शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादीत मालाची विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच व्यापारीही मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत. या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा पर्याय शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात आला असून हे काम अव्याहतपणे कृषी विभागाकडून व नगरपालिका तसेच भूमीपुत्र शेतकरी गट यांच्यामार्फत शहरातील वृंदावननगर येथून सुरुवात करण्यात आली.या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती अभिजित पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, कृषी मंडळ अधिकारी राहुल धनगर, नगरसेवक संदीप पाटील आदी उपस्थित होते. शहरातील ग्राहकांना मागणीनुसार घरपोच भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०० रुपयात १३ प्रकारचा भाजीपाला देण्यात येत आहे. तालुक्यातील भाजीपाला फळे उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करून रितसर वाहतूक परवाना मिळवून देणे, फळे-भाजीपाला मागणीची नोंद घेणे, क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविणे, वाहतूक आढावा घेऊन त्यानुसार शेतकºयांना विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, तालुका, जिल्हा, नगरपालिका, या जिल्ह्यांतर्गत मागणीसह राज्यातील इतर जिल्ह्यात व इतर राज्यात मागणीप्रमाणे फळे भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी राहुल खेडकर, राकेश निकम, रायमल पावरा, पंकज वळवी हे मार्गदर्शन करीत आहे.तालुक्यात कृषी विभागाच्या माध्यमातून टरबूज व इतर फळांची विक्री शेतकरी ते ग्राहक थेट करण्यात येत असून संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात अशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी तर गाव स्तरावर कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व कृषीमित्रांचे सहकार्य लाभत आहे.

लॉकडाऊन काळात शेतातील माल खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे येत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तालुका कृषी विभाग, नगरपालिका व भूमिपुत्र शेतकरी गटाने पुढाकार घेऊन नागरिकांना ताजा भाजीपाला मिळणार आहे. यात शेतकरी व ग्राहक दोन्हींचा फायदा आहे.-अभिजित पाटील, सभापती, कृषी व बांधकाम, जि.प. नंदुरबार.सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करून भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. भाजीपाला व फळांचा योग्य प्रमाणात पुरवठा होईल याची काळजी घेतली जात आहे. या उपक्रमांमुळे भाजी बाजारात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील विविध गावातील सर्वच भाजीपाला व फळांची विक्री होत आहे.-किशोर हडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा.संचारबंदी शिथिलतेच्या काळात नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. पालिका प्रशासनामार्फत पाच ठिकाणी तात्पुरते भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले असले तरी याठिकाणी विक्रेते व ग्राहकांकडून शासकीय नियमांची अंमलबजावणी गांभीर्याने होत नाही. भूमिपुत्र गट, कृषी विभाग व शेतकरी यांच्या समन्वयातून हा अत्यंत चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे.-राहुल वाघ, मुख्याधिकारी, नगरपालिका शहादा.