शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

ठरलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांनी पपई तोड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शवत दरवाढीला अर्जाद्वारे विरोध दर्शविला होता. त्यावर शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीने पुढाकार घेत गुरुवारी पुन्हा बैठक घेण्यात आली. त्यात १४ रुपये ५५ पैसे दर ठरवण्यात आला असून १४ फेब्रुवारीपासून या दराने पपईची तोडणी करावी, असे आवाहन पपई उत्पादक संघर्ष समितीतर्फे करण्यात आले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराचा तिडा सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, रवींद्र रावल, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, उमेश पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, अनिल पाटील, राजू पिंजारी, जयप्रकाश पाटील, हिलाल माळी, भरत पाटील आदींसह शेतकरी व शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थानवाले, राहुलभाई राजस्थानवाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदी व्यापारी उपस्थित होते. पपईच्या दरवाढीसंदर्भात व्यापारी व संघर्ष समितीत चर्चा झाली. पपई उत्पादक संघर्ष समितीने सुरुवातीला व्यापाºयांशी चर्चा करताना १६ रुपये दर ठेवला. तो दर परवडत नसल्याने व्यापाºयांनी अमान्य केला. त्यानंतर सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी यांनी हस्तक्षेप करत व्यापाºयांना तिढा सोडवण्यास सांगितला. शेतकरी, संघर्ष समिती व व्यापारी यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरुच होती.पपई हे नाशवंत पीक असल्याने आजपर्यंत शेतकरी घाबरून पपईची तोड सुरु राहू देत होते. परंतु बुधवारी भाववाढीसाठी बोलावलेल्या बैठकीला व्यापाºयांनी एकजूट दाखवत विरोध दर्शवला होता. त्यामुळे संघर्ष समितीनेही सर्व शेतकºयांना एकत्रित येण्याचे आवाहन करून पपई तोड बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्व शेतकºयांनी पपई तोड बंद केल्याने शेतकºयांची एकजूट पाहून व्यापारीही नरमले. बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी पुढाकार घेऊन तिढा सोडवण्यासाठी व्यापारी व शेतकºयांना आमंत्रित केले. त्यानुसार व्यापाºयांनी होकार देत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत शेतकºयांनी सांगितलेला भाव व्यापाºयांनी अमान्य केल्याने शेतकºयांनी बैठक संपवली. परंतु व्यापारी बसूनच होते. यावरून उत्तर भारतात पपईला दर जास्त मिळत असल्याने त्यामुळेच व्यापारी बैठक सोडून जात नव्हते. अखेर व्यापाºयांनी १४ रुपये ५५पैसे दर मान्य केला.