शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

शेतकरी म्हणतात बिल द्या कंपनी सांगते बिल भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील ५५ हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे वीज कंपनीचे २५८ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीची वसुली पुन्हा सुरु ...

नंदुरबार : जिल्ह्यातील ५५ हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे वीज कंपनीचे २५८ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीची वसुली पुन्हा सुरु झाली असून बऱ्याच ठिकाणी कंपनीने योग्य ते बिल देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यानंतरही कंपनी वसुलीसाठी तगादा लावत आहे.

वीज कंपनीच्या नंदुरबार आणि शहादा अशा दोन विभागात शेती पंपांसाठी स्वतंत्र वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. गेल्या १० वर्षात या कृषीपंपांची थकबाकी ही कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. यात कृषीपंपधारक शेतकरी हे योग्य त्या प्रकारचे बिल मिळत नसल्याने भरणा करु शकत नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान याबाबत वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता यांच्यासोबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु जिल्ह्यात कृषीपंपधारकांकडून योग्य पद्धतीने वीज बिल वसुली होत असल्याची माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांना योग्य त्या पद्धतीने कंपनीने बिले दिली पाहिजेत. वेळोवेळी बिले नसल्याने शेतकरी व वीज कंपनी यांच्या खटके उडत आहेत. शेतकरी रक्कम भरण्यास तयार असतात परंतु कंपनीकडून योग्य त्या पद्धतीने कारवाई करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना किती व कसा वीज वापर झाला याची माहिती दिली पाहिजे.

-प्रविणसिंग भटेसिंग राजपूत, शेतकरी.

सातत्याने बिलांची वसुली करण्याबाबत कार्यवाही करण्यात येते. परंतू वीज बिले मात्र दिली जात नाहीत. यंदा मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर वसुली सुरु होणार असल्याची माहिती आहे. यातून बिले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु ही बिले नेमकी कोणत्या कालावधी व किती वापराची देणार याबाबत कंपनी बोलत नाही. कंपनीने हे स्पष्ट करावे.

-नंदू काशिनाथ पाटील,शेतकरी,

वीज कंपनीला सर्वच शेतकरी सहकार्य करतात. परंतु कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती दिलीच जात नाहीत. कोणताही शेतकरी विजेची थकबाकी ठेवत नाही. परंतू योग्य ते बिल योग्य त्या वेळी मिळतच नाही आणि मिळाल्यास त्यात युनिट वापरात तफावत असते. शेतकऱ्यांना मासिक किंवा त्रैमासिक बिले दिली गेली पाहिजेत.

-राजेंद्रगीर विक्रमगीर गोसावी,शेतकरी.