शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पीके करपतांना पाहून शेतक:यांना अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:01 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळाची भिषणता आता जनमानसातील हृदयाला वेदना देणारी ठरत आहे. त्याचा प्रत्यय ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळाची भिषणता आता जनमानसातील हृदयाला वेदना देणारी ठरत आहे. त्याचा प्रत्यय नंदुरबार तालुक्यातील पळाशी परिसरात शेतक:यांच्या शेतावर फेरफटका मारल्यावर दिसून येतो. या परिसरातील जवळपास 15 किलोमिटरच्या भागात जमिनीतील पाणीच आटल्याने बागायती पीके करपू लागली आहे. लाखो रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा असतांना उत्पन्न तर गेलेच पण झालेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतक:यांची अक्षरश: झोप उडाली आहे. या वर्षीचा दुष्काळ अतिशय भयानक असेल याची चाहूल सुरू झाली आहे. पाऊसच नसल्याने या वर्षी जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल खोल जात आहे. त्यामुळे एरव्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यार्पयत सुस्थितीत चालणा:या विहिरी आतापासूनच कोरडय़ा झाल्या आहेत. परिणामी या पाण्यावर अवलंबून पिकांचे नियोजन करणा:या हजारो शेतक:यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. बहुतांश शेतकरी विहिरीतील पाण्याचा भरोवशावर कापूस आणि मिरचीचे पीक घेतात. यंदा देखील जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्रात असेच पिकांचे नियोजन शेतक:यांनी केले आहे. मात्र त्यांचे नियोजन पुरते कोलमडले आहे. या परिस्थितीचा पहाणीसाठी पळाशी, ता.नंदुरबार परिसरात भेट दिली असता तेथील शेतक:यांच्या प्रतिक्रिया हृदय पिळवटणा:या आहेत. या भागात गेल्या चार वर्षापासून पाऊस झालेला नाही. एरव्ही मार्च, एप्रिलर्पयत चालणा:या विहिरी गेल्या दोन वर्षापासून डिसेंबर जानेवारीर्पयत चांगल्या स्थितीत असतात. या उपलब्ध पाण्याचा आधारावर यावर्षीही शेतक:यांनी कापूस आणि मिरची लागवड केली. पण जुलैच्या मध्यापासून पाऊसच न झाल्याने विहिरी महिनाभरापूर्वीच कोरडय़ा झाल्या आहेत. पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने सप्टेंबर महिन्यात ऐन फुलो:यात आलेले कपाशी आणि मिरचीचे पीक सध्या करपू लागले आहे. उत्पन्नाची शाश्वती आता संपली आहे. या दोन्ही पिकांची वाढ झालेली नाही. त्यामुळे कपाशीवरील जे काही दहा, बारा बोंड पक्व झाली होती तेव्हढी उमलली आहे. तर मिरचीच्या झाडावरही जेमतेम आठ,दहा मिरची लागलेली आहे. एरव्ही एकरी किमान दहा क्विंटल कापूस आणि किमान एकरी दिडशे क्विंटल मिरचीचे उत्पन्न घेणा:या शेतक:यांना यावर्षी जेमतेम एकरी अर्धा ते एक क्विंटल कापूस आणि पाच क्विंटल मिरचीचे उत्पन्न येण्याची शक्यता आहे. त्यातही अनेक शेतक:यांच्या नशीबी तेही दिसून येत नाही. हे उत्पन्न काढण्यासाठी सध्या मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यांच्या काढणीचा दरही वधारला असल्याने अनेक शेतकरी ते उत्पन्न काढण्यासही धजावत आहे. शेतातील हे निरागस चित्र पाहिल्यानंतर या परिसरातील गावेही सुन्न झाली आहेत.आपण 30 एकर मिरची लागवड केली आहे. त्यासाठी ठिबक यावर्षीच केली. या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात सहा विहिरी आहेत. तेथून पाण्याचे नियोजन होते. पण यावर्षी महिनाभरापासून विहिरी कोरडया झाल्याने पाणी देणे शक्य झाले नाही. परिसरात लांब लांब अशीच अवस्था असल्याने व धरणाची सुविधाही नसल्याने पाणी आणण्याची जिद्द असली तरी आणू शकत नाही. आजवर मिरचीवर नऊ लाख रुपये आपण खर्च केले आहे. पण उत्पन्न शून्य येणार असल्याने हतबल झालो आहे. सरकारनेच आम्हाला आता मार्ग दाखवावा.                        -काशिनाथ करसन पाटील, पळाशी.