शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:13 IST

तळोदा तालुका : नवीन कुपनलिका खोदण्यासाठी शेतक:यांची धांदल

तळोदा : कमी पजर्न्यमानामुळे दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत असल्याने तालुक्यातील शेतक:यांचे बोअर आटत आहेत. साहजिकच शेतक:यांपुढे पीक वाचविण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नाईलाजास्तव शेतक:यांना बोअर करावा लागत आहे. सद्या बोअर करणा:या शेतक:यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे बोअर व्यावसायिकांचा धंदादेखील तेजीत आला आहे. दरम्यान 70 ते 80 फुटावरील पाण्याची पातळी 200 फुटा पेक्षा अधिक खोलवर गेल्याचे शेतकरी सांगतात.गेल्या पाच वर्षापासून तळोदा तालुक्यातील पजर्न्यमान सातत्याने घटत आहे. यंदा तर सरासरीच्या 50 टक्केदेखील पाऊस झाला नाही. एवढेच नव्हे तर मुसळधार पावसाअभावी नदी, नाले पुराने वाहून निघाली नाही. शिवाय धरणांच्या जलसाठाही वाढला नाही. परिणामी सिंचन प्रकल्पांवर अवलंबून असणारी शेतक:यांची कृषी पंपाची पातळीही वाढली नाही. आता तर हिवाळ्यापासूनच भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने शेतक:यांचे कृषी पंप निकामी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ऊस, केळी, पपई, कापूस ही पिके पाण्याअभावी करपू लागल्यामुळे शेतक:यांपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंपातून अत्यल्प पाणी येत असल्याने शेतकरी वर्ग बोअरमध्ये पाईप उतरवून अक्षरश: हैराण झाला आहे. तरीही उपयोग होत नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यास दुसरा बोअर करावा लागत आहे.शेतात बोअर करणा:या शेतक:यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. साहजिकच टय़ुबवेल व्यावसायिकांचा धंदा तेजीत आला आहे. तरीही लवकर नंबर लागत नसल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली आहे.  1972 नंतर प्रथमच तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवली असल्याची स्थिती जुने जानकार मंडळी सांगत आहेत. कारण अगदी 70 ते 80 फुटावरच भूगर्भातील पाण्याची पातळी होती. आता पाण्याची पातळी तब्बल 200 फुटापेक्षा अधिक खोलवर गेली आहे. तशी वस्तुस्थितीही शेतात बोअरींगचे काम करणा:या एका मजुराने सांगितली. एका शेतक:याने तर तब्बल चार बोअर केले. मात्र ते सर्व फेल झालेत. आता पुन्हा नवीन बोअरचे काम सुरू आहे. शेतातील केळी, उसाचे पीक पाण्याअभावी करपू लागल्यामुळे नाईलाजास्तव प्रचंड खर्च करून नवीन बोअर करावा लागत आहे. आता पाण्यासाठी दैवावर विश्वास आहे, अशी हताश भावना या शेतक:याने व्यक्त केली होती. आधीच पुरेशा पावसाअभावी शेतक:यांच्या खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. आता शेतातील बोअर आटत आहे. त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने दृष्काळी सुविधांची तातडीने अंमल बजावणी करावी, अशी शेतक:यांची मागणी आहे.