शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:13 IST

तळोदा तालुका : नवीन कुपनलिका खोदण्यासाठी शेतक:यांची धांदल

तळोदा : कमी पजर्न्यमानामुळे दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत असल्याने तालुक्यातील शेतक:यांचे बोअर आटत आहेत. साहजिकच शेतक:यांपुढे पीक वाचविण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, नाईलाजास्तव शेतक:यांना बोअर करावा लागत आहे. सद्या बोअर करणा:या शेतक:यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे बोअर व्यावसायिकांचा धंदादेखील तेजीत आला आहे. दरम्यान 70 ते 80 फुटावरील पाण्याची पातळी 200 फुटा पेक्षा अधिक खोलवर गेल्याचे शेतकरी सांगतात.गेल्या पाच वर्षापासून तळोदा तालुक्यातील पजर्न्यमान सातत्याने घटत आहे. यंदा तर सरासरीच्या 50 टक्केदेखील पाऊस झाला नाही. एवढेच नव्हे तर मुसळधार पावसाअभावी नदी, नाले पुराने वाहून निघाली नाही. शिवाय धरणांच्या जलसाठाही वाढला नाही. परिणामी सिंचन प्रकल्पांवर अवलंबून असणारी शेतक:यांची कृषी पंपाची पातळीही वाढली नाही. आता तर हिवाळ्यापासूनच भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने शेतक:यांचे कृषी पंप निकामी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ऊस, केळी, पपई, कापूस ही पिके पाण्याअभावी करपू लागल्यामुळे शेतक:यांपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंपातून अत्यल्प पाणी येत असल्याने शेतकरी वर्ग बोअरमध्ये पाईप उतरवून अक्षरश: हैराण झाला आहे. तरीही उपयोग होत नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यास दुसरा बोअर करावा लागत आहे.शेतात बोअर करणा:या शेतक:यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. साहजिकच टय़ुबवेल व्यावसायिकांचा धंदा तेजीत आला आहे. तरीही लवकर नंबर लागत नसल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली आहे.  1972 नंतर प्रथमच तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवली असल्याची स्थिती जुने जानकार मंडळी सांगत आहेत. कारण अगदी 70 ते 80 फुटावरच भूगर्भातील पाण्याची पातळी होती. आता पाण्याची पातळी तब्बल 200 फुटापेक्षा अधिक खोलवर गेली आहे. तशी वस्तुस्थितीही शेतात बोअरींगचे काम करणा:या एका मजुराने सांगितली. एका शेतक:याने तर तब्बल चार बोअर केले. मात्र ते सर्व फेल झालेत. आता पुन्हा नवीन बोअरचे काम सुरू आहे. शेतातील केळी, उसाचे पीक पाण्याअभावी करपू लागल्यामुळे नाईलाजास्तव प्रचंड खर्च करून नवीन बोअर करावा लागत आहे. आता पाण्यासाठी दैवावर विश्वास आहे, अशी हताश भावना या शेतक:याने व्यक्त केली होती. आधीच पुरेशा पावसाअभावी शेतक:यांच्या खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असून, उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. आता शेतातील बोअर आटत आहे. त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने दृष्काळी सुविधांची तातडीने अंमल बजावणी करावी, अशी शेतक:यांची मागणी आहे.