शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी म्हणतात बिल द्या कंपनी सांगते बिल भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील ५५ हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे वीज कंपनीचे २५८ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीची वसुली पुन्हा सुरु ...

नंदुरबार : जिल्ह्यातील ५५ हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे वीज कंपनीचे २५८ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीची वसुली पुन्हा सुरु झाली असून बऱ्याच ठिकाणी कंपनीने योग्य ते बिल देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यानंतरही कंपनी वसुलीसाठी तगादा लावत आहे.

वीज कंपनीच्या नंदुरबार आणि शहादा अशा दोन विभागात शेती पंपांसाठी स्वतंत्र वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. गेल्या १० वर्षात या कृषीपंपांची थकबाकी ही कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. यात कृषीपंपधारक शेतकरी हे योग्य त्या प्रकारचे बिल मिळत नसल्याने भरणा करु शकत नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान याबाबत वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता यांच्यासोबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु जिल्ह्यात कृषीपंपधारकांकडून योग्य पद्धतीने वीज बिल वसुली होत असल्याची माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांना योग्य त्या पद्धतीने कंपनीने बिले दिली पाहिजेत. वेळोवेळी बिले नसल्याने शेतकरी व वीज कंपनी यांच्या खटके उडत आहेत. शेतकरी रक्कम भरण्यास तयार असतात परंतु कंपनीकडून योग्य त्या पद्धतीने कारवाई करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना किती व कसा वीज वापर झाला याची माहिती दिली पाहिजे.

-प्रविणसिंग भटेसिंग राजपूत, शेतकरी.

सातत्याने बिलांची वसुली करण्याबाबत कार्यवाही करण्यात येते. परंतू वीज बिले मात्र दिली जात नाहीत. यंदा मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर वसुली सुरु होणार असल्याची माहिती आहे. यातून बिले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु ही बिले नेमकी कोणत्या कालावधी व किती वापराची देणार याबाबत कंपनी बोलत नाही. कंपनीने हे स्पष्ट करावे.

-नंदू काशिनाथ पाटील,शेतकरी,

वीज कंपनीला सर्वच शेतकरी सहकार्य करतात. परंतु कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती दिलीच जात नाहीत. कोणताही शेतकरी विजेची थकबाकी ठेवत नाही. परंतू योग्य ते बिल योग्य त्या वेळी मिळतच नाही आणि मिळाल्यास त्यात युनिट वापरात तफावत असते. शेतकऱ्यांना मासिक किंवा त्रैमासिक बिले दिली गेली पाहिजेत.

-राजेंद्रगीर विक्रमगीर गोसावी,शेतकरी.