शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेती परवडत नसल्याने उक्ते देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

जयनगर : ग्रामीण भागाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये मशागतीची तयारी जोरात दिसत असली ...

जयनगर : ग्रामीण भागाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये मशागतीची तयारी जोरात दिसत असली तरी निसर्गाच्या तडाख्यामुळे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे भांडवली खर्च शेतीत परवडत नाहीये. म्हणून परिसरातील अनेक शेतकरी आपली जमीन उक्ते देण्याकडे देताना दिसून येत आहेत.

दोन वर्षांपासून पावसाळा समाधानकारक होत असला तरी एका मागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी बेजार झाला असून, आजच्या घडीला शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. म्हणून अनेक शेतकरी आवाक्याबाहेर लागत असलेल्या भांडवली खर्चामुळे आपली शेती उक्ते देताना दिसत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे एक ते चार एकरपर्यंत शेती आहे, असे शेतकरी मोठे बागायतदार शेतकऱ्यांना एकरी १० ते १५ हजारांपर्यंत नफ्याने जमीन कसायला देत आहेत.

गेल्या १५ महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट जाता जात नाहीये. त्यात निसर्गाने अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ यासारखे संकट निर्माण केल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांचे शेतीसाठी लावलेले भांडवलही निघत नाही. त्यामुळे जे शेतकरी उधार - उसनवारीने पैसे घेऊन आपल्या शेतीत भांडवल लावत असतात ते दिवसेंदिवस अधिकच कर्जबाजारी होत आहेत.

नैसर्गिक आपत्तीसह शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.

कोरोना महामारीमुळे अनेकदा बाजारपेठा बंद आहेत, अशावेळी व्यापारीही माल घेण्यासाठी फिरकत नाही. जे मोजके व्यापारी येतात ते परिस्थितीचा फायदा उचलून मनमानी भावाने शेतकऱ्यांचा माल मागत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी शेती करणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रासायनिक खते, बी - बियाणे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे वाढलेली मजुरी, सतत उद्भवणारी बोंडअळी, वाहतुकीचा वाढलेला खर्च, जमीन मशागतीचे वाढलेले दर, उत्पन्नात झालेली घट यासारख्या असंख्य समस्यांना सध्या शेतकरी तोंड देत आहे. त्यामुळे हताश होऊन अनेक सामान्य शेतकरी आपली जमीन मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांना एक - दोन वर्षाच्या बोलीवर नफ्याने कसण्यासाठी देत आहेत. पूर्वी जे नोकरदार शेतकरी बाहेरगावी नोकरीस होते. तेच आपली जमीन उक्ते देत होते. मात्र आता वर्षानुवर्षे शेती करणारा सधन शेतकरीही शेतीमध्ये येत असलेल्या असंख्य अडचणी तसेच भांडवली खर्च परवडत नसल्यामुळे आपली जमीन निम्मे बटाई किंवा उक्ते देत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात सगळ्यांचे भाव वाढले. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही.

कोरोना या संसर्गजन्य आजारापासून लोकांचा बचाव व्हावा, म्हणून शासनाने अनेकदा कडक निर्बंध तसेच संचारबंदी लागू केली. याचा फायदा सर्व व्यापारी तसेच अनेक धंदेवाईकांना झाला. संचारबंदीमुळे किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतीयोग्य वस्तू यामध्ये बी-बियाणे, रासायनिक खते, अवजारे या सारख्या गोष्टींचे भाव वाढतच आहेत. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत घेऊन जायचा असेल तर कोरोनाच्या नावाखाली वाहतुकीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोना काळात घर बांधण्यासाठी लागणारे विटा, सिमेंट, लोखंड, कारागीर यांचे दर वाढले. हार्डवेअरचे वस्तू, नवी मोटारसायकल अशा अनेक गोष्टी असतील की, त्यांचे भाव वाढले. मात्र शेतकऱ्याचे नशीब असे आहे की, आयुष्यभर राबराब राबून दुसऱ्याच्या तोंडात अन्नाचा घास भरविणारा आज चोहोबाजूंनी संकटात सापडलेला आहे. आणि त्याच्याच मालाला भाव भेटत नाहीये. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, कर्जबाजारीपणामुळे हताश होऊन शेती करणे नकोशी वाटत असल्याने जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला निम्मे बटाई अथवा उक्ते देणे पसंत करीत आहे.