले आहे. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीचा उदय झाला. शरद पवार यांनी डॉ. गावीत यांना राष्ट्रवादीत प्रवेश देवून तिकीटही दिले.  राष्ट्रवादीच्या तिकिटावर डॉ.गावीत तीन टर्म निवडून आले. तिन्ही टर्ममध्ये त्यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाले. आता 2019 च्या निवडणुकीत बरेच राजकीय फेरबदल झालेले आहेत. 

 नंदुरबार मतदार संघातील योगायोग असा की दुस:या निवडणुकीपासून पाचव्या निवडणुकीर्पयत सलग चार वेळा निवडून आलेले कै.आर.पी.वळवी हे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे सासरे होते. सास:यांचा विजयाचा कित्ता डॉ.गावीत यांनीही गिरविला. ते देखील सलग पाच वेळा निवडून आले आहेत. कै.वळवी हे एकाच पक्षातून निवडून येत तर डॉ.गावीत यांनी दोन वेळा पक्ष बदलला आहे. मतदार संघातील हा देखील एक योगायोगच म्हणता येईल. 1995 र्पयत मतदार संघात आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच पक्षाचे वर्चस्व  होते. नंतर अर्थात 1995 पासून हे सूत्र बदलले. आमदार एका पक्षाचा तर स्थानिक स्वराज्य संस्था या दुस:या पक्षाकडे असे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे तेंव्हापासून गावागावात दोन गट पडले. दोन पक्षांचे कार्यकर्ते निर्माण झाले आणि त्यातून राजकीय वर्चस्वासाठी स्पर्धा निर्माण झाली. ती आजतागायत सुरू आहे. आता राजकीय समिकरणे बदलली असली तरी येणा:या काळाची प्रतिक्षा आहेच.

 नंदुरबार मतदरासंघ सर्वसाधाण व्हावा यासाठी पुरेपूर प्रय} झाला. त्यानुसार 2008 मध्ये झालेल्या मतदार संघांच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ नंदुरबार शहरापासून थेट शिरपूर तालुक्याच्या सिमेर्पयत विस्तारीत करण्यात आला. परिणामी आदिवासी मतदारांची संख्या कमी झाली. परंतु राज्यातील आदिवासी मतदार संघांच्या एकुण संख्या होत नसल्याने नंदुरबारचही त्यात समावेश झाला. परिणामी सर्वसाधारण मतदार संघाचे स्वप्न भंगले.मतदार संघाचे पहिले आमदार कै.गजमल तुळशीराम पाटील अर्थात जी.टी.बापुजी यांचे तालुक्यात प्रस्थ होते. त्यांनी नंदुरबारात शैक्षणिक संस्था देखील सुरू केली.  त्या माध्यमातून अनेक वर्ष त्यांनी समाजसेवा व राजकारण केले. पंचायत समितीचे ते सभापती व विविध पदांवर देखील होते.