शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ठरलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांनी पपई तोड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शवत दरवाढीला अर्जाद्वारे विरोध दर्शविला होता. त्यावर शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीने पुढाकार घेत गुरुवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. त्यात १४ रुपये ५५ पैसे दर ठरवण्यात आला असून १४ फेब्रुवारीपासून या दराने पपईची तोडणी करावी, असे आवाहन पपई उत्पादक संघर्ष समितीतर्फे करण्यात आले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराचा तिडा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, रवींद्र रावल, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, उमेश पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, अनिल पाटील, राजू पिंजारी, जयप्रकाश पाटील, हिलाल माळी, भरत पाटील आदींसह शेतकरी व शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थानवाले, राहुलभाई राजस्थानवाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदी व्यापारी उपस्थित होते. पपईच्या दरवाढीसंदर्भात व्यापारी व संघर्ष समितीत चर्चा झाली. पपई उत्पादक संघर्ष समितीने सुरुवातीला व्यापाºयांशी चर्चा करताना १६ रुपये दर ठेवला. तो दर परवडत नसल्याने व्यापाºयांनी अमान्य केला. त्यानंतर सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी यांनी हस्तक्षेप करत व्यापाºयांना तिढा सोडवण्यास सांगितला. शेतकरी, संघर्ष समिती व व्यापारी यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरुच होती.पपई हे नाशवंत पीक असल्याने आजपर्यंत शेतकरी घाबरून पपईची तोड सुरु राहू देत होते. परंतु बुधवारी भाववाढीसाठी बोलावलेल्या बैठकीला व्यापाºयांनी एकजूट दाखवत विरोध दर्शवला होता. त्यामुळे संघर्ष समितीनेही सर्व शेतकºयांना एकत्रित येण्याचे आवाहन करून पपई तोड बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्व शेतकºयांनी पपई तोड बंद केल्याने शेतकºयांची एकजूट पाहून व्यापारीही नरमले. बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी पुढाकार घेऊन तिढा सोडवण्यासाठी व्यापारी व शेतकºयांना आमंत्रित केले. त्यानुसार व्यापाºयांनी होकार देत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत शेतकºयांनी सांगितलेला भाव व्यापाºयांनी अमान्य केल्याने शेतकºयांनी बैठक संपवली. परंतु व्यापारी बसूनच होते. यावरून उत्तर भारतात पपईला दर जास्त मिळत असल्याने त्यामुळेच व्यापारी बैठक सोडून जात नव्हते. अखेर व्यापाºयांनी १४ रुपये ५५पैसे दर मान्य केला.