शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मजुर टंचाईने शेतकरी मेटाकुटीस : तळोदा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील विविध परिसरात सध्या मजुर टंचाईने येथील शेतकरी तसेच ऊस उत्पादक मेटाकूटीस आला आह़े कामांसाठी मजुरच मिळत नसल्याने नाईलाजास्तव शेतक:यांना आपल्या कुटुंबियांसमवेतच शेतीची कामे आटोपती घ्यावी लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़ेतळोदा तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर परिसरात उसतोडीस प्रारंभ झाला आह़े रांझणी, प्रतापपूर गावात तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील विविध परिसरात सध्या मजुर टंचाईने येथील शेतकरी तसेच ऊस उत्पादक मेटाकूटीस आला आह़े कामांसाठी मजुरच मिळत नसल्याने नाईलाजास्तव शेतक:यांना आपल्या कुटुंबियांसमवेतच शेतीची कामे आटोपती घ्यावी लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़ेतळोदा तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर परिसरात उसतोडीस प्रारंभ झाला आह़े रांझणी, प्रतापपूर गावात तसेच शेतीशिवारात ऊसतोड कामगारांची तीव्र टंचाइ जाणवत   आह़े येथील बहुतेक उसतोड                   मजुर लगतच्या गुजरात राज्यात तात्पुरते स्थलांतरीत झाले              असल्याची स्थिती आह़े तुलणात्मकदृष्टय़ा स्थानिक मजुरीपेक्षा परराज्यात मजुरी चांगली असल्याने मुजरांकडून तेथे जाण्यास पसंती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, परिसरात गळीत हंगाम सुरु झाला असला तरी शेतक:यांकडून मजुरांची टंचाई  असल्याचे सांगण्यात येत आह़े याचे मुख्य कारण                  म्हणून त्यांचे गुजरात सौराष्ट्रात झालेले स्थलांतर आह़े त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात ब:यापैकी पाऊस झाला असल्याने                   हे मजुर राज्यातही इतर ठिकाणी  गेले असल्याचे सांगण्यात येत  आह़े कारखानदार राहताय विसंबूननंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक ऊसतोड कामगार गुजरात तसेच राज्यातील इतरही ठिकाणी ऊसतोडीसाठी जात असतात़ त्यामुळे स्थानिक कारखानदारांना इतर ठिकाणाहून ऊसतोड  कामगारांची आयात करावी लागून त्यांच्यावरच विसंबून रहावे  लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े असे असल्याने पावसाळ्यात जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या आर्थिक अडचणी सोडविल्यास तसेच मजुरीचे दर वाढवून दिल्यास मजुरांचे स्थलांतर होणार नसल्याचेही या क्षेत्राती जाणकारांकडून सांगण्यात   येत आह़े त्यांना स्थानिक ठिकाणीच चांगली मजुरी मिळाल्याने ते इरतत्र जाण्यास धजावणार नसल्याचेही बोलले जात आह़े तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, रांझणी, प्रतापपूर आदी उसपट्टयांत मोठय़ा क्षेत्रांवर उसाची लागवड करण्यात आली आह़े त्यामुळे दरवर्षी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतक:यांना मजुरांची चिंता लागून असत़े उसतोडीस दरवर्षी शेकडोंच्या संख्येने येथील स्थानिक मजुर बाहेर स्थलांतरीत होत असल्याने या ठिकाणी या दिवसांमध्ये कारखानदार, शेतक:यांसमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होत आह़े दरम्यान, परराज्यात तात्पुरते स्थलांतर होत असल्याने तळोदा तालुक्यातील बहुतेक गावे ओस पडू लागली आह़े या दिवसांत उसतोडीसाठी सर्वाधिक स्थलांतर   होत असल्याने गावात सर्वत्र   शांततेचे वातावरण दिसून येत असत़े